शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कॅन्सरशी झगडतच तो ‘वडिलां’कडे गेला!

By admin | Updated: December 14, 2014 00:06 IST

खाडीभागातील दुर्दैवी घटना : पितापुत्राच्या मृत्यूने सारेच हळहळले...

एजाज पटेल, फुणगूस : मुलाच्या सतत आजारपणाचा धसका घेत वडिलांनी देह ठेवला अन् वडिलांच्या मृत्यूचे ओेझे मनावर घेत दुर्धर आजाराने पीडित असलेल्या त्या मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दीड महिन्यात प्राण सोडले. फुणगूस खाडीभागात झालेल्या या घटनेने अवघा खाडीभाग शोकसागरात बुडाला असून, येथील नवजीवन विद्यालयाने एक दिवसाची सुट्टी जाहीर करत आपल्या या विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण केली.‘किस्मत के खेल है ये मेरे भैय्या’ हे सत्य ठरलंय संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावात..! येथील विजय देवळेकर हे अत्यंत गरिबीत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. पत्नी, दोन मुली आणि गोंडस असा वैभव असे छोटेसे कुटुंब. मात्र घरात अठरा विश्व दारिद्र्य असतानाच नियतीने या कुटुंबाला पहिला धक्का दिला. शालेय शिक्षण घेत असलेल्या वैभवला आजाराने घेरले. सुरुवातीला हलका असणारा ताप वाढत गेला. उपचाराकरिता मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागली. अखेर वैभवला कॅन्सरसारखा दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याचे वडील हादररुनच गेले.आधीच गरीबी आणि त्यामध्ये एकच मुलगा. वैभवला कॅन्सरसारखा आजार पाहून साहजिकच वडील विजय देवळेकरांना प्रचंड धक्का बसला. वैभवचे आजारपण त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करुन गेले. अशातही मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी वैभववर उपचार सुरु ठेवले. दुसऱ्या बाजूला वैभव नवजीवन विद्यालय फुणगूस येथे शिक्षणही घेत होता. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत तो शिक्षणावर प्रेम करत होता. अशावेळी नियतीने दुसरा घाला घातला. मुलाच्या आजाराचा धसका घेतलेले विजय देवळेकर दीड महिन्यापूर्वी या जगाचा निरोप घेत निघून गेले. देवळेकर कुटुंबावर जणू आभाळ कोसळले.वडिलांच्या मृत्यूने कॅन्सर पीडित वैभव पुरता खचला. मात्र आपल्यावरची जबाबदारी ओळखून न डगमगता धैर्याने उभा राहिला. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत छोटीमोठी कामे तो करत असे आणि ११ वाजता शाळेत जात असे. परत सायंकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा बाजारपेठेत व्यावसायिकांना मदत करुन अंधार पडताच घरी जात असे. बाजारपेठेत तो सर्वांचाच लाडका बनला होता. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला कॅन्सरसारखा भयानक आजार आहे, हे मुळीच पटत नव्हते इतकी कडवी झुंज तो कॅन्सरशी देत होता.वडिलांच्या मृत्यूचे ओझे घेऊन कॅन्सरसारख्या भयानक आजाराला वैभव देत असलेली झुंज नियतीला पाहवली नाही आणि शुक्रवारी सायंकाळी नियतीने थेट वैभववरच घाला घातला. वैभवची कॅन्सरशी असलेली झुंज अपयशी ठरली. वैभव आणि यमदुताच्या या लढाईत यमदूताचा विजय झाला असला तरी खऱ्या अर्थाने या गोंडस मुलाने दिलेली झुंज पाहता खऱ्या अर्थाने वैभवने यमावर मात केली असेच म्हणावे लागेल. वैभवच्या मृत्यूचे वृत्त खाडीभागात समजताच अवघ्या खाडीभागावर शोककळा पसरली. ज्या नवजीवन विद्यालयात तो शिक्षण घेत होता, त्या शाळेला आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नवजीवन विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच फुणगूस बाजारपेठेतील व्यापारी यांच्यासह शेकडोजण वैभवच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. साऱ्यांनी वैभवला जड अंतकरणाने निरोप दिला. (वार्ताहर)