शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट धान्याने रेशनदुकानदारच हैराण

By admin | Updated: January 23, 2016 00:47 IST

खेड तालुका : धान्यात मातीसह सिमेंट, रेतीचा समावेश; धान्याच्या पिशव्या बदलणार

आवाशी : खेड तालुक्यातील रास्तदर धान्य दुकानांवर सध्या सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य येत आहे. माती, सिमेंटचे व रेतीचे खडे धान्यातून जनतेला वाटण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास धान्याची पोती बदलून देण्यात येतील, असे पुरवठा निरीक्षकांनी सांगितले.खेड तालुक्यात रास्तदर धान्याची एकूण १२७ दुकाने आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या खादी ग्रामोद्योग वखारीतून हे धान्य तालुक्याला प्राप्त होत असते. मध्यंतरी धान्य येण्याचेच बंद झाले होते किंवा दरमहा येतही नव्हते. गेल्या चार महिन्यांपासून ते पुन्हा सुरु झाले आहे. मात्र, तीन महिन्यांपासून सातत्याने हे धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. धान्य घेण्यासाठी जाणाऱ्या महिला आपल्या कुटुंबप्रमुखाकडे याबाबत वारंवार तक्रार करत असतात. अशावेळी काहीजण संबंधित धान्य दुकानदाराला विचारणा करण्यास गेल्यास त्यांच्यात वाद होतात. तुम्हाला धान्य देण्याचे बंद करीन, अशी धमकीही काही रेशनदुकानदार देतात, त्यामुळे सर्वसामान्य कार्डधारक इतरत्र तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. याचाच फायदा बहुधा दुकानदार व संबंधित अधिकारी घेत असल्याचे दिसून येते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची व्यथा जाणून घेऊनत्यांना मतदानावेळी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी यावेळी डोळेझाक का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील गावोगावीच्या धान्यदुकानदारांना तांदूळ, गहू व इतर धान्याचे वाटप करण्यात आले. पुन्हा अशीच परिस्थिती आहे. तालुक्यातील इतर धान्य दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनीही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. (वार्ताहर)आमच्याकडे येणारे धान्य बंद पिशव्यांतून येते. त्याचे वाटपही तसेच वखार व्यवस्थापकाकडून वितरण केले जाते. मात्र, आमच्याकडे अद्याप एकाही धान्य दुकानदाराने तक्रार केलेली नाही. तक्रार आली तर आम्ही लगेच त्यांना ते पोते बदलून देऊ. तशी सूचना आम्ही वखार व्यवस्थापकाला दिली आहे. तालुक्याला येणारा तांदळाचा कोटा ३२४० टन, तर गहू २१०० टन इतका आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून कोटा दरमहा उपलब्ध होत असतो. ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिलेली बाब गांभीर्याने घेऊन संबंधित वखार व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग, रत्नागिरी व अन्न महामंडळ यांच्या निदर्शनास आणून देऊ.- पी. जी. कदम,तालुका पुरवठा निरीक्षक, खेडपुरवठा निरीक्षकांनी पोते बदलून देऊ, असे सांगितले तरी किती पोती बदलून आणणार? आणि प्रत्येकवेळी पोते बदलण्यासाठी येणारा वाहतूक खर्च आमच्याच खिशातून करावा लागणार. त्यापेक्षा त्यांनी वा संबंधितांनी धान्यच दर्जात्मक दिले तर शिधाधारकास व आम्हास दोघांनाही होणारा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास टळेल, असे दुकानदारांचे मत आहे.