शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कडवईची ग्रामसभा विविध विषयांवर वाजली

By admin | Updated: December 2, 2014 00:29 IST

ग्रामस्थ आक्रमक : गावविकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच वाजली. या ग्रामसभेला संगमेश्वरच्या सभापती मनीषा गुरव, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे हे उपस्थित होते. या ग्रामसभेत घरकुल, पर्यावरण विकास आराखडा तसेच वाढीव घरपट्टी या विषयांवर वादग्रस्त चर्चा झाली.कडवई ग्रामपंचायत कार्यालय येथे ऐश्वर्या घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला पर्यावरण विकास आराखडा तयार करणाऱ्या सातारा येथील संस्थेचे सभासद हजर होते. २०१० साली या संस्थेची नियुक्ती कडवई गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, या संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा आराखडा तयार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे या संस्थेला आवश्यक असणारा ग्रामसभेचा ठराव देण्यास ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दर्शवला. पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे यांनी हा ठराव देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. मात्र, वॉर्डसभा झाल्याखेरीज ठराव न देण्याचे स्पष्ट मत ग्रामस्थांनी मांडले.घरकुल योजनेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे मत ग्रामस्थांनी सभापतींसमोर मांडले. ज्यांना खरोखरच निवाऱ्याची आवश्यकता आहे, अशा लोकांना घरे न मिळता धनदांडगे लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सभापती मनीषा गुरव यांनी ग्रामसभेत दिले.कडवई परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. याच सभेमध्ये शिंदेआंबेरी येथील खसासेवाडी स्मशानभूमीचे काम न करता रक्कम अदा झाल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली. यावर ग्रामविकास अधिकारी विनायक राजेशिर्के यांनी स्मशानाच्या आराखड्याची रक्कम अदा झाली असल्याचे सांगितले. मात्र, काम न करता रक्कम का अदा करण्यात आली, याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले आही. काम पूर्ण असल्याचा दाखला बांधकाम विभागाने दिल्याने ही रक्कम अदा केली असल्याचे आश्चर्यकारक उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. काम न करता काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन रक्कम अदा होत असेल तर हा जनतेच्या पैशांचा अपहार आहे, असा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवला. याची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. फौजदारी कारवाईवर ग्रामस्थ मागणीवर ठाम राहिल्यानंतर अखेर हा ठराव संमत करण्यात आला. दोन सभापतींच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच गाजली. (वार्ताहर)संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेबद्दल औत्सुक्य होते. यावेळी गाव परिसरातील अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी धनदांडग्यांनी गरिबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ नये, असे मत व्यक्त करण्यात आले. विकास आराखडा, बिबट्याचा बंदोबस्त, घरकूल हे विषय टिपेचे ठरले. विशेष ग्रामसभा गाजली ती घरकूल, पर्यावरण विकास आराखडा या विषयांवर. सातारच्या संस्थेबाबत ग्रामस्थांचा आक्षेप. विश्वासात न घेता आराखडा तयार केल्याचे म्हणणे. गरजू लाभार्थींपर्यंत घरकूल योजना पोहोचली नसल्याची खंत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.