शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:28 IST

लांबलेला पाऊस व हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाले. गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्केच आंबा उत्पादन आहे. मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात आला.  हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे.

ठळक मुद्देहापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यातशेतकऱ्यांची आर्थिक गणिते यावर्षीदेखील बिघडली

रत्नागिरी : लांबलेला पाऊस व हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाले. गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्केच आंबा उत्पादन आहे. मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात आला.  हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे.

आतापर्यंत ६० टक्के आंबा झाडावरून उतरविण्यात शेतकरी यशस्वी ठरले असले तरी अद्याप ४० टक्के पीक झाडावरच आहे. ढगाळ हवामानातून पावसाचे संकेत प्राप्त होत असतानाच, उर्वरित पीक पावसाळ्यापूर्वी हातात कसे येईल, याचीच चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण अधिकतम राहिले. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर येण्यास विलंब झाला. हवामानातील बदल व थंडीचे प्रमाण कमी यामुळे मोहोर उशिरा तर आलाच, शिवाय उत्पादनही खालावले.

मार्चपासून आंबा बाजारात येऊ लागला. मात्र, प्रमाण अत्यल्प होते. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात झाल्याने आंब्याला ग्राहक मिळेनासा झाला. वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील विक्रीवर परिणाम झाला.

दहा मेपर्यंत पेटीला तीन ते साडेतीन हजार रूपये दर मिळणे अपेक्षित होते. मात्र, तो दर गडगडला, आठशे ते अठराशे रूपये दराने पेटीची विक्री करण्यात आली. आंबा उत्पादनासाठी येणारा खर्च व मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते यावर्षीदेखील बिघडली आहेत.लॉकडाऊन काळात आंबा विक्रीचा प्रश्न उद्भवला असतानाच पणन व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री सुरू करण्यात आली. यामुळे वाशी बाजार समितीवर भिस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी दिलासा प्राप्त झाला. याव्दारे सव्वा लाख पेट्यांची विक्री करण्यात आल्याने विक्रीनंतरचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.निवडक आंब्याच्या पेट्या विक्रीसाठी भरल्यानंतर उर्वरित आंबा कॅनिंगसाठी घातला जातो. मात्र, यावर्षी कॅनिंगचेही दर कमी आहेत. २२ ते २३ रूपये दराने आंबा खरेदी सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये स्थानिक, मुंबई मार्केटमधील आंबा विक्रीवर परिणाम झाला असतानाच आखाती प्रदेशातील निर्यातीने तारले आहे. आतापर्यंत आठ हजार मेट्रिक टन आंबा निर्यात झाला आहे.उशिरा आलेल्या मोहोराचा आंबा अद्याप झाडावर आहे. पावसाने साथ दिली तर ३० मेपर्यंत काढणी करता येईल, शेवटचा आंबा हातात येईल. निसर्गातील बदलामुळे आधीच उत्पादन कमी असतानाच कोरोनामुळे विक्री व्यवस्थेवरही परिणाम झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. आंबा बाजारात येईपर्यंत येणारा खर्च व सध्या मिळणारा दर यात तफावत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी