शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

तब्बल सात महिन्यांनी कागदपत्रे हाती

By admin | Updated: November 7, 2015 22:39 IST

गुहागर तालुका : शृंगारतळी डाकघर कार्यालयाचा भोंगळ कारभार

शृंगारतळी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन नोंदणीची कागदपत्रे सात महिन्यानंतर वाहनचालकाच्या ताब्यात मिळाल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील शृंगारतळी डाकघर कार्यालयात घडला आहे. या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर ही कागदपत्र पोस्टमनने दुसऱ्याच व्यक्तीच्या हाती सोपवल्याचे पुढे आले. त्या व्यक्तीने ही कागदपत्रे आपल्याकडे चक्क सात महिने ठेवली होती. या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.एप्रिल महिन्यात रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाठवलेली वाहन नोंदणीची कागदपत्रे चक्क सात महिन्याने संबंधीत व्यक्तीला मिळाली आहेत, ती ही एका अनोळखी व्यक्तीकडे. या प्रकारावरुन डाकघर कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेवटी वाहन मालकालाच स्वत: कागदपत्रे शोधण्यासाठी धावपळ करावी लागली आहे. प्रादेशिक कार्यालयात वाहनांची नोंदणी होऊन सात महिने उलटून कागदपत्रे मिळाली नाही म्हणून त्या व्यक्तीने उपप्रादेशिक विभागात संपर्क साधला. त्यावेळी सहा महिन्यांपूर्वीच स्पीड पोस्टाने पार्सल पाठवल्याची माहिती मिळाली. शृंगारतळी डाकघरात याबाबत विचारले असता आम्ही पत्र दिलेले आहे असे सांगण्यात आले. मात्र, पत्राची पोचपावती पाहिल्यावर एका अनोळखी व्यक्तीने सही करुन पत्र सोडवून घेतल्याचे दिसले. याबाबत जाब विचारला असता तुम्ही लेखी तक्रार करा, मग आम्ही चौकशी करु की तुमचे पत्र कुठे गेले आहे, असे सांगण्यात आले. चौकशीत आमची चूक असली तरी आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकाराला पोस्टमनच कारणीभूत आहे कारण पत्र वाटण्याची जवाबदारी पोस्टमनची आहे, असे म्हणत येथील अधिकाऱ्याने यातून अंग काढले. सही करणाऱ्याचा शोध घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सात महिने पार्सल संबंधिताला न देता स्वत:जवळ ठेवले होते. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्ग जवाबदारी झटकत असतील तर लोकांची कागदपत्रे ही आता रामभरोसेच सोडावी लागणार आहेत. मात्र, याठिकाणी काम करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे डाक खात्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर) 

कोणाचेही टपाल कोणाच्याही हाती

एखाद्या व्यक्तीच्या नावाने आलेली महत्वाची कागदपत्रं ही त्याच व्यक्तीच्या हाती देणे बंधनकारक आहे. त्यामुळेच अशी कागदपत्रं कुरिअरने न पाठवता विश्वसनीय अशा डाक कार्यालयामार्फत पाठवली जातात. जेणेकरून ती गहाळ न होता त्याच व्यक्तीच्या हाती पडावीत. मात्र, शृंगारतळी परिसरात कोणाचेही टपाल कोणाच्याही हाती दिले जात असल्याचे सदर प्रकारावरुन दिसून येत आहे.