शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

डेरवण धरणाने आणली हरितक्रांती

By admin | Updated: April 24, 2016 23:22 IST

जंगलाच्या पायथ्याशी प्रकल्प : धरण प्रकल्प पंचक्रोशीतील गावांसाठी ठरतयं वरदान

रवींद्र कोकाटे -- सावर्डेसह्याद्रीच्या डोंगर पायथ्याशी गर्द जंगलाच्या कुशीत उभारण्यात आलेला डेरवण राजेशाही धरण प्रकल्प पंचक्रोशीतील २५हून अधिक गावांना वरदान ठरला आहे. येथील पिण्याच्या पाण्याबरोबर शेती, शेतीपूरक उद्योग, व्यवसायांना भरभराट आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्रोत वाढलेच. पण शेतीमध्ये अनेक पिके निघू लागल्याने येथे आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार शेती दिसू लागली.चिपळूण तालुक्यातील सावर्डे -डेरवण येथील दंड जंगलाच्या पायथ्याशी १९९९मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाली. प्रकल्प उभारणीत तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार यांनी मदत केल्याने व डेरवण वालावलकर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली. यामध्ये सावर्डेवासीयांचे सहकार्य मोलाचे ठरले. रत्नागिरी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या अधिपत्याखाली प्रकल्प पूर्णत्त्वास नेला. धरणाची लांबी ४६० मीटर, उंची ४०.८० मीटर पाणलोट क्षेत्र ७.७९ चौरस किमी, सांडवा लांबी ५४.०० मीटर, संचय पातळी १५४ मीटर, बुडित क्षेत्र ३९.४८, तर एकूण पाणीसाठा ३.२३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे १८३ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. ३.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरला जातो.या प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील सावर्डे-डेरवण, हलकर्णी, काजारकोंड, उदेगवाडी, कासारवाडी, आगवे, मांडकी खुर्द, निवळी, भुवडवाडी, तुरंबव, दहीवली, आबिटगाव आदी वस्त्यांमधील ६०हून अधिक ग्रामपंचायती व अन्य विहिरींचे जलस्रोत वाढून पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, या धरणातून वाहणारे पाणी कापशी नदीपात्रातून वाहात जाते. या नदीपात्रात विहिरी, ओढे, डुऱ्यांना पाणी पातळी वाढ झाली आहे. धरणामधील पाणीसाठा संपला तरी नदी पात्राशेजारच्या विहिरींना किमान एक महिनाहून अधिक काळ पाणी उपलब्ध असते.प्रकल्प होण्याअगोदर परिसरातील गावांना कवे, विहीर यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाइचे दुर्भिक्ष्य ओढवत असे. पाण्यासाठी महिलांना विहिरीवरून मैलोनमैल पाणी डोक्यावरुन आणावे लागत होते. परंतु या धरणामुळे सावर्डे परिसरातील गावांना पाण्याच्या योजना झाल्या आणि लोकांच्या घरोघरी पाण्याचे नळ गेले.या नदीपात्रातील पाण्याचा उपयोग भाजीपाला, फूलशेती, विविध फलोत्पादन आंबा, काजू, नारळ, आंबा, केळी, कलिंगड आदी पिके घेण्यासाठी होत आहे. या पिकांकडे शेतकरी काहीअंशी वळला असून, तो उत्पादनातून आर्थिक स्तर उंचावताना दिसत आहे. कोकणचा कायापालट करायचा असेल तर डोंगर-दऱ्यातून वाहणारे पाणी अडवणे, अडवलेले पाणी जमिनीत मुरवणे व दीर्घकालीन जलसाठे निर्मिती करणे ही जबाबदारी आहेच, पण अशा डोंगरदऱ्यांमध्येही मध्यम स्वरुपाचे पाझर तलाव अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाला जलसंधारण धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. परंतु हे या सरकारमध्ये दिसत नाही, असे मत शेखर निकम यांनी व्यक्त केले.