शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधी संचमान्यता; नंतर बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 22:08 IST

शिक्षण समिती सभा : आंतरजिल्हा बदलीबाबत नवीन निर्णय

रत्नागिरी : सन २०१५ची संचमान्यता झाल्याशिवाय आंतरजिल्हा बदलीला नाहरकत दाखला देऊ नये, असा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती विलास चाळके यांनी दिली. सभापती चाळके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. आंतर जिल्हा बदलीसाठी सध्या परजिल्ह्यातील शिक्षकांची धावपळ सुरु आहे. जिल्ह्यातील २५५ शिक्षक बदली करुन स्वत:च्या जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये ४१ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्यात येणार आहे, तर २१४ शिक्षकांना या बदलीसाठी नाहरकत दाखल्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे शिक्षक दररोज परिषद भवनात फेऱ्या मारीत आहेत. अनेकजण शिक्षण विभागाच्या बाहेर गर्दी करून बसलेले असतात. या शिक्षकांच्या बदल्यांबाबत बुधवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली. या आंतरजिल्हा बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा विषयही चर्चेत आला. त्यामुळे सन २०१५ सालची संचमान्यता झाल्याशिवाय या शिक्षकांना नाहरकत दाखला देऊ नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सभापत्ी चाळके यांनी सांगितले. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या रखडणार हे निश्चित आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अनेक शिक्षक कामगिरीवर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये काही शिक्षकांना सोयीची शाळा देण्यात आली आहे. या बदल्या करताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या सर्व बदल्या बेकायदेशीर आहेत. कामगिरीवर काढलेल्या शिक्षकांची कामगिरी रद्द करावी, असा आदेश सभापतींनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना या सभेत दिला. कामगिरी रद्द न करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी कायम करून त्यांची आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या २३६ प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. परंतु इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची अन्यत्र बदली झाल्यामुळे काही महिन्यातच सुमारे १२१ शाळांमधील सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे यापुढे सेमी इंग्रजी सुरु करण्यासाठी मंजुरी देताना शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी घेऊनच वर्ग सुरु करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. सर्वशिक्षा अभियानातून किचन शेडसाठी जिल्हा परिषदेकडे २ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. या खर्चाला या सभेत मंजुरी देण्यात आल्याचे सभापतींकडून सांगण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य प्रकाश शिवगण, सदस्या वेदा फडके, नेहा माने, माधवी खताते, जान्हवी धनावडे, सदस्य विकास नलावडे, सुनील साळवी आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)पोषण आहार : निकृष्ट धान्य न स्वीकारण्याची सूचनाकाही शाळांमध्ये पोषण आहाराचे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. भरड मूगडाळीचा नमुनाही या सभेत पदाधिकाऱ्यांनी आणला होता. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे धान्य आल्यास ते स्वीकारू नये, अशी सूचना सभापतींनी शाळांना दिली आहे.सभापतींच्या सूचनानिकृष्ट पोषण आहाराबाबत शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली. निकृष्ट दर्जाचा आहार कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिला जाऊ नये, याबाबत स्थानिक पातळीवर गंभीर रहावे, अशा सूचना यावेळी शिक्षण सभापतींनी केल्या.