शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

कॅन्सरशी झगडतच तो ‘वडिलां’कडे गेला!

By admin | Updated: December 14, 2014 00:06 IST

खाडीभागातील दुर्दैवी घटना : पितापुत्राच्या मृत्यूने सारेच हळहळले...

एजाज पटेल, फुणगूस : मुलाच्या सतत आजारपणाचा धसका घेत वडिलांनी देह ठेवला अन् वडिलांच्या मृत्यूचे ओेझे मनावर घेत दुर्धर आजाराने पीडित असलेल्या त्या मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दीड महिन्यात प्राण सोडले. फुणगूस खाडीभागात झालेल्या या घटनेने अवघा खाडीभाग शोकसागरात बुडाला असून, येथील नवजीवन विद्यालयाने एक दिवसाची सुट्टी जाहीर करत आपल्या या विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण केली.‘किस्मत के खेल है ये मेरे भैय्या’ हे सत्य ठरलंय संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावात..! येथील विजय देवळेकर हे अत्यंत गरिबीत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. पत्नी, दोन मुली आणि गोंडस असा वैभव असे छोटेसे कुटुंब. मात्र घरात अठरा विश्व दारिद्र्य असतानाच नियतीने या कुटुंबाला पहिला धक्का दिला. शालेय शिक्षण घेत असलेल्या वैभवला आजाराने घेरले. सुरुवातीला हलका असणारा ताप वाढत गेला. उपचाराकरिता मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागली. अखेर वैभवला कॅन्सरसारखा दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याचे वडील हादररुनच गेले.आधीच गरीबी आणि त्यामध्ये एकच मुलगा. वैभवला कॅन्सरसारखा आजार पाहून साहजिकच वडील विजय देवळेकरांना प्रचंड धक्का बसला. वैभवचे आजारपण त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करुन गेले. अशातही मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी वैभववर उपचार सुरु ठेवले. दुसऱ्या बाजूला वैभव नवजीवन विद्यालय फुणगूस येथे शिक्षणही घेत होता. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत तो शिक्षणावर प्रेम करत होता. अशावेळी नियतीने दुसरा घाला घातला. मुलाच्या आजाराचा धसका घेतलेले विजय देवळेकर दीड महिन्यापूर्वी या जगाचा निरोप घेत निघून गेले. देवळेकर कुटुंबावर जणू आभाळ कोसळले.वडिलांच्या मृत्यूने कॅन्सर पीडित वैभव पुरता खचला. मात्र आपल्यावरची जबाबदारी ओळखून न डगमगता धैर्याने उभा राहिला. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत छोटीमोठी कामे तो करत असे आणि ११ वाजता शाळेत जात असे. परत सायंकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा बाजारपेठेत व्यावसायिकांना मदत करुन अंधार पडताच घरी जात असे. बाजारपेठेत तो सर्वांचाच लाडका बनला होता. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला कॅन्सरसारखा भयानक आजार आहे, हे मुळीच पटत नव्हते इतकी कडवी झुंज तो कॅन्सरशी देत होता.वडिलांच्या मृत्यूचे ओझे घेऊन कॅन्सरसारख्या भयानक आजाराला वैभव देत असलेली झुंज नियतीला पाहवली नाही आणि शुक्रवारी सायंकाळी नियतीने थेट वैभववरच घाला घातला. वैभवची कॅन्सरशी असलेली झुंज अपयशी ठरली. वैभव आणि यमदुताच्या या लढाईत यमदूताचा विजय झाला असला तरी खऱ्या अर्थाने या गोंडस मुलाने दिलेली झुंज पाहता खऱ्या अर्थाने वैभवने यमावर मात केली असेच म्हणावे लागेल. वैभवच्या मृत्यूचे वृत्त खाडीभागात समजताच अवघ्या खाडीभागावर शोककळा पसरली. ज्या नवजीवन विद्यालयात तो शिक्षण घेत होता, त्या शाळेला आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नवजीवन विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच फुणगूस बाजारपेठेतील व्यापारी यांच्यासह शेकडोजण वैभवच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. साऱ्यांनी वैभवला जड अंतकरणाने निरोप दिला. (वार्ताहर)