शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

ग्रामसेवक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थांना विविध सोईसुविधा पुरविण्यापर्यंतची कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहेत. ग्रामसेवकांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिर

चिपळूण : शिरगाव येथील लिबर्टी एकता युवा मंच व एस. ए. फिटनेस यांच्या वतीने दिनांक २० मे रोजी ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिबिर सुरू होणार आहे. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रस्त्याचे नूतनीकरण

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी ते पावस सागरी महामार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र साईडपट्टीचे काम अपूर्ण आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता खड्डेमुक्त झाला आहे. ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने साईडपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही.

ऑनलाईन स्पर्धा

दापोली : येथील सायकलिंग क्लबतर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पाच गटांत स्पर्धा होणार असून, सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. २० मेपर्यंत निबंध व चित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, संस्थेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

सुर्वे यांची निवड

रत्नागिरी : तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्राद्वारे याबाबतच्या सूचना जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना देण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस तालुकाध्यक्षपद रिक्त होते.

आयसोलेशन केंद्र

खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन केंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार साखर माध्यमिक विद्यालयात २० बेडचे आयसोलेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. रुग्णांची जेवण व्यवस्था स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत करण्याचे नियोजन आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

खेड : तालुक्यातील पोयनार, बौद्धवाडी, मधलीवाडी येथील ग्रामस्थांसाठी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे व जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीटंचाई भेडसावत असल्याने टँकरची मागणी करण्यात आली होती.