शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

वाढत्या कोरोना चाचण्या संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे रुग्ण लवकर लक्षात येऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे रुग्ण लवकर लक्षात येऊ लागले आहेत. कोरोना रुग्ण जितक्या लवकर लक्षात येतील, तेवढ्या लवकर त्यांच्यावर उपचार होऊ शकतील आणि संसर्गाचे प्रमाण कमी होईल. एका बाजूला लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूला वाढलेल्या चाचण्या यामुळे पुढील दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा अजूनही त्यात नाही. त्यामुळे रत्नागिरी अनलॉक होणार कधी, असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. सध्या रत्नागिरीतील रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. त्याबाबतही लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. लॉकडाऊन करूनही त्या काळात रुग्ण वाढतात कसे, असा प्रश्नही लोकांच्या मनात कायम आहे. मात्र, प्रशासनाने घेतलेले निर्णय गरजेचे असल्याचे पुढील दोन आठवड्यांत दिसेल, असे अपेक्षित आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवसाला सरासरी २१०० कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. २५ ते ३१ मे या सात दिवसांत १४ हजार ५५७ चाचण्या झाल्या. जून महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत हेच प्रमाण वाढवण्यात आले आणि त्यामुळे या सात दिवसांत ३१०० च्या सरासरीने २१ हजार ७०६ चाचण्या झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात रुग्ण झपाट्याने वाढत होते. त्यामुळे गावपातळीवरील चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत आणि या चाचण्या वाढल्यानेच लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या वाढतीच दिसत आहे. कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. असे रुग्ण विषाणूवाहक म्हणून घातक ठरतात. तपासणी केल्याखेरीज ते रुग्ण आहेत, हे लक्षात येत नाहीत. त्यामुळे या तपासण्या फायदेशीर होत आहेत.

चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्ण लवकर निदर्शनास आले आणि त्यांच्यावर उपचारही वेळेत सुरू झाले आहेत. त्याचवेळी लॉकडाऊन असल्यानेही संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. वाढलेल्या चाचण्या आणि लॉकडाऊन या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील दोन आठवड्यात रुग्णसंख्या कमी झालेली दिसेल, असा अंदाज आहे.

............................

रुग्ण लवकर सापडावेत, यासाठी जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. रुग्ण वेळेत निष्पन्न झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार होऊ शकतील. त्याचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चांगला उपयोग होईल.

-लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी