शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

वन्य प्राण्यांपासून नुकसान : रात्रंदिवस शेतकऱ्यांचा पहारा

सुभाष कदम --- चिपळूण तालुक्यात रानडुक्कर व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे आजही ग्रामीण भागात वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गवताची माची करुन रात्रंदिवस शेतकरी पहारा करीत असतात. खरीपाच्या हंगामात कोकणात राबराब राबून भातपीक घेतले जाते. लहरी हवामान, वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे वारंवार पिकाचे नुकसान होत असते. पावसाळ्यात खेकडे रोपांची नासधूस करतात. तर त्यानंतर तयार झालेली शेती रानडुक्कर, वानर किंवा तत्सम प्राणी मातीमोल करतात. घरापासून दूरवर असलेल्या शेतात पीक तयार झाले की त्याचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडावरच खोप काढून त्यात रात्रंरात्र जागून काढावी लागते. यावेळी लांब रस्सीला डबे बांधून किंवा फटाके वाजवून वन्यप्राण्याला पळवून लावले जाते. काही ठिकाणी साड्या बांधण्यात येतात किंवा बुजगावणे उभे केले जातात. आजही ग्रामीण भागात शेती संरक्षणासाठी सहजतेने शस्त्र परवाना मिळत नाही. अनेकांना गरज असतानाही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने विनंती करुनही शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही अशा दिव्यातून जावे लागत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. मग, यावर विविध उपाययोजना करून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसतात. शेतीच्या संरक्षणासाठी सरकार मदत करत नाहीच पण नुकसान भरपाईही देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्याला बारमाही शेतात राबावे लागते. शेती संरक्षणासाठी माचीत बसताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाने याचा विचार करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पीक वाया जातेवन्य प्राण्यांचा धोका पिकाला असतो. अनेकवेळा हाताशी आलेले पीक वाया जाते. शासनाकडून शेतीसाठी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाच दिवसरात्र शेताची राखण करावी लागते. त्यासाठी विविध उपाययोजना शेतकरी करीत असतो, असे कुटरे कवडेवाडी येथील मनोहर कवडे व अरविंद कवडे यांनी सांगितले. दुष्टचक्राचा फेराहवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पावसामुळे वाया जाणारे पीक तर कधी अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे.नुकसान भरपाईची मागणीनिसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही शेती करणे बंद केलेले नाही. संकटांचा सामना करत शेतकरी भातशेतीचे उत्पादन घेत आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.