शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गुहागरातील बागायतदार वानरांच्या त्रासाने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

असगोली : कोकणात शेती व बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचा हंगाम ...

असगोली : कोकणात शेती व बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचा हंगाम झाल्यावर येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवड करण्याकडे कल असतो. मात्र, वानर आणि वन्यप्राणी यांनी भरवस्तीत आपला मोर्चा वळवल्याने येथील बागायतदार व शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. वन विभाग तसेच प्रशासनाने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. या जंगलतोडीमुळे अनेक गावांशेजारील जंगले ओसाड पडत आहेत. त्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे वळली आहेत. त्यातच वानरांनी तर अक्षरशः लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. वानरांच्या अनेक टोळ्या लोकवस्तीत शिरत असून घरावर उड्या मारत आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे, कौले फुटून नुकसान होत असल्याने तालुक्यातील नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे घरासमोरील परसबागेत चिकू, पपई, पेरू, केळी अशा फळझाडांनादेखील या वानरांनी लक्ष केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. बागायतदार वानरांना पळवून लावण्यासाठी फटाके लावतात. मात्र, ही वानरे फटाक्याच्या आवाजालाही घाबरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे.