शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

वन्य प्राण्यांपासून नुकसान : रात्रंदिवस शेतकऱ्यांचा पहारा

सुभाष कदम --- चिपळूण तालुक्यात रानडुक्कर व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे आजही ग्रामीण भागात वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गवताची माची करुन रात्रंदिवस शेतकरी पहारा करीत असतात. खरीपाच्या हंगामात कोकणात राबराब राबून भातपीक घेतले जाते. लहरी हवामान, वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे वारंवार पिकाचे नुकसान होत असते. पावसाळ्यात खेकडे रोपांची नासधूस करतात. तर त्यानंतर तयार झालेली शेती रानडुक्कर, वानर किंवा तत्सम प्राणी मातीमोल करतात. घरापासून दूरवर असलेल्या शेतात पीक तयार झाले की त्याचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडावरच खोप काढून त्यात रात्रंरात्र जागून काढावी लागते. यावेळी लांब रस्सीला डबे बांधून किंवा फटाके वाजवून वन्यप्राण्याला पळवून लावले जाते. काही ठिकाणी साड्या बांधण्यात येतात किंवा बुजगावणे उभे केले जातात. आजही ग्रामीण भागात शेती संरक्षणासाठी सहजतेने शस्त्र परवाना मिळत नाही. अनेकांना गरज असतानाही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने विनंती करुनही शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही अशा दिव्यातून जावे लागत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. मग, यावर विविध उपाययोजना करून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसतात. शेतीच्या संरक्षणासाठी सरकार मदत करत नाहीच पण नुकसान भरपाईही देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्याला बारमाही शेतात राबावे लागते. शेती संरक्षणासाठी माचीत बसताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाने याचा विचार करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पीक वाया जातेवन्य प्राण्यांचा धोका पिकाला असतो. अनेकवेळा हाताशी आलेले पीक वाया जाते. शासनाकडून शेतीसाठी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाच दिवसरात्र शेताची राखण करावी लागते. त्यासाठी विविध उपाययोजना शेतकरी करीत असतो, असे कुटरे कवडेवाडी येथील मनोहर कवडे व अरविंद कवडे यांनी सांगितले. दुष्टचक्राचा फेराहवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पावसामुळे वाया जाणारे पीक तर कधी अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे.नुकसान भरपाईची मागणीनिसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही शेती करणे बंद केलेले नाही. संकटांचा सामना करत शेतकरी भातशेतीचे उत्पादन घेत आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.