शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:28 IST

लांबलेला पाऊस व हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाले. गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्केच आंबा उत्पादन आहे. मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात आला.  हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे.

ठळक मुद्देहापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यातशेतकऱ्यांची आर्थिक गणिते यावर्षीदेखील बिघडली

रत्नागिरी : लांबलेला पाऊस व हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाले. गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्केच आंबा उत्पादन आहे. मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात आला.  हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे.

आतापर्यंत ६० टक्के आंबा झाडावरून उतरविण्यात शेतकरी यशस्वी ठरले असले तरी अद्याप ४० टक्के पीक झाडावरच आहे. ढगाळ हवामानातून पावसाचे संकेत प्राप्त होत असतानाच, उर्वरित पीक पावसाळ्यापूर्वी हातात कसे येईल, याचीच चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण अधिकतम राहिले. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर येण्यास विलंब झाला. हवामानातील बदल व थंडीचे प्रमाण कमी यामुळे मोहोर उशिरा तर आलाच, शिवाय उत्पादनही खालावले.

मार्चपासून आंबा बाजारात येऊ लागला. मात्र, प्रमाण अत्यल्प होते. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात झाल्याने आंब्याला ग्राहक मिळेनासा झाला. वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील विक्रीवर परिणाम झाला.

दहा मेपर्यंत पेटीला तीन ते साडेतीन हजार रूपये दर मिळणे अपेक्षित होते. मात्र, तो दर गडगडला, आठशे ते अठराशे रूपये दराने पेटीची विक्री करण्यात आली. आंबा उत्पादनासाठी येणारा खर्च व मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते यावर्षीदेखील बिघडली आहेत.लॉकडाऊन काळात आंबा विक्रीचा प्रश्न उद्भवला असतानाच पणन व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री सुरू करण्यात आली. यामुळे वाशी बाजार समितीवर भिस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी दिलासा प्राप्त झाला. याव्दारे सव्वा लाख पेट्यांची विक्री करण्यात आल्याने विक्रीनंतरचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.निवडक आंब्याच्या पेट्या विक्रीसाठी भरल्यानंतर उर्वरित आंबा कॅनिंगसाठी घातला जातो. मात्र, यावर्षी कॅनिंगचेही दर कमी आहेत. २२ ते २३ रूपये दराने आंबा खरेदी सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये स्थानिक, मुंबई मार्केटमधील आंबा विक्रीवर परिणाम झाला असतानाच आखाती प्रदेशातील निर्यातीने तारले आहे. आतापर्यंत आठ हजार मेट्रिक टन आंबा निर्यात झाला आहे.उशिरा आलेल्या मोहोराचा आंबा अद्याप झाडावर आहे. पावसाने साथ दिली तर ३० मेपर्यंत काढणी करता येईल, शेवटचा आंबा हातात येईल. निसर्गातील बदलामुळे आधीच उत्पादन कमी असतानाच कोरोनामुळे विक्री व्यवस्थेवरही परिणाम झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. आंबा बाजारात येईपर्यंत येणारा खर्च व सध्या मिळणारा दर यात तफावत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी