शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

म्युकरमायकोसिसचा कोकणाला धोका अधिक, काळजी घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात आता पावसाळा जवळ येत आहे. या काळात आर्द्रता अधिकच वाढते. त्यामुळे हा आजार अधिक बळावतो. त्यामुळे कोकणातील लोकांनी विशेषत: ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्वसननलिकेप्रमाणेच डोळ्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याने त्याबाबत सजग राहण्याची वेळ आली आहे.

काळी बुरशी हवेतच असते. जखम किंवा श्वसनाद्वारे ती आपल्या शरीरात जाते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे, अशा लोकांना त्याचा त्रास होत नाही. त्या बुरशीवर मात होते; पण ज्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांना मात्र त्याचा त्रास सुरू होतो. त्यासाठी शरीराकडे, त्यात होणाऱ्या बदलांकडे, आजारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत इन्फिगो आय केअरच्या डॉ. श्रीधर ठाकूर यांनी व्यक्त केले. कोकणातील हवामानात मुळातच आर्द्रता आहे. त्यामुळे या भागात काळ्या बुरशीचे आजार आधीपासूनच आहेत; पण आतापर्यंत त्याबाबतची तीव्रता, त्याच्या परिणामांची तीव्रता पुढे आली नव्हती; पण आता कोरोनाकाळात ही तीव्रता स्पष्टपणे पुढे आली आहे. त्यातच आता पावसाळा येत आहे. या काळात काळी बुरशी वाढते. त्यामुळे त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे डॉ. ठाकूर, डॉ. किरण हिरजे आणि डॉ. नितीन भगत यांनी सांगितले.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात असा रुग्ण असल्याचे समोर आलेले नाही. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आर्द्रता अधिक असल्याने या आजाराची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे रत्नागिरीत अजून रुग्ण आढळला नसला तरी ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

...................

म्युकरमायकोसिसची लक्षणे

श्वसनातून किंवा जखमेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या बुरशीमुळे टाळू, श्वसननलिका मार्गावर काळे डाग पडू लागतात.

नाकातून रक्त येते, काळसर पाणी वाहू लागले.

बुरशी डोळ्यांपर्यंत पोहोचल्यास डोळे येतात. (लाल होतात)

डोळ्यातून सतत पाणी येते. पापण्या सुजतात.

..............................

रुग्णावरचे परिणाम

काळ्या बुरशीचा ॲटॅक ज्या भागावर झाला आहे, त्या भागावर खूप मोठे परिणाम होतात. बुरशीचा प्रभाव झाला आहे, अशा अवयवाचे नुकसान होते. त्या अवयवांची काम करण्याची प्रक्रिया कमी होते.

डोळ्यांना त्याची बाधा झाल्यास सर्वात प्रथम अंधूक दिसू लागते. वेळेवर इलाज न झाल्यास बुरशी पसरली (वाढली) की दुहेरी प्रतिमा दिसू लागतात. तिरळेपणा येतो. त्याही पुढच्या टप्प्यात अंधत्व येते किंवा डोळा काढून टाकावा लागतो.

............................

कोणाला होऊ शकतो हा आजार

ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना हा आजार होतो.

तीव्र मधुमेही, ज्यांची किडनी बदलण्यात आली आहे, अशांना त्याचा त्रास लवकर होतो.

आता कोविडकाळात याचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसते. कोविडपश्चात म्युकरमायकोसिसचा त्रास होण्याची शक्यता अधिक बळावते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांना कोविडचा त्रास होतो. कोविडच्या औषधांमधून स्टेरॉइडचा मारा होतो. त्याने फुप्फुसाची काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अशा लोकांना काळ्या बुरशीच्या आजाराचा त्रास होऊ शकतो, असे डॉ. हिरजे यांनी सांगितले.

...............................

वर्गीकरण करायला हवे

उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्यांच्या साथी येतात. डोळे लाल होणे, डाेळ्यांना खाज येणे, डोळे येणे अशा साथी या दिवसात असतात. ही लक्षणे आणि म्युकरमायकोसिसची लक्षणे यात काय फरक आहे, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. हे त्रास झाल्यावर लाेकांना म्युकरमायकोसिसची भीती वाटू लागली आहे. म्युकरमायकोसिसमध्ये डोळ्यांना खाज येत नाही. काळे डाग दिसतात. त्यादृष्टीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे डॉ. नितीन भगत यांनी सांगितले.