शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या १६ मुलांना ‘माय राजापूर’चा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. तसेच धारतळे कोविड सेंटरलाही वस्तूरूपाने मदत केली.

या सोळा मुलांना महिनाभराचे अन्नधान्य, शालेय साहित्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. यासाठी मदत फेरी आखण्यात आल्या. पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना व कोंडये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तर दुसऱ्या फेरीत पेंडखले येथील निनावे, वडदहसोळ येथील पळसमकर, वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिसऱ्या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी आडिवरे येथील वारिक कुटुंबीयांना माय राजापूर संस्थेने मदत केली.

माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वत:कडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली. एकूण ८७ हजार रुपये या मदत कार्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात धारतळे येथील कोविड सेंटरलाही मदत देण्यात आली.

पती आपल्याला सोडून गेला, पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कसे होणार, म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानसशास्त्राच्या प्राध्यापिका दीपा ढेकणे यांची मदत घेतली. यासाठी माय राजापूरच्या सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. या हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क राखला. यापुढेही अशा अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर व अध्यक्ष जगदीश पवार यांनी बोलून दाखवला.

मदत कार्यात नरेश दसवंत, प्रकाश परवडी, ऋषिकेश कोळेकर, दत्तप्रसाद सिनकर या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका यांची मदत झाली.

----------------------------------

घरी जाऊन समुपदेशन

अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे. अनेक कुटुंबाची या कोरोनाच्या आघाताने फरपट झाली आहे. घरातील एकमेव कमवत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून त्यांनी सावरावे व आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्य त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करत होते.