शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

हर्चे शेळवीवाडी १० दिवस अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे ...

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे गावातील शेळवीवाडीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वाडी गेले १० दिवस अंधारात आहे.

तौक्ते वादळामुळे मालमत्तांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे, वीजखांब कोसळल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा अंधारात बुडाला होता. अनेक गावांमध्ये घरांचीही पडझड झाली तर घरांच्या छप्परांवरील पत्रे, कौले उडाल्याने नुकसान झाले होते. अनेक गावे अंधारात बुडाल्याने महावितरणची धावपळ उडाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. बहुतांश गावे, वाड्यांमधील वीजपुरवठा सुरु करण्यात महावितरणला यश आले होते.

दरम्यान, लांजा तालुक्याचे टोक असलेल्या हर्चे गावातील शेळवीवाडीत अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब वादळाने पडले होते. तसेच काही ठिकाणी विद्युत खांबांवर झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गेले १० दिवस ही वाडी अंधारात आहे. वाडीतील ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा कधी सुरु होणार, याबाबत विचारणा केली असता, प्रयत्न सुुरु आहेत, असे सांगण्यात आले. वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले असून, अनेकांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. दहा दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.