शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

शासनाने आंबा बागायतदारांना कर्ज माफी द्या; बागायतदारांचं मुख्यमंत्र्यांना साकडे

By मेहरून नाकाडे | Updated: May 23, 2023 15:06 IST

२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

रत्नागिरी : यावर्षी आंबा उत्पादन अल्प आहे. आलेल्या उत्पादनातून कीटनाशकांची बिले, मजूरांचे पैसे भागविणेसुध्दा शक्य नाही. बँकांची कर्जपरतफेड करू शकणार नाहीत. बागायतदार आर्थिक संकटात असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांतर्फे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून बागायतदारांच्या व्यथा मांडणार असल्याची माहिती पावस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत उपस्थित होते. ‘फयान’ वादळानंतर जिल्ह्याच्या आंबा उत्पादकतेत दिवसेंदिवस घटच होत चालली आहे. यावर्षी तर आंबा उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी आंबा बागायतदारांसाठी मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा बागायदार पुढील वर्षीच्या हंगामासाठी उभा राहू शकणार नाही.

२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यावर्षी तर पीक कर्ज परतफेड कशी करावी, असा बागायदारांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समस्त बागायतदारांची व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मांडणार आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बागायदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे.