शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

ग्रामसेवक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ६२७ ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवकांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थांना विविध सोईसुविधा पुरविण्यापर्यंतची कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहेत. ग्रामसेवकांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिर

चिपळूण : शिरगाव येथील लिबर्टी एकता युवा मंच व एस. ए. फिटनेस यांच्या वतीने दिनांक २० मे रोजी ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिबिर सुरू होणार आहे. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रस्त्याचे नूतनीकरण

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी ते पावस सागरी महामार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र साईडपट्टीचे काम अपूर्ण आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता खड्डेमुक्त झाला आहे. ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने साईडपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही.

ऑनलाईन स्पर्धा

दापोली : येथील सायकलिंग क्लबतर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पाच गटांत स्पर्धा होणार असून, सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. २० मेपर्यंत निबंध व चित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, संस्थेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

सुर्वे यांची निवड

रत्नागिरी : तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्राद्वारे याबाबतच्या सूचना जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना देण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस तालुकाध्यक्षपद रिक्त होते.

आयसोलेशन केंद्र

खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन केंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार साखर माध्यमिक विद्यालयात २० बेडचे आयसोलेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. रुग्णांची जेवण व्यवस्था स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत करण्याचे नियोजन आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

खेड : तालुक्यातील पोयनार, बौद्धवाडी, मधलीवाडी येथील ग्रामस्थांसाठी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे व जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीटंचाई भेडसावत असल्याने टँकरची मागणी करण्यात आली होती.