शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

गुहागर-विजापूर रस्त्याच्या ठेकेदाराकडून मार्गताम्हाणेवासीयांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणातील ठेकेदाराने तालुक्यातील मार्गताम्हाणेवासीयांना दिलेली आश्वासने हवेत विरण्याची शक्यता आहे. सुतारवाडी पुलाजवळ नदीकिनारी ...

चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणातील ठेकेदाराने तालुक्यातील मार्गताम्हाणेवासीयांना दिलेली आश्वासने हवेत विरण्याची शक्यता आहे. सुतारवाडी पुलाजवळ नदीकिनारी दोनही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, पद्मावती नदीच्या किनारी टाकलेला भराव व झाडे काढणे ही कामे दुर्लक्षित करण्यात आली आहेत. पावसाळा जवळ आला तरी ठेकेदाराकडून कोणतेही काम सुरु झालेले नसल्याने मार्गताम्हाणे व उमरोली या दोन्ही गावांना ठेकेदाराने ठेंगा दाखविल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

रस्ता रुंदीकरणात ठेकेदाराने मार्गताम्हाणे खुर्द - उमरोली सीमेवरील नदीवर पूल बांधण्यास सुरुवात केली. यावेळी नदीचा प्रवाह एका बाजूला तर पूल दुसऱ्या बाजूला असे पुलाचे बांधकाम केले. त्यामुळे पावसाळ्यात नदीला येणारे पुराचे पाणी दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये व शेतीमध्ये घुसून येथील ग्रामस्थांना धोका निर्माण होणार आहे. ही गोष्ट लक्षात येताच दोन्ही गावातील ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी त्याने चूक मान्य करत नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पावसाळा जवळ आला तरी अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तसेच मार्गताम्हाणे खुर्द व मार्गताम्हाणे बुद्रुक सीमेवरील पद्मावती नदीतील पाणी उचलण्यासाठी रस्ता तयार केला. यावेळी मातीचा भराव व नदीकाठची तोडलेली झाडीही नदीकिनारीच तसाच ठेवला. पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. या पुरात मातीचा भराव व झाडी वाहून जाऊन नदीच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण होणार आहे. ठेकेदाराने अद्याप मातीचा भराव व तोडलेली झाडी उचललेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

मार्गताम्हाणे शाळेजवळील महामार्गाला लागून असलेल्या जोडरस्त्यावर ठेकेदाराने एका रात्रीत मातीचा व खडीचा भराव टाकला. या जोडरस्त्याला दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी तुंबून तळे बनते. वास्तविक येथे मोरी टाकणे गरजेचे असताना, ठेकेदाराने येथे केवळ माती व खडी टाकून ग्रामस्थांची बोळवण केली आहे. पावसाळ्यात येथे चिखल साचून पुन्हा तळे होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वाहनचालक व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ठेकेदाराने येथे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.