शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थांना विविध सोईसुविधा पुरविण्यापर्यंतची कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहेत. ग्रामसेवकांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिर

चिपळूण : शिरगाव येथील लिबर्टी एकता युवा मंच व एस. ए. फिटनेस यांच्या वतीने दिनांक २० मे रोजी ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिबिर सुरू होणार आहे. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रस्त्याचे नूतनीकरण

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी ते पावस सागरी महामार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र साईडपट्टीचे काम अपूर्ण आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता खड्डेमुक्त झाला आहे. ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने साईडपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही.

ऑनलाईन स्पर्धा

दापोली : येथील सायकलिंग क्लबतर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पाच गटांत स्पर्धा होणार असून, सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. २० मेपर्यंत निबंध व चित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, संस्थेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

सुर्वे यांची निवड

रत्नागिरी : तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्राद्वारे याबाबतच्या सूचना जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना देण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस तालुकाध्यक्षपद रिक्त होते.

आयसोलेशन केंद्र

खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन केंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार साखर माध्यमिक विद्यालयात २० बेडचे आयसोलेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. रुग्णांची जेवण व्यवस्था स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत करण्याचे नियोजन आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

खेड : तालुक्यातील पोयनार, बौद्धवाडी, मधलीवाडी येथील ग्रामस्थांसाठी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे व जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीटंचाई भेडसावत असल्याने टँकरची मागणी करण्यात आली होती.