शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच उत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी विविध ...

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच उत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार एस. टी. बस, रेल्वे तसेच खासगी वाहनांमधून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अथवा कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशानुसार, मुंबई, पुणे किंवा जिल्ह्याबाहेरून एस. टी. बसमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती बस ज्या ठिकाणाहून सुटेल, त्याचठिकाणी दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये दोन प्रतीत भरावी लागणार आहे. ही माहिती संबंधित तालुक्याच्या एस. टी. डेपोमध्ये जमा करावी. एस. टी. विभागाला ही माहिती संबंधित तहसील कार्यालयात रोजच्या रोज जमा करावी लागणार आहे. तहसीलदारांनी ही यादी कृती दलाकडे पाठवावी. त्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या आणि नावे कृती दलाला समजू शकतील आणि त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.

ग्राम/ नागरी कृती दलाने प्राप्त यादीनुसार त्यांचे गाव, वाडी-प्रभागमधील ज्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे व तपासणीकरिता अशा नागरिकांना स्थानिक आरोग्य कर्मचारी यंत्रणेमार्फत तपासणीसाठी नेण्याची जबाबदारी नागरी व ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. खासगी किंवा एस. टी. बस चालक-वाहकांना कोविड चाचणी अगोदरच करणे बंधनकारक असून, ती न केल्यास गाडी पोहोचण्याच्या ठिकाणावर चाचणी करावी लागणार आहे.

बाहेरून येणाऱ्यांना ७२ तास आधी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागणार आहे. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत, अशांना लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. हे दोन्ही प्रमाणपत्र नसलेल्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. कारोना चाचणीमध्ये बाधित आढळल्यास त्यांना तत्काळ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.