शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

म्युकरमायकोसिसचा कोकणाला धोका अधिक, काळजी घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात आता पावसाळा जवळ येत आहे. या काळात आर्द्रता अधिकच वाढते. त्यामुळे हा आजार अधिक बळावतो. त्यामुळे कोकणातील लोकांनी विशेषत: ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्वसननलिकेप्रमाणेच डोळ्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याने त्याबाबत सजग राहण्याची वेळ आली आहे.

काळी बुरशी हवेतच असते. जखम किंवा श्वसनाद्वारे ती आपल्या शरीरात जाते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे, अशा लोकांना त्याचा त्रास होत नाही. त्या बुरशीवर मात होते; पण ज्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांना मात्र त्याचा त्रास सुरू होतो. त्यासाठी शरीराकडे, त्यात होणाऱ्या बदलांकडे, आजारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत इन्फिगो आय केअरच्या डॉ. श्रीधर ठाकूर यांनी व्यक्त केले. कोकणातील हवामानात मुळातच आर्द्रता आहे. त्यामुळे या भागात काळ्या बुरशीचे आजार आधीपासूनच आहेत; पण आतापर्यंत त्याबाबतची तीव्रता, त्याच्या परिणामांची तीव्रता पुढे आली नव्हती; पण आता कोरोनाकाळात ही तीव्रता स्पष्टपणे पुढे आली आहे. त्यातच आता पावसाळा येत आहे. या काळात काळी बुरशी वाढते. त्यामुळे त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे डॉ. ठाकूर, डॉ. किरण हिरजे आणि डॉ. नितीन भगत यांनी सांगितले.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात असा रुग्ण असल्याचे समोर आलेले नाही. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आर्द्रता अधिक असल्याने या आजाराची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे रत्नागिरीत अजून रुग्ण आढळला नसला तरी ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

...................

म्युकरमायकोसिसची लक्षणे

श्वसनातून किंवा जखमेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या बुरशीमुळे टाळू, श्वसननलिका मार्गावर काळे डाग पडू लागतात.

नाकातून रक्त येते, काळसर पाणी वाहू लागले.

बुरशी डोळ्यांपर्यंत पोहोचल्यास डोळे येतात. (लाल होतात)

डोळ्यातून सतत पाणी येते. पापण्या सुजतात.

..............................

रुग्णावरचे परिणाम

काळ्या बुरशीचा ॲटॅक ज्या भागावर झाला आहे, त्या भागावर खूप मोठे परिणाम होतात. बुरशीचा प्रभाव झाला आहे, अशा अवयवाचे नुकसान होते. त्या अवयवांची काम करण्याची प्रक्रिया कमी होते.

डोळ्यांना त्याची बाधा झाल्यास सर्वात प्रथम अंधूक दिसू लागते. वेळेवर इलाज न झाल्यास बुरशी पसरली (वाढली) की दुहेरी प्रतिमा दिसू लागतात. तिरळेपणा येतो. त्याही पुढच्या टप्प्यात अंधत्व येते किंवा डोळा काढून टाकावा लागतो.

............................

कोणाला होऊ शकतो हा आजार

ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना हा आजार होतो.

तीव्र मधुमेही, ज्यांची किडनी बदलण्यात आली आहे, अशांना त्याचा त्रास लवकर होतो.

आता कोविडकाळात याचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसते. कोविडपश्चात म्युकरमायकोसिसचा त्रास होण्याची शक्यता अधिक बळावते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांना कोविडचा त्रास होतो. कोविडच्या औषधांमधून स्टेरॉइडचा मारा होतो. त्याने फुप्फुसाची काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अशा लोकांना काळ्या बुरशीच्या आजाराचा त्रास होऊ शकतो, असे डॉ. हिरजे यांनी सांगितले.

...............................

वर्गीकरण करायला हवे

उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्यांच्या साथी येतात. डोळे लाल होणे, डाेळ्यांना खाज येणे, डोळे येणे अशा साथी या दिवसात असतात. ही लक्षणे आणि म्युकरमायकोसिसची लक्षणे यात काय फरक आहे, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. हे त्रास झाल्यावर लाेकांना म्युकरमायकोसिसची भीती वाटू लागली आहे. म्युकरमायकोसिसमध्ये डोळ्यांना खाज येत नाही. काळे डाग दिसतात. त्यादृष्टीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे डॉ. नितीन भगत यांनी सांगितले.