शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

निकृष्ट धान्याने रेशनदुकानदारच हैराण

By admin | Updated: January 23, 2016 00:47 IST

खेड तालुका : धान्यात मातीसह सिमेंट, रेतीचा समावेश; धान्याच्या पिशव्या बदलणार

आवाशी : खेड तालुक्यातील रास्तदर धान्य दुकानांवर सध्या सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य येत आहे. माती, सिमेंटचे व रेतीचे खडे धान्यातून जनतेला वाटण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास धान्याची पोती बदलून देण्यात येतील, असे पुरवठा निरीक्षकांनी सांगितले.खेड तालुक्यात रास्तदर धान्याची एकूण १२७ दुकाने आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या खादी ग्रामोद्योग वखारीतून हे धान्य तालुक्याला प्राप्त होत असते. मध्यंतरी धान्य येण्याचेच बंद झाले होते किंवा दरमहा येतही नव्हते. गेल्या चार महिन्यांपासून ते पुन्हा सुरु झाले आहे. मात्र, तीन महिन्यांपासून सातत्याने हे धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. धान्य घेण्यासाठी जाणाऱ्या महिला आपल्या कुटुंबप्रमुखाकडे याबाबत वारंवार तक्रार करत असतात. अशावेळी काहीजण संबंधित धान्य दुकानदाराला विचारणा करण्यास गेल्यास त्यांच्यात वाद होतात. तुम्हाला धान्य देण्याचे बंद करीन, अशी धमकीही काही रेशनदुकानदार देतात, त्यामुळे सर्वसामान्य कार्डधारक इतरत्र तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. याचाच फायदा बहुधा दुकानदार व संबंधित अधिकारी घेत असल्याचे दिसून येते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची व्यथा जाणून घेऊनत्यांना मतदानावेळी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी यावेळी डोळेझाक का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील गावोगावीच्या धान्यदुकानदारांना तांदूळ, गहू व इतर धान्याचे वाटप करण्यात आले. पुन्हा अशीच परिस्थिती आहे. तालुक्यातील इतर धान्य दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनीही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. (वार्ताहर)आमच्याकडे येणारे धान्य बंद पिशव्यांतून येते. त्याचे वाटपही तसेच वखार व्यवस्थापकाकडून वितरण केले जाते. मात्र, आमच्याकडे अद्याप एकाही धान्य दुकानदाराने तक्रार केलेली नाही. तक्रार आली तर आम्ही लगेच त्यांना ते पोते बदलून देऊ. तशी सूचना आम्ही वखार व्यवस्थापकाला दिली आहे. तालुक्याला येणारा तांदळाचा कोटा ३२४० टन, तर गहू २१०० टन इतका आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून कोटा दरमहा उपलब्ध होत असतो. ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिलेली बाब गांभीर्याने घेऊन संबंधित वखार व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग, रत्नागिरी व अन्न महामंडळ यांच्या निदर्शनास आणून देऊ.- पी. जी. कदम,तालुका पुरवठा निरीक्षक, खेडपुरवठा निरीक्षकांनी पोते बदलून देऊ, असे सांगितले तरी किती पोती बदलून आणणार? आणि प्रत्येकवेळी पोते बदलण्यासाठी येणारा वाहतूक खर्च आमच्याच खिशातून करावा लागणार. त्यापेक्षा त्यांनी वा संबंधितांनी धान्यच दर्जात्मक दिले तर शिधाधारकास व आम्हास दोघांनाही होणारा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास टळेल, असे दुकानदारांचे मत आहे.