शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उक्ताडला ‘ग्रॅव्हिटी’ने पाणी

By admin | Updated: May 26, 2015 00:56 IST

चिपळूण पालिका : खेंड, कांगणेवाडी, कानसेवाडी, मापारी मोहल्ल्याचाही प्रश्न सुटणार

चिपळूण : शहरातील खेंड, उक्ताड, कांगणेवाडी, कानसेवाडी, मापारी मोहल्ला परिसराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. या भागात एकाचवेळी खेंड कांगणेवाडी येथील टाकीतून ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होणार असल्याने येथील पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. यासाठी उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती लियाकत शाह यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.हे काम सुरू असून, येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे. गेले सहा महिने हा प्रश्न सुटत नव्हता. जागामालकाच्या वादामुळे पाईपलाईन टाकणे शक्य होत नव्हते. उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांच्या प्रयत्नाने हे काम मार्गी लागले असून, ग्रॅव्हिटीसाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. दोन दिवसात ते पूर्ण होऊन येथील नागरिकांना एकाचवेळी पाणी मिळणार आहे. यापूर्वी गोवळकोट येथील पाणी खेर्डीतून पंपाच्या सहाय्याने कांगणेवाडीतील ६० हजार लीटर टाकीत चढवले जायचे. हे पाणी चढवण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागायचा. त्यानंतर हेच पाणी कांगणेवाडी, खेंड चौकी, उक्ताड, मापारी मोहल्ला, कानसेवाडी या भागाला टप्प्याटप्प्याने सोडले जायचे. वीज गेल्यानंतर त्यामध्ये व्यत्यय यायचा. शिवाय खेंड येथील पंपामधील बिघाड यामुळे कांगणेवाडी, खेंड चौकी, उक्ताड भागाला अवेळी पाणीपुरवठा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम होती. या समस्येमुळे नागरिक सातत्याने नगर परिषदेकडे विचारणा करीत होते. याची दखल शाह यांनी घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. यासाठी स्वत: लक्ष घालून त्यांनी ग्रॅव्हिटीची योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी नगराध्यक्षा सावित्री होमकळस व सर्व सदस्यांची सहमती मिळवली आणि नगर परिषदेच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली. कांगणेवाडीतील पाण्याची टाकी तब्बल आठ लाख लीटरची असून, ही टाकी ५५ मीटर उंचीवर आहे. या टाकीतून ग्रॅव्हिटीने सर्व भागाला एकाचवेळी उच्चदाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे खेंड येथील पंपसेट बंद ठेवावा लागणार आहे. एकाचवेळी सर्व भागाना ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा होणार असल्याने वीजबिल वाचणार असून, याठिकाणचे कामगारदेखील कमी होतील. एकंदरीत या योजनेमुळे नगर परिषदेच्या पाणी योजनेचा तोटा कमी होणार आहे. पंपाच्या दुरूस्तीसाठी आता वारंवार खर्च आता येणार नसल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शिवाय नगर परिषदेचा खर्चदेखील वाचणार आहे. (प्रतिनिधी)