शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ग्रामसेविका वासंती पाटील यांचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

चिपळूण : भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेविका वासंती पाटील यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई ऐरोली येथे ...

चिपळूण : भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेविका वासंती पाटील यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई ऐरोली येथे नेण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर घरी नेण्यात येत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

वासंती पाटील (३०, मूळ गाव धुळे) या शहरातील बापटआळी परिसरातील एका सदनिकेत भाड्याने राहत होत्या. गुहागर तालुक्यातील तळसर-मुंढे येथे त्या ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या. भाजल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर, अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे नेण्यात आले होते. तेथे उपचार झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना गावी नेत होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्या गॅसचा भडका उडाल्याने भाजल्याचे बोलले जात होते. मात्र, पोलिसांनी त्या राहत असलेल्या भाड्याच्या घराची पाहणी केली असता, त्यांनी जाळून घेत आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

वासंती पाटील या चार वर्षांपूर्वी ग्रामसेवक म्हणून नोकरीत रुजू झाल्या होत्या. त्या मूळच्या धुळे येथील आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. पतीचा सुरत येथे कपड्याचा व्यवसाय आहे.