शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाने मृत्यू होणाऱ्या व्यक्तीचे पार्थिव हे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावे व शासनाचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : कोरोनाने मृत्यू होणाऱ्या व्यक्तीचे पार्थिव हे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावे व शासनाचे सर्व अटी व शर्तीनुसार त्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार त्या कुटुंबीयांना करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तसे निवेदन काझी यांनी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याकडे दिले आहे. यावेळी राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, जामा मशिदीचे अध्यक्ष वजुद्दिन मुल्ला, नगरसेवक हनिफ युसुफ काझी, कलीम मुल्ला, सुफयान मुल्ला, साखरी नाटेचे मुश्ताक हुश्ये, मजिद कोतवडकर, अलिमियॉ वाडकर, शोएब मिरकर उपस्थित होते.

काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्या व्यक्तीचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात न देता त्याची प्रशासन स्तरावर परस्पर स्मशानात नेऊन दहन केले जाते. त्यावेळी कुटुंबीयांनाही मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन होत नाही. मृत झालेली व्यक्ती ही मग ती हिंदू असो वा मुस्लिम अथवा कोणत्याही जातीधर्माची असो त्या व्यक्तिचे संपूर्ण आयुष्य कुटुंबीयांसमवेत गेलेले असते. त्यांचे शेवटचे दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे कोरोना महामारीच्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर मृत्यू ओढावल्यास त्याचे किमान पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

......................................

राजापूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना हनिफ काझी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. राजापूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना हनिफ काझी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.