शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

कडवईची ग्रामसभा विविध विषयांवर वाजली

By admin | Updated: December 2, 2014 00:29 IST

ग्रामस्थ आक्रमक : गावविकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच वाजली. या ग्रामसभेला संगमेश्वरच्या सभापती मनीषा गुरव, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे हे उपस्थित होते. या ग्रामसभेत घरकुल, पर्यावरण विकास आराखडा तसेच वाढीव घरपट्टी या विषयांवर वादग्रस्त चर्चा झाली.कडवई ग्रामपंचायत कार्यालय येथे ऐश्वर्या घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला पर्यावरण विकास आराखडा तयार करणाऱ्या सातारा येथील संस्थेचे सभासद हजर होते. २०१० साली या संस्थेची नियुक्ती कडवई गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, या संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा आराखडा तयार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे या संस्थेला आवश्यक असणारा ग्रामसभेचा ठराव देण्यास ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दर्शवला. पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे यांनी हा ठराव देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. मात्र, वॉर्डसभा झाल्याखेरीज ठराव न देण्याचे स्पष्ट मत ग्रामस्थांनी मांडले.घरकुल योजनेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे मत ग्रामस्थांनी सभापतींसमोर मांडले. ज्यांना खरोखरच निवाऱ्याची आवश्यकता आहे, अशा लोकांना घरे न मिळता धनदांडगे लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सभापती मनीषा गुरव यांनी ग्रामसभेत दिले.कडवई परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. याच सभेमध्ये शिंदेआंबेरी येथील खसासेवाडी स्मशानभूमीचे काम न करता रक्कम अदा झाल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली. यावर ग्रामविकास अधिकारी विनायक राजेशिर्के यांनी स्मशानाच्या आराखड्याची रक्कम अदा झाली असल्याचे सांगितले. मात्र, काम न करता रक्कम का अदा करण्यात आली, याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले आही. काम पूर्ण असल्याचा दाखला बांधकाम विभागाने दिल्याने ही रक्कम अदा केली असल्याचे आश्चर्यकारक उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. काम न करता काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन रक्कम अदा होत असेल तर हा जनतेच्या पैशांचा अपहार आहे, असा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवला. याची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. फौजदारी कारवाईवर ग्रामस्थ मागणीवर ठाम राहिल्यानंतर अखेर हा ठराव संमत करण्यात आला. दोन सभापतींच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच गाजली. (वार्ताहर)संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेबद्दल औत्सुक्य होते. यावेळी गाव परिसरातील अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी धनदांडग्यांनी गरिबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ नये, असे मत व्यक्त करण्यात आले. विकास आराखडा, बिबट्याचा बंदोबस्त, घरकूल हे विषय टिपेचे ठरले. विशेष ग्रामसभा गाजली ती घरकूल, पर्यावरण विकास आराखडा या विषयांवर. सातारच्या संस्थेबाबत ग्रामस्थांचा आक्षेप. विश्वासात न घेता आराखडा तयार केल्याचे म्हणणे. गरजू लाभार्थींपर्यंत घरकूल योजना पोहोचली नसल्याची खंत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.