शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून त्याने संपविले स्वत:चे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

राजापूर : ‘दुसऱ्या घरी जा, मला झाेपायचे आहे’, असे सांगून लहान भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून १७ वर्षीय विवेक विठाेबा ...

राजापूर : ‘दुसऱ्या घरी जा, मला झाेपायचे आहे’, असे सांगून लहान भावंडांना दुसऱ्या घरी पाठवून १७ वर्षीय विवेक विठाेबा काकये या युवकाने स्वत:चे आयुष्य संपविल्याची हृदयद्रावक घटना माेराेशी - काकयेवाडी (ता. राजापूर) येथे बुधवारी घडली़. याप्रकरणी राजापूर पाेलीस स्थानकात नाेंद करण्यात आली असून, विवेकच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

राजापूर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकच्या आई - वडिलांचे निधन झाले आहे. तो आपल्या घरी पंधरा वर्षीय छोटी बहीण व दहा वर्षीय छोट्या भावासह राहत होता. विवेक माेठा असल्याने बारीकसारीक कामे करून ताे उदरनिर्वाह करत हाेता. त्याची दोन्ही भावंडे जावडे (ता. लांजा) येथील छात्रालयात होती. मात्र, कोरोनामुळे गेले काही महिने ते मोरोशीला घरी परत आले होते.

विवेकने बुधवारी दुपारी २ ते ३.५० यावेळात आपल्या दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी जा, मला येथे झोपायचे आहे, असे सांगून दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी पाठविले. भावंड घरातून जाताच विवेकने स्वत:च्या घरात ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. काहीवेळाने त्याची बहीण घरी आली असता, तिच्या हा प्रकार लक्षात आला व तिने हंबरडा फाेडताच एकच गोंधळ उडाला. दरम्यान, विवेकचा चुलतभाऊ महेश बाबू काकये याने राजापूर पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद वाघाटे अधिक तपास करत आहेत.