शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

चुकीच्या अहवालामुळे निरोगी महिला चार तास कोरोना रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे एका निरोगी महिलेला चार तास कोरोना रुग्णालयात राहावे लागल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला ...

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे एका निरोगी महिलेला चार तास कोरोना रुग्णालयात राहावे लागल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला आहे. निगेटिव्ह असतानाही तिच्यावर कोरोना रुग्ण म्हणून उपचार सुरू करण्यात आले आणि नवीन अहवाल आल्यावर घाईघाईने तिला घरी पाठवून देण्यात आले.

तालुक्यातील नेवरे गावातील एका खासगी कंपनीने कंपनीतील २७ कामगारांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यामध्ये पाच जणांचे अहवाल कोरोनाबाधित म्हणून प्राप्त झाले. त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मंगळवारी दुपारी संबंधित महिलेच्या मोबाइलवर कोरोनाबाधित असल्याचा संदेश प्राप्त झाला. यामुळे संबंधित महिलेचे कुटुंब हादरले. ग्राम कृती दल व आशासेविकेला माहिती समजताच त्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. गृहविलगीकरणात राहणार की रुग्णालयात दाखल होणार असे त्यांनी विचारले. या महिलेचे एकत्र कुटुंब असल्याने गृहविलगीकरण शक्य नाही. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची तयारी या महिलेने दर्शवली. त्यानुसार १०८ रुग्णवाहिका बोलावून संबंधित महिलेला रत्नागिरीतील महिला रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिला दाखलही करून घेण्यात आले. मात्र, चार तासांनंतर त्या महिलेच्या मोबाइलवर तिचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा संदेश आला. त्या महिलेने रुग्णालयातील डाॅक्टरांना संदेश दाखविला. त्यांनी कपाळावर हात मारत त्या महिलेला तातडीने रुग्णालयातून घरी जाण्यास सांगितले.

चार तास निरोगी असलेल्या महिलेला नाहक कोरोना रुग्णालयात, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये थांबावे लागले. या काळात त्या कुटुंबाची, त्या महिलेची खूप घालमेल झाली. आरोग्य यंत्रणेच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोना उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक आहे. मात्र, कोरोनाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. आरोग्य यंत्रणेवरील असलेला ताण, शिवाय आतापर्यंतची कामगिरी नक्कीच आदर्शवत आहे. मात्र, काही निष्काळजी लोकांच्या चुकीमुळे आरोग्य यंत्रणेची प्रतिमा नक्कीच मलिन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याबाबत ग्राम कृतीदलाचे अध्यक्ष व सरपंच दीपक फणसे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित प्रकार कानावर घातला असता, याबाबत चाैकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. शिवाय प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांशी याबाबत ग्रामस्थांनी चाैकशी केली असता, दिवसाला हजारो अहवाल तपासणीसाठी येत असतात, त्यामुळे एखाद्‌वेळी असा प्रकार होऊ शकतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अशा प्रकारचे चुकीचे रिपोर्ट रुग्णांच्या जिवाशी खेळ ठरू शकतात. त्यामुळे किमान एक दिवस अहवाल उशिरा प्राप्त झाला तरी तो योग्य व बिनचूक असणे योग्य आहे.