शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीची उडी

By admin | Updated: January 4, 2017 23:14 IST

नाणार परिसर : ८० टक्के जमीन सागवे गावातून संपादीत होणार, तहसीलदारांना निवेदन

राजापूर : राजापूर तालुक्यात नाणार परिसरात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता सागवे ग्रुप ग्रामपंचायतीने या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के जमीन ही सागवे गावामधून संपादीत केली जाणार आहे. त्याबाबत शासनाने स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. शिवाय येणारा प्रकल्प निसर्गावर परिणाम करणारा असल्याने तो तत्काळ रद्द केला जावा, असा एकमुखी ठराव सागवे ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबतचे निवेदन राजापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे .नाणार परिसरातील हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या वादात आता ग्रामपंचायतीनेही उडी घेतली आहे. केंद्र शासनाच्या इंडियन आॅईल, हिंंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांची ५१ टक्के भागिदारी व महाराष्ट्र शासनाची ४९ टक्के सहभाग असा पेट्रोल रिफायनरिचा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प नाणार परिसरात येवू घातला आहे त्यातून दरवर्षी ६० दशलक्ष पेट्रोलची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार एकर जागा आवश्यक असून, नाणार परिसरातील जागांसह सागवे परिसरातील जागा संपादीत केल्या जाणार आहेत.या प्रकल्पाचा पर्यावरणावर विपरित परिणाम होईल, अशी धास्ती प्रकल्प परिसरातील जनतेला वाटत आहे. शिवाय अन्य समस्या निर्माण होतील अशा भीतीपोटी नाणारमधील जनतेने येऊ घातलेल्या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरु केला असतानाच आता सागवे ग्रामपंचायतीने देखील नियोजित प्रकल्पाविरोधात रान उठविण्याचा निर्धार केला आहे. त्या प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींपैकी सुमारे ८० टक्के जमिनी सागवे गु्रप ग्रामपंचायत क्षेत्रातील जाणार आहेत त्यामध्ये कारिवणे, जंबारी, सागवेखुर्द, कात्रादेवी, कातळी, सागवे, वाडापाल्ये व गोठीवरे या महसुली गावांचा समावेश आहे, असे गावच्या सरपंच लक्ष्मी शिवलकर यांचे म्हणणे आहे आपल्या गावातील जागा निवडताना शासनाने ग्रामपंचायतीशी कोणताच पत्रव्यवहार केलेला नसून, कुठल्याच प्रकारची कल्पनादेखील देण्यात आलेली नाही.नियोजीत प्रकल्पामुळे सागवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील किनारपट्टी व पर्यावरणाला हानी पोहोचणार असून, या गावापासून ७ ते ८ किलोमीटरवर जैतापूरचा अणुउर्जा प्रकल्प आला आहे .तालुक्याच्या पश्चिम भागातच पर्यावरणावर परिणाम करणारे असे प्रकल्प येत असून, आमचा त्याला प्रखर विरोध आहे. शासनाने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. ती देखील आम्हाला मिळाली पाहिजे आणि हा रिफायनरी प्रकल्प सागवे गावच्या हद्दीतून हद्दपार झालाच पाहिजे, अशा मागणीचा ठराव सागवे ग्रामपंचायतीने केला आहे व या ठरावासह एक निवेदन राजापूर तहसीलदारना सोमवारी सरपंच लक्ष्मी शिवलकर यांनी दिले. नाणार पाठोपाठ आता सागवेवासीयांनी प्रकल्पाला विरोध सुरु केल्यामुळे भविष्यात अणुउर्जा प्रकल्पाप्रमाणेच रिफायनरीदेखील संघर्षमय ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)