शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात नागरी संरक्षण दलाचे कार्यालय कार्यरत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

- दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश - अन्य चार जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत लोकमत न्यूज नेटवर्क ...

- दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश

- अन्य चार जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नागरी संरक्षण दलाचे कार्यालय स्थापन करण्यास होणारी दिरंगाई आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कार्यालय स्थापन करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागणाऱ्या राज्य सरकारला धारेवर धरत मागील पाच वर्षांत वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच स्मरणपत्रे पाठवूनही त्याबाबत पूर्तता का केली नाही आणि आता आणखी वेळ कसला मागत आहात, अशा शब्दात खंडपीठाने राज्य सरकारचे कान टोचले. यावेळी दाेन आठवड्यात निर्णय घेण्याची सक्त सूचना न्यायालयाने केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील दोन्ही जिल्हे नैसर्गिक आपत्तींमुळे धोकादायक जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, या जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे कार्यालय नसल्याने ते स्थापन करण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका निवृत्त महसूल कर्मचारी शरद राऊळ यांच्यावतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी उच्च न्यायालयात दाखल करण्यात केली आहे. त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या सहा जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या नागरी संरक्षण दलाच्या मुख्यालयाने २०११ साली निर्णयही घेतला होता. त्यानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे केंद्र स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, संबंधित केंद्रासाठी लागणार्‍या अधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून अंतिम यादी मंजुरीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यालयात पाठवली आहे. जागेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयासाठीही जागा उपलब्ध करून दिल्या. नोकर भरतीही केली गेली. परंतु, अद्याप केंद्र स्थापन करण्यात आले नाही. अन्य चार जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत.

या दोन जिल्ह्यांसाठी नाहीत. वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यांना वादळाचा आणि पर्जन्यवृष्टीचा मोठा तडाखा बसला. पंधरा दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये आलेल्या पुरादरम्यान या जिल्ह्यांमध्ये कार्यालय नसल्याने नागरी संरक्षण दलाच्या जवानांना तेथे पोहोचण्यास दीड दिवसांचा अवधी लागला. याकडेही याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी लक्ष वेधले.

दुसरीकडे, दोन जिल्ह्यांना नागरी संरक्षण दलाची गरज नसल्याचे सांगणार्‍या राज्य सरकारने कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती खंडपीठाकडे केली. खंडपीठाने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आणि गृह विभागाच्या सचिवांनी संबंधित विभागाच्या परवानग्या घेऊन दोन आठवड्यात तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.