शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

उत्पन्नात तब्बल दोन कोटींची वाढ

By admin | Updated: December 2, 2015 00:44 IST

हंगामी तिकीट : रत्नागिरी एस. टी. विभाग

रत्नागिरी : दिवाळीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस. टी.ला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. वीस दिवसात रत्नागिरी विभागाला १६ कोटी ३६ लाख ९७ हजारांचे उत्पन्न लाभले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. गतवर्षी दिवाळी सुटीत रत्नागिरी विभागाला १४ कोटी १६ लाख ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ कोटी २० लाख २४ हजाराने उत्पन्नात वाढ झाली आहे.महामंडळाला लवचिक भाडेवाढीचा अधिकार आहे. पहिल्यांदाच दिवाळी सुटीत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. साध्या व रातराणी गाडीसाठी १० टक्के, निमआराम गाडीसाठी १५ टक्के, वातानुकुलीत बससाठी २० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. २२ आॅगस्ट २०१४ रोजी महामंडळातर्फे नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाच्या दरातील चढउतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले होते. दिवाळीच्या सुटीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. पहिल्या स्टेजला एक रुपया दराने भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या दरवाढीचा महामंडळाला फायदा झाला आहे.गतवर्षी दीपावली आॅक्टोबरमध्ये होती. त्यावेळी रत्नागिरी विभागाला १४ कोटी १६ लाख ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तर दिवाळीच्या दिवसात १६ कोटी ३६ लाख ९७ हजारांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ कोटी २० लाख २४ हजार इतके उत्पन्न जास्त मिळाले. हंगामी तिकीटवाढीमुळे प्रवासी भारमानावर परिणाम होईल, असे सुरूवातीला वाटले होते. मात्र, भारमानावर परिणाम न होता, उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. महामंडळाने हंगामी भाडेवाढीचा घेतलेला निर्णय फायद्याचा ठरला आहे. त्यामुळे यापुढेही हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय महामंडळ घेऊ शकते. (प्रतिनिधी)