शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

गुढीपाडव्याचा मुहूर्त यंदाही हापूसला हुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन लवकर येत असले तरी ऋतुचक्राचा फटका आंबा पिकाला बसल्याने उत्पादनात ...

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन लवकर येत असले तरी ऋतुचक्राचा फटका आंबा पिकाला बसल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, १५ एप्रिलपासून आंबा बाजारात टप्प्याटप्प्याने येण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याला आंबा विक्रीला पाठवून व्यवसायाचा मुहूर्त अनेकजण करतात. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविण्याची शक्यता आहे. गतवर्षी कोरोनामुळे मार्केट बंद असल्याने गुढीपाडव्याचा मुहूर्त शेतकऱ्यांना साधता आला नव्हता. यावर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊनचे सावट असले तरी मुहूर्त साधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्यामुळे उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. मुंबई उपनगरात दहा हजारपेक्षा अधिक किरकोळ व्यापारी, तर वाशी मार्केटमध्ये ६०० घाऊक व्यापारी आहेत. वाशी येथून हापूस खरेदी करून उपनगरातून विकण्यात येतो. बहुतांश शेतकरी वाशी मार्केटवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी हापूसच्या उत्पादनावर कमालीचा फरक झाला आहे. सध्या १२ ते १५ हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून विक्रीला पाठविण्यात येत आहेत. पाडव्यासाठी काही शेतकरी आंबा काढून विक्रीला पाठविण्याच्या तयारीत आहेत. गतवर्षी गुढीपाडवा सणावेळी लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद होते. त्यानंतर शासनाकडून आंबा विक्रीला परवानगी मिळाली होती. मात्र, वाशी मार्केटमध्येच कोरोना रुग्ण सापडल्याने विक्री व्यवस्था बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी विक्रीवर अवलंबून राहावे लागले होते.

चाैकट

गेल्या चार वर्षांतील आवक व दर पुढीलप्रमाणे :

वर्ष आंब्याची आवक दर

२०१७ ६०,००० १०००-३५०००

२०१८ १५,००० १५००- ४०००

२०१९ ४३,३७४ १२००-४०००

२०२० मार्केट बंद

२०२१ ००० २०००-४५००

चाैकट

दर कायम राहणे आवश्यक

कोकणातून १२ ते १५ हजार पेट्या आंबा वाशीमध्ये विक्रीला येत असला तरी अन्य राज्यातून १० ते १५ हजार क्रेट आंबा विक्रीला येत आहे. उत्पादन कमी असताना दर अद्याप टिकून आहेत. महागाईमुळे आंबा उत्पादन खर्चात वाढ झाली असून, दर शेवटपर्यंत कायम राहणे आवश्यक आहे. खासगी विक्रेते जाग्यावर ३५०० ते ४५०० रुपये दराने पेट्या खरेदी करीत असल्याने हमाली, वाहतूक खर्च वाचत असल्याने स्थानिक विक्री परवडत आहे.

चाैकट

अन्य राज्यांतील आंबा विक्रीला

कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथून केसर, बदामी, लालबाग, तोतापुरी, कर्नाटक हापूसची आवक सुरू आहे. केसर सध्या १०० ते १५० रुपये किलो, बदामी ६० ते ८० रुपये किलो, लालबाग ६० ते ७० रुपये किलो, तोतापुरी ३० ते ५० रुपये किलो, कर्नाटक हापूस १२० ते १६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत.

चाैकट

उत्पादनात घट

गतवर्षी पाडवा २५ मार्च रोजी हाेता. मात्र, त्यावेळी मार्केट बंद होते. २०१९ मध्ये ४३,३७४ पेट्या विक्रीला होत्या. २०१८ ला १५ हजार, तर २०१७ ला ६० हजार पेट्या विक्रीला होत्या. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत आवक घटली आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे कमी प्रमाणात आंबा विक्रीला जाण्याची शक्यता आहे.

चाैकट

उष्मा वाढला

मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा मार्चपासून सोसाव्या लागत आहेत. ३५ अंश सेल्सिअस कमाल, तर २८ अंश किमान तापमान असल्यामुळे ‘फळांचा राजा’ तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडत आहेत. भाजलेला आंबा बाजारात चालत नाही. शिवाय कैरीही गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दमट हवामानामुळे काही ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

कोट

यावर्षी हापूस उत्पादन कमी असल्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांच्या तुलनेत आवक घटली आहे. आखाती प्रदेश व युरोपमधून आंब्याला मागणी वाढत आहे. रमजानमुळे आंब्याला मागणी राहणार असल्याने दर बऱ्यापैकी टिकून राहतील. मात्र, गुढीपाडव्यानंतर आवक वाढण्याची शक्यता आहे.

- संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी.