शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या १६ मुलांना ‘माय राजापूर’चा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. तसेच धारतळे कोविड सेंटरलाही वस्तूरूपाने मदत केली.

या सोळा मुलांना महिनाभराचे अन्नधान्य, शालेय साहित्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. यासाठी मदत फेरी आखण्यात आल्या. पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना व कोंडये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तर दुसऱ्या फेरीत पेंडखले येथील निनावे, वडदहसोळ येथील पळसमकर, वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिसऱ्या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी आडिवरे येथील वारिक कुटुंबीयांना माय राजापूर संस्थेने मदत केली.

माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वत:कडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली. एकूण ८७ हजार रुपये या मदत कार्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात धारतळे येथील कोविड सेंटरलाही मदत देण्यात आली.

पती आपल्याला सोडून गेला, पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कसे होणार, म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानसशास्त्राच्या प्राध्यापिका दीपा ढेकणे यांची मदत घेतली. यासाठी माय राजापूरच्या सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. या हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क राखला. यापुढेही अशा अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर व अध्यक्ष जगदीश पवार यांनी बोलून दाखवला.

मदत कार्यात नरेश दसवंत, प्रकाश परवडी, ऋषिकेश कोळेकर, दत्तप्रसाद सिनकर या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका यांची मदत झाली.

----------------------------------

घरी जाऊन समुपदेशन

अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे. अनेक कुटुंबाची या कोरोनाच्या आघाताने फरपट झाली आहे. घरातील एकमेव कमवत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून त्यांनी सावरावे व आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्य त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करत होते.