शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

डेरवण धरणाने आणली हरितक्रांती

By admin | Updated: April 24, 2016 23:22 IST

जंगलाच्या पायथ्याशी प्रकल्प : धरण प्रकल्प पंचक्रोशीतील गावांसाठी ठरतयं वरदान

रवींद्र कोकाटे -- सावर्डेसह्याद्रीच्या डोंगर पायथ्याशी गर्द जंगलाच्या कुशीत उभारण्यात आलेला डेरवण राजेशाही धरण प्रकल्प पंचक्रोशीतील २५हून अधिक गावांना वरदान ठरला आहे. येथील पिण्याच्या पाण्याबरोबर शेती, शेतीपूरक उद्योग, व्यवसायांना भरभराट आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्रोत वाढलेच. पण शेतीमध्ये अनेक पिके निघू लागल्याने येथे आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार शेती दिसू लागली.चिपळूण तालुक्यातील सावर्डे -डेरवण येथील दंड जंगलाच्या पायथ्याशी १९९९मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाली. प्रकल्प उभारणीत तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार यांनी मदत केल्याने व डेरवण वालावलकर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली. यामध्ये सावर्डेवासीयांचे सहकार्य मोलाचे ठरले. रत्नागिरी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या अधिपत्याखाली प्रकल्प पूर्णत्त्वास नेला. धरणाची लांबी ४६० मीटर, उंची ४०.८० मीटर पाणलोट क्षेत्र ७.७९ चौरस किमी, सांडवा लांबी ५४.०० मीटर, संचय पातळी १५४ मीटर, बुडित क्षेत्र ३९.४८, तर एकूण पाणीसाठा ३.२३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे १८३ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. ३.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरला जातो.या प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील सावर्डे-डेरवण, हलकर्णी, काजारकोंड, उदेगवाडी, कासारवाडी, आगवे, मांडकी खुर्द, निवळी, भुवडवाडी, तुरंबव, दहीवली, आबिटगाव आदी वस्त्यांमधील ६०हून अधिक ग्रामपंचायती व अन्य विहिरींचे जलस्रोत वाढून पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, या धरणातून वाहणारे पाणी कापशी नदीपात्रातून वाहात जाते. या नदीपात्रात विहिरी, ओढे, डुऱ्यांना पाणी पातळी वाढ झाली आहे. धरणामधील पाणीसाठा संपला तरी नदी पात्राशेजारच्या विहिरींना किमान एक महिनाहून अधिक काळ पाणी उपलब्ध असते.प्रकल्प होण्याअगोदर परिसरातील गावांना कवे, विहीर यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाइचे दुर्भिक्ष्य ओढवत असे. पाण्यासाठी महिलांना विहिरीवरून मैलोनमैल पाणी डोक्यावरुन आणावे लागत होते. परंतु या धरणामुळे सावर्डे परिसरातील गावांना पाण्याच्या योजना झाल्या आणि लोकांच्या घरोघरी पाण्याचे नळ गेले.या नदीपात्रातील पाण्याचा उपयोग भाजीपाला, फूलशेती, विविध फलोत्पादन आंबा, काजू, नारळ, आंबा, केळी, कलिंगड आदी पिके घेण्यासाठी होत आहे. या पिकांकडे शेतकरी काहीअंशी वळला असून, तो उत्पादनातून आर्थिक स्तर उंचावताना दिसत आहे. कोकणचा कायापालट करायचा असेल तर डोंगर-दऱ्यातून वाहणारे पाणी अडवणे, अडवलेले पाणी जमिनीत मुरवणे व दीर्घकालीन जलसाठे निर्मिती करणे ही जबाबदारी आहेच, पण अशा डोंगरदऱ्यांमध्येही मध्यम स्वरुपाचे पाझर तलाव अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाला जलसंधारण धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. परंतु हे या सरकारमध्ये दिसत नाही, असे मत शेखर निकम यांनी व्यक्त केले.