शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीचा दर कमी होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : गतवर्षी कोरोना संसर्गापासून दूर असणारा राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येत गतिमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : गतवर्षी कोरोना संसर्गापासून दूर असणारा राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येत गतिमान राहिला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात मंदावली असून, रुग्णसंख्या वाढीचा दर घटला आहे.

गतवर्षी कोरोना संक्रमणाबाबत राजापूर शहर आणि संपूर्ण तालुका कायम ‘सेफ झोन’ म्हणून ओळखला जात होता. तालुक्यातील सुमारे ९५ टक्के गावांनी कोरोनाला गावात प्रवेशच दिला नव्हता. मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात मृत्यूंचे प्रमाणही वाढले. सध्या राजापूर तालुक्यात कोरोनाचे ३३२ रुग्ण ॲक्टिव्ह असून, एकूण रुग्णसंख्या ४,५६१ एवढी झाली आहे.

राजापूर तालुक्यात आजपर्यंत सापडलेल्या ४,५६१ कोरोना रुग्णांपैकी ४,०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १७६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर चांगलाच आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली होती. पुणे, मुंबईसारख्या महानगरांतून येणाऱ्या चाकरमान्यांचे १४ दिवसांचे अलगीकरण करण्यात येत होते. त्यावर ग्राम कृती दल आणि आरोग्य विभागाने लक्ष ठेवले होते. त्यामुळे १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही इतरांमध्ये मिसळता येत नव्हते.

यावर्षी दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन केलेले नसल्याने त्याचा परिणाम कोरोना रुग्णसंख्या वाढण्यात झाला. शिमग्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून आली. प्रशासनही अनेक नियमांकडे दुर्लक्ष करत होते. यावर्षीची लग्नसराई राजापूर तालुक्यासाठी कोरोना रुग्णसंख्येत वाढ करणारी ठरली. मुंबई, पुण्यातून येणारे चाकरमानी यावर्षी विलगीकरणात न राहता आपापल्या कुटुंबात मिसळल्याने कोरोना संक्रमण अधिक झाले. या दुसऱ्या लाटेमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले. यावेळी मृत्यूंचे प्रमाणही वाढले. त्यातच सर्व वयोगटातील लोक मृत्यूमुखी पडत असल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.

राजापूर तालुका

एकूण रुग्ण ४,५६१

कोरोनामुक्त ४,०५३

मृत्यू १७६

सक्रिय रुग्ण ३३२

गृह अलगीकरण २३२

संस्थात्मक ०