शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

हर्चे शेळवीवाडी १० दिवस अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे ...

रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे गावातील शेळवीवाडीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वाडी गेले १० दिवस अंधारात आहे.

तौक्ते वादळामुळे मालमत्तांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे, वीजखांब कोसळल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा अंधारात बुडाला होता. अनेक गावांमध्ये घरांचीही पडझड झाली तर घरांच्या छप्परांवरील पत्रे, कौले उडाल्याने नुकसान झाले होते. अनेक गावे अंधारात बुडाल्याने महावितरणची धावपळ उडाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. बहुतांश गावे, वाड्यांमधील वीजपुरवठा सुरु करण्यात महावितरणला यश आले होते.

दरम्यान, लांजा तालुक्याचे टोक असलेल्या हर्चे गावातील शेळवीवाडीत अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब वादळाने पडले होते. तसेच काही ठिकाणी विद्युत खांबांवर झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गेले १० दिवस ही वाडी अंधारात आहे. वाडीतील ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा कधी सुरु होणार, याबाबत विचारणा केली असता, प्रयत्न सुुरु आहेत, असे सांगण्यात आले. वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले असून, अनेकांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. दहा दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.