शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डेरवण धरणाने आणली हरितक्रांती

By admin | Updated: April 24, 2016 23:22 IST

जंगलाच्या पायथ्याशी प्रकल्प : धरण प्रकल्प पंचक्रोशीतील गावांसाठी ठरतयं वरदान

रवींद्र कोकाटे -- सावर्डेसह्याद्रीच्या डोंगर पायथ्याशी गर्द जंगलाच्या कुशीत उभारण्यात आलेला डेरवण राजेशाही धरण प्रकल्प पंचक्रोशीतील २५हून अधिक गावांना वरदान ठरला आहे. येथील पिण्याच्या पाण्याबरोबर शेती, शेतीपूरक उद्योग, व्यवसायांना भरभराट आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्रोत वाढलेच. पण शेतीमध्ये अनेक पिके निघू लागल्याने येथे आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार शेती दिसू लागली.चिपळूण तालुक्यातील सावर्डे -डेरवण येथील दंड जंगलाच्या पायथ्याशी १९९९मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाली. प्रकल्प उभारणीत तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार यांनी मदत केल्याने व डेरवण वालावलकर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली. यामध्ये सावर्डेवासीयांचे सहकार्य मोलाचे ठरले. रत्नागिरी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या अधिपत्याखाली प्रकल्प पूर्णत्त्वास नेला. धरणाची लांबी ४६० मीटर, उंची ४०.८० मीटर पाणलोट क्षेत्र ७.७९ चौरस किमी, सांडवा लांबी ५४.०० मीटर, संचय पातळी १५४ मीटर, बुडित क्षेत्र ३९.४८, तर एकूण पाणीसाठा ३.२३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे १८३ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. ३.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरला जातो.या प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील सावर्डे-डेरवण, हलकर्णी, काजारकोंड, उदेगवाडी, कासारवाडी, आगवे, मांडकी खुर्द, निवळी, भुवडवाडी, तुरंबव, दहीवली, आबिटगाव आदी वस्त्यांमधील ६०हून अधिक ग्रामपंचायती व अन्य विहिरींचे जलस्रोत वाढून पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, या धरणातून वाहणारे पाणी कापशी नदीपात्रातून वाहात जाते. या नदीपात्रात विहिरी, ओढे, डुऱ्यांना पाणी पातळी वाढ झाली आहे. धरणामधील पाणीसाठा संपला तरी नदी पात्राशेजारच्या विहिरींना किमान एक महिनाहून अधिक काळ पाणी उपलब्ध असते.प्रकल्प होण्याअगोदर परिसरातील गावांना कवे, विहीर यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाइचे दुर्भिक्ष्य ओढवत असे. पाण्यासाठी महिलांना विहिरीवरून मैलोनमैल पाणी डोक्यावरुन आणावे लागत होते. परंतु या धरणामुळे सावर्डे परिसरातील गावांना पाण्याच्या योजना झाल्या आणि लोकांच्या घरोघरी पाण्याचे नळ गेले.या नदीपात्रातील पाण्याचा उपयोग भाजीपाला, फूलशेती, विविध फलोत्पादन आंबा, काजू, नारळ, आंबा, केळी, कलिंगड आदी पिके घेण्यासाठी होत आहे. या पिकांकडे शेतकरी काहीअंशी वळला असून, तो उत्पादनातून आर्थिक स्तर उंचावताना दिसत आहे. कोकणचा कायापालट करायचा असेल तर डोंगर-दऱ्यातून वाहणारे पाणी अडवणे, अडवलेले पाणी जमिनीत मुरवणे व दीर्घकालीन जलसाठे निर्मिती करणे ही जबाबदारी आहेच, पण अशा डोंगरदऱ्यांमध्येही मध्यम स्वरुपाचे पाझर तलाव अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाला जलसंधारण धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. परंतु हे या सरकारमध्ये दिसत नाही, असे मत शेखर निकम यांनी व्यक्त केले.