शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

उत्पन्नात तब्बल दोन कोटींची वाढ

By admin | Updated: December 2, 2015 00:44 IST

हंगामी तिकीट : रत्नागिरी एस. टी. विभाग

रत्नागिरी : दिवाळीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस. टी.ला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. वीस दिवसात रत्नागिरी विभागाला १६ कोटी ३६ लाख ९७ हजारांचे उत्पन्न लाभले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. गतवर्षी दिवाळी सुटीत रत्नागिरी विभागाला १४ कोटी १६ लाख ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ कोटी २० लाख २४ हजाराने उत्पन्नात वाढ झाली आहे.महामंडळाला लवचिक भाडेवाढीचा अधिकार आहे. पहिल्यांदाच दिवाळी सुटीत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. साध्या व रातराणी गाडीसाठी १० टक्के, निमआराम गाडीसाठी १५ टक्के, वातानुकुलीत बससाठी २० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. २२ आॅगस्ट २०१४ रोजी महामंडळातर्फे नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाच्या दरातील चढउतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले होते. दिवाळीच्या सुटीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. पहिल्या स्टेजला एक रुपया दराने भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या दरवाढीचा महामंडळाला फायदा झाला आहे.गतवर्षी दीपावली आॅक्टोबरमध्ये होती. त्यावेळी रत्नागिरी विभागाला १४ कोटी १६ लाख ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तर दिवाळीच्या दिवसात १६ कोटी ३६ लाख ९७ हजारांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ कोटी २० लाख २४ हजार इतके उत्पन्न जास्त मिळाले. हंगामी तिकीटवाढीमुळे प्रवासी भारमानावर परिणाम होईल, असे सुरूवातीला वाटले होते. मात्र, भारमानावर परिणाम न होता, उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. महामंडळाने हंगामी भाडेवाढीचा घेतलेला निर्णय फायद्याचा ठरला आहे. त्यामुळे यापुढेही हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय महामंडळ घेऊ शकते. (प्रतिनिधी)