शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीची उडी

By admin | Updated: January 4, 2017 23:14 IST

नाणार परिसर : ८० टक्के जमीन सागवे गावातून संपादीत होणार, तहसीलदारांना निवेदन

राजापूर : राजापूर तालुक्यात नाणार परिसरात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता सागवे ग्रुप ग्रामपंचायतीने या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के जमीन ही सागवे गावामधून संपादीत केली जाणार आहे. त्याबाबत शासनाने स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. शिवाय येणारा प्रकल्प निसर्गावर परिणाम करणारा असल्याने तो तत्काळ रद्द केला जावा, असा एकमुखी ठराव सागवे ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबतचे निवेदन राजापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे .नाणार परिसरातील हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या वादात आता ग्रामपंचायतीनेही उडी घेतली आहे. केंद्र शासनाच्या इंडियन आॅईल, हिंंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांची ५१ टक्के भागिदारी व महाराष्ट्र शासनाची ४९ टक्के सहभाग असा पेट्रोल रिफायनरिचा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प नाणार परिसरात येवू घातला आहे त्यातून दरवर्षी ६० दशलक्ष पेट्रोलची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार एकर जागा आवश्यक असून, नाणार परिसरातील जागांसह सागवे परिसरातील जागा संपादीत केल्या जाणार आहेत.या प्रकल्पाचा पर्यावरणावर विपरित परिणाम होईल, अशी धास्ती प्रकल्प परिसरातील जनतेला वाटत आहे. शिवाय अन्य समस्या निर्माण होतील अशा भीतीपोटी नाणारमधील जनतेने येऊ घातलेल्या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरु केला असतानाच आता सागवे ग्रामपंचायतीने देखील नियोजित प्रकल्पाविरोधात रान उठविण्याचा निर्धार केला आहे. त्या प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींपैकी सुमारे ८० टक्के जमिनी सागवे गु्रप ग्रामपंचायत क्षेत्रातील जाणार आहेत त्यामध्ये कारिवणे, जंबारी, सागवेखुर्द, कात्रादेवी, कातळी, सागवे, वाडापाल्ये व गोठीवरे या महसुली गावांचा समावेश आहे, असे गावच्या सरपंच लक्ष्मी शिवलकर यांचे म्हणणे आहे आपल्या गावातील जागा निवडताना शासनाने ग्रामपंचायतीशी कोणताच पत्रव्यवहार केलेला नसून, कुठल्याच प्रकारची कल्पनादेखील देण्यात आलेली नाही.नियोजीत प्रकल्पामुळे सागवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील किनारपट्टी व पर्यावरणाला हानी पोहोचणार असून, या गावापासून ७ ते ८ किलोमीटरवर जैतापूरचा अणुउर्जा प्रकल्प आला आहे .तालुक्याच्या पश्चिम भागातच पर्यावरणावर परिणाम करणारे असे प्रकल्प येत असून, आमचा त्याला प्रखर विरोध आहे. शासनाने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. ती देखील आम्हाला मिळाली पाहिजे आणि हा रिफायनरी प्रकल्प सागवे गावच्या हद्दीतून हद्दपार झालाच पाहिजे, अशा मागणीचा ठराव सागवे ग्रामपंचायतीने केला आहे व या ठरावासह एक निवेदन राजापूर तहसीलदारना सोमवारी सरपंच लक्ष्मी शिवलकर यांनी दिले. नाणार पाठोपाठ आता सागवेवासीयांनी प्रकल्पाला विरोध सुरु केल्यामुळे भविष्यात अणुउर्जा प्रकल्पाप्रमाणेच रिफायनरीदेखील संघर्षमय ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)