शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या १६ मुलांना ‘माय राजापूर’चा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाने पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना ‘माय राजापूर’ने मदतीचा हात दिला. तसेच धारतळे कोविड सेंटरलाही वस्तूरूपाने मदत केली.

या सोळा मुलांना महिनाभराचे अन्नधान्य, शालेय साहित्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. यासाठी मदत फेरी आखण्यात आल्या. पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना व कोंडये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तर दुसऱ्या फेरीत पेंडखले येथील निनावे, वडदहसोळ येथील पळसमकर, वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिसऱ्या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी आडिवरे येथील वारिक कुटुंबीयांना माय राजापूर संस्थेने मदत केली.

माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वत:कडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली. एकूण ८७ हजार रुपये या मदत कार्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात धारतळे येथील कोविड सेंटरलाही मदत देण्यात आली.

पती आपल्याला सोडून गेला, पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कसे होणार, म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानसशास्त्राच्या प्राध्यापिका दीपा ढेकणे यांची मदत घेतली. यासाठी माय राजापूरच्या सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. या हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क राखला. यापुढेही अशा अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर व अध्यक्ष जगदीश पवार यांनी बोलून दाखवला.

मदत कार्यात नरेश दसवंत, प्रकाश परवडी, ऋषिकेश कोळेकर, दत्तप्रसाद सिनकर या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका यांची मदत झाली.

----------------------------------

घरी जाऊन समुपदेशन

अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे. अनेक कुटुंबाची या कोरोनाच्या आघाताने फरपट झाली आहे. घरातील एकमेव कमवत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून त्यांनी सावरावे व आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्य त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करत होते.