शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

वन्य प्राण्यांपासून नुकसान : रात्रंदिवस शेतकऱ्यांचा पहारा

सुभाष कदम --- चिपळूण तालुक्यात रानडुक्कर व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे आजही ग्रामीण भागात वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गवताची माची करुन रात्रंदिवस शेतकरी पहारा करीत असतात. खरीपाच्या हंगामात कोकणात राबराब राबून भातपीक घेतले जाते. लहरी हवामान, वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे वारंवार पिकाचे नुकसान होत असते. पावसाळ्यात खेकडे रोपांची नासधूस करतात. तर त्यानंतर तयार झालेली शेती रानडुक्कर, वानर किंवा तत्सम प्राणी मातीमोल करतात. घरापासून दूरवर असलेल्या शेतात पीक तयार झाले की त्याचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडावरच खोप काढून त्यात रात्रंरात्र जागून काढावी लागते. यावेळी लांब रस्सीला डबे बांधून किंवा फटाके वाजवून वन्यप्राण्याला पळवून लावले जाते. काही ठिकाणी साड्या बांधण्यात येतात किंवा बुजगावणे उभे केले जातात. आजही ग्रामीण भागात शेती संरक्षणासाठी सहजतेने शस्त्र परवाना मिळत नाही. अनेकांना गरज असतानाही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने विनंती करुनही शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही अशा दिव्यातून जावे लागत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. मग, यावर विविध उपाययोजना करून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसतात. शेतीच्या संरक्षणासाठी सरकार मदत करत नाहीच पण नुकसान भरपाईही देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्याला बारमाही शेतात राबावे लागते. शेती संरक्षणासाठी माचीत बसताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाने याचा विचार करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पीक वाया जातेवन्य प्राण्यांचा धोका पिकाला असतो. अनेकवेळा हाताशी आलेले पीक वाया जाते. शासनाकडून शेतीसाठी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाच दिवसरात्र शेताची राखण करावी लागते. त्यासाठी विविध उपाययोजना शेतकरी करीत असतो, असे कुटरे कवडेवाडी येथील मनोहर कवडे व अरविंद कवडे यांनी सांगितले. दुष्टचक्राचा फेराहवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पावसामुळे वाया जाणारे पीक तर कधी अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे.नुकसान भरपाईची मागणीनिसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही शेती करणे बंद केलेले नाही. संकटांचा सामना करत शेतकरी भातशेतीचे उत्पादन घेत आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.