शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शासनाने आंबा बागायतदारांना कर्ज माफी द्या; बागायतदारांचं मुख्यमंत्र्यांना साकडे

By मेहरून नाकाडे | Updated: May 23, 2023 15:06 IST

२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

रत्नागिरी : यावर्षी आंबा उत्पादन अल्प आहे. आलेल्या उत्पादनातून कीटनाशकांची बिले, मजूरांचे पैसे भागविणेसुध्दा शक्य नाही. बँकांची कर्जपरतफेड करू शकणार नाहीत. बागायतदार आर्थिक संकटात असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांतर्फे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून बागायतदारांच्या व्यथा मांडणार असल्याची माहिती पावस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत उपस्थित होते. ‘फयान’ वादळानंतर जिल्ह्याच्या आंबा उत्पादकतेत दिवसेंदिवस घटच होत चालली आहे. यावर्षी तर आंबा उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी आंबा बागायतदारांसाठी मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा बागायदार पुढील वर्षीच्या हंगामासाठी उभा राहू शकणार नाही.

२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यावर्षी तर पीक कर्ज परतफेड कशी करावी, असा बागायदारांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समस्त बागायतदारांची व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मांडणार आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बागायदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे.