शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

चुकीच्या अहवालामुळे निरोगी महिला चार तास कोरोना रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे एका निरोगी महिलेला चार तास कोरोना रुग्णालयात राहावे लागल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला ...

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे एका निरोगी महिलेला चार तास कोरोना रुग्णालयात राहावे लागल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला आहे. निगेटिव्ह असतानाही तिच्यावर कोरोना रुग्ण म्हणून उपचार सुरू करण्यात आले आणि नवीन अहवाल आल्यावर घाईघाईने तिला घरी पाठवून देण्यात आले.

तालुक्यातील नेवरे गावातील एका खासगी कंपनीने कंपनीतील २७ कामगारांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यामध्ये पाच जणांचे अहवाल कोरोनाबाधित म्हणून प्राप्त झाले. त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मंगळवारी दुपारी संबंधित महिलेच्या मोबाइलवर कोरोनाबाधित असल्याचा संदेश प्राप्त झाला. यामुळे संबंधित महिलेचे कुटुंब हादरले. ग्राम कृती दल व आशासेविकेला माहिती समजताच त्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. गृहविलगीकरणात राहणार की रुग्णालयात दाखल होणार असे त्यांनी विचारले. या महिलेचे एकत्र कुटुंब असल्याने गृहविलगीकरण शक्य नाही. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची तयारी या महिलेने दर्शवली. त्यानुसार १०८ रुग्णवाहिका बोलावून संबंधित महिलेला रत्नागिरीतील महिला रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिला दाखलही करून घेण्यात आले. मात्र, चार तासांनंतर त्या महिलेच्या मोबाइलवर तिचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा संदेश आला. त्या महिलेने रुग्णालयातील डाॅक्टरांना संदेश दाखविला. त्यांनी कपाळावर हात मारत त्या महिलेला तातडीने रुग्णालयातून घरी जाण्यास सांगितले.

चार तास निरोगी असलेल्या महिलेला नाहक कोरोना रुग्णालयात, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये थांबावे लागले. या काळात त्या कुटुंबाची, त्या महिलेची खूप घालमेल झाली. आरोग्य यंत्रणेच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोना उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक आहे. मात्र, कोरोनाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. आरोग्य यंत्रणेवरील असलेला ताण, शिवाय आतापर्यंतची कामगिरी नक्कीच आदर्शवत आहे. मात्र, काही निष्काळजी लोकांच्या चुकीमुळे आरोग्य यंत्रणेची प्रतिमा नक्कीच मलिन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याबाबत ग्राम कृतीदलाचे अध्यक्ष व सरपंच दीपक फणसे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित प्रकार कानावर घातला असता, याबाबत चाैकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. शिवाय प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांशी याबाबत ग्रामस्थांनी चाैकशी केली असता, दिवसाला हजारो अहवाल तपासणीसाठी येत असतात, त्यामुळे एखाद्‌वेळी असा प्रकार होऊ शकतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अशा प्रकारचे चुकीचे रिपोर्ट रुग्णांच्या जिवाशी खेळ ठरू शकतात. त्यामुळे किमान एक दिवस अहवाल उशिरा प्राप्त झाला तरी तो योग्य व बिनचूक असणे योग्य आहे.