शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

हर्चे शेळवीवाडी १० दिवस अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे ...

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे गावातील शेळवीवाडीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वाडी गेले १० दिवस अंधारात आहे.

तौक्ते वादळामुळे मालमत्तांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे, वीजखांब कोसळल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा अंधारात बुडाला होता. अनेक गावांमध्ये घरांचीही पडझड झाली तर घरांच्या छप्परांवरील पत्रे, कौले उडाल्याने नुकसान झाले होते. अनेक गावे अंधारात बुडाल्याने महावितरणची धावपळ उडाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. बहुतांश गावे, वाड्यांमधील वीजपुरवठा सुरु करण्यात महावितरणला यश आले होते.

दरम्यान, लांजा तालुक्याचे टोक असलेल्या हर्चे गावातील शेळवीवाडीत अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब वादळाने पडले होते. तसेच काही ठिकाणी विद्युत खांबांवर झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गेले १० दिवस ही वाडी अंधारात आहे. वाडीतील ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा कधी सुरु होणार, याबाबत विचारणा केली असता, प्रयत्न सुुरु आहेत, असे सांगण्यात आले. वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले असून, अनेकांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. दहा दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.