शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

रत्नागिरी जिल्हा : दमदार पाऊस नसल्याने संकट कायम

रत्नागिरी : जिल्ह्यात ९८ गवांतील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. या टंचाईग्रस्तांना केवळ २५ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा असल्याची ओरड सुरु आहे़जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला असला तरी अजूनही पाणीटंचाई कमी झालेली नाही. उलट दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावलेली आहे. जिल्ह्यात गतवर्षी या दिवसांमध्ये १२२ गावातील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. मात्र, गतवर्षीची पाणी टंचाईची स्थिती पाहता यंदाची पाणीटंचाईग्रस्तांची संख्या खूप कमी आहे. तरीही लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय ११ टँकर्स आणि खासगी १४ टँकर्स अशा एकूण २५ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पाणी पुरवठाही अपूर्ण होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. शासनाकडून केवळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या पाणीटंचाईमुळे गुरांची तडफड सुरु आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये भीषण वास्तव असून दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्याच्या घोषमा हवेत विरल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र टंचाईबाबतअद्यापही पूर्ण उपाय करण्यात आलेले नसल्यानेच टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढत आहे. (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर्स पुढीलप्रमाणेतालुका गावे वाड्या टँकर्समंडणगड ४ ८ १दापोली १० २० २खेड २१ ४० ६गुहागर ९ ३८ २चिपळूण १२ ४२ ३संगमेश्वर १९ २५ ३रत्नागिरी ५ १० ३लांजा १० २२ ३राजापूर ८ २२ २एकूण-- ९८ २२७ २५