शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ग्रामपंचायती हतबल : नियम बसवितायत धाब्यावर

By admin | Updated: November 19, 2014 23:14 IST

ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडू लागल्या आहेत.

लोणंद : लोणंद परिसरामध्ये टाऊन प्लॅनिंग (टीपी) चे सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकामे केली जात असल्याने यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देणे व अशा बांधकामांची नोंद करण्यास बंदी घातली आहे. मात्र, या बंदीचा मोठा आर्थिक फटका ग्रामपंचायतींना बसू लागल्याने ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडू लागल्या आहेत.एका बाजूने दिवसेंदिवस बांधकामे वाढत आहेत व इतरांप्रमाणे सोयी-सुविधा आपोआपच मिळत आहेत; परंतु नोंदी लावण्यास बंदी असल्याने महसूल गोळा करता येत नसल्याने ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडून विकासकामांनाही खो बसला आहे.या सर्व प्रकारात बेकायदा बांधकामधारकाचा सद्य:स्थितीला फायदा होत आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकामासाठी टीपीचे सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायतीच्या परवानगीवरून बांधकामे केली जात होती. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर फेब्रुवारी २०१० मध्ये ग्रामपंचायतींना अशा बांधकामांना परवानगी न देणे व नोंदी न करण्याची बंदी घालण्यात आली. तेव्हापासून बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाची बंदी असल्याने नोंदी करता आलेल्या नाहीत साहजिकच या चार वर्षांत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तसेच ही बांधकामे काही विशेष भागात झालेली नसून, जशा जागा उपलब्ध आहेत, तशी बांधकामे झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जेवढ्या सोयी-सुविधा आहेत त्या आपोआपच त्यांना मिळत आहेत. (वार्ताहर)फिरुन तेच!अवैध बांधकामे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देणे व अशा बांधकामांची नोंद करण्यास बंदी घातली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गावपातळीवर ग्रामपंचायत या अवैध कामांवर लक्ष ठेवू शकते. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींवर निर्बंध आणून काय साधले?, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत आहे.