शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

ढीगभर अभियाने, प्रवासीसंख्या मात्र होतेय ऊणे

By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST

गळक्या गाड्या, फुटक्या काचा... : समस्या घेऊन एस. टी. ‘प्रवासी वाढवा’ची सत्वपरीक्षा

उमेश पाटणकर - रत्नागिरी ,, जेमतेम वीस प्रवासी घेऊन चढावात लिलया मागे टाकून एखादा ट्रकचालकही सहज निघून जातो. खिडक्यांमधून पावसाचे पाणी आत येतेय म्हणून सरकून मध्ये बसावे तर डोक्यावर हमखास पाणी गळतेय, अशी परिस्थिती असणारी वाहने दिमतीला घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग प्रवासी वाढवा अभियान सुरु करीत आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, वाहनांच्या सुट्या पार्टची कमतरता, दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि वारंवार कोलमडणारे वेळापत्रक यामध्ये हे अभियान वरिष्ठ अधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा घेणार आहे.दरवर्षी दि. १ आॅगस्टला एस. टी.चे प्रवासी वाढवा अभियान सुरु होते. याची तयारी किमान पंधरा दिवस आधी होते. राज्य मार्ग परिवहनचा रत्नागिरी विभाग प्रतिवर्षी जय्यत तयारीनिशी यात सहभागी होतो. मात्र, यंदाचे अभियान एस. टी.चे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी या सर्वांची सत्वपरीक्षा घेणारे ठरणार आहे. गाड्यांच्या दुरुस्तीचे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा एस. टी. कर्मचाऱ्यांचा दावा आहे. त्याचा फटका चालक. वाहकांना बसत आहे. अगदी काचेचाच प्रश्न घ्यावा म्हटला तरी रत्नागिरी आगारात किमान चार ते पाच गाड्या अशा आहेत की, ज्यांच्या विन्डोग्लास विविध कारणांनी फुटलेल्या आहेत. पावसात अशा फुटक्या काचांच्या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. परिवर्तन प्रकारातील बसेस बसेसना भली मोठी अखड विन्डग्लास वापरली गेली आहे. यातील एका बसची काच वरपासून खालपर्यंत अखंड फुटली आहे. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून प्लास्टिक टेप लावून चिकटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रवासादरम्यान बसणाऱ्या हादऱ्यांमुळे फुटलेली ही काच रबरामधून सरकली असून, केव्हाही निसटण्याची शक्यता आहे., अशी या बसची अवस्था असल्याचे दिसून येते.अतिवेगाने अपघात होतात म्हणून एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी सर्वच गाड्या स्पीडलॉक केल्या आहेत. यासाठी अ‍ॅक्सिलेटर पायडलखाली जाडे नटबोल्ट चक्क वेल्डिंग करुन कायमस्वरुपी बसवले आहेत. यामुळे बसेसना पुरेशी गती मिळेनाशी झाली आहे. गाडी रिकामी असली तरी लहान सहान चढावात स्पेशल गिअरचा वापर करावा लागतो.गाड्यांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने वर्कशॉपमधून आलेली गाडी अनेकदा पहिल्याच पावसात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचाही खोळंबा होत असल्याचे दृश्य जागोजागी दिसत आहे. त्यामुळे कर्मचारीही हतबल झाले आहेत.