शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे नवे अभियान :

By admin | Updated: July 16, 2014 23:05 IST

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणार

रहिम दलाल -रत्नागिरीग्रामीण भागामध्ये पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवून पाणीटंचाईवर मात करण्यात येईल. याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘पाणी साठवा गाव वाचवा’ अभियान जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे़जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ योग्य तंत्रज्ञान वापरून नियोजनपूर्वक पावसाचे पाणी अडवल्यास त्याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे़ पाणी साठवण व त्याचा भविष्यातील समान वापर तंत्रशुध्द पध्दतीने केल्यास जिल्ह्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही़ सन २०१३च्या उन्हाळ्यामध्ये १२३ गावांतील २७७ वाड्यांमध्ये, तर सन २०१४ मध्ये १२२ गावातील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते़ दोन्ही वर्षी टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.पाणी पुरवठ्यासाठी विविध नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ तरीही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवते़ त्यासाठी ग्रामीण भागातील पावसाचे पाणी कसे साठविता येईल, यासंदर्भात विचार करुन ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे़ त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी गावपातळीवर सनियंत्रण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे़गावातील विहिरी, तलावांमधील पाण्याच्या पातळीची मोजणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची स्थिती निश्चित करणे, पाणीटंचाईसाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरची संख्या, मागील पाच वर्षात टँकरवर झालेला खर्च, पाणी टंचाईमुळे कृषी उत्पादनात झालेली घट, पाणीटंचाईमुळे साथरोगाचे प्रमाण, माता-बाल मृत्यूचे प्रमाण, कुपोषणाचे प्रमाण आदिंची माहिती घेणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील भूगर्भाचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने पाणी साठवण्याचा, पाणी वापराचा नियोजन आराखडा तयार करुन व त्याची अंमलबजावणी करणे, त्यानुसार ग्रामीण भागातील क्षेत्रातील भूजल पातळीचे भूजल सर्वेक्षण करणे ही कामे गावपातळीवर करण्यात येणार आहेत़या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने विकास यंत्रणेमार्फत मे महिन्यातच भूजल पातळीचे परीक्षण करायचे आहे़ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी पर्जन्यमापक बसवून सर्वसाधारण नोंद घ्यायची आहे़ तसेच पाणी साठवण्यासाठी कामांचे नियोजन व अंदाजपत्रक तयार करणे, पाणी आराखडा, अंदाजपत्रकामध्ये गावच्या हद्दीतील सर्व सिंचनाचे उद्भव, पिण्याच्या पाण्याचे उद्भव यासाठी पुनर्भरणाचा आराखडा ग्रामपंचायतीनीच तयार करायचा आहे़ हे अभियान लवकरच जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे़ मात्र, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टंचाई भेडसावणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्यात येणार आहे़तंत्रशुध्द पध्दतीने वॉटर अकाऊंट तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, शासकीय, निमशासकीय आणि खासगी इमारतींवर रेनरुफ वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बांधून घेण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रत्येक कुटुंबप्रमुख आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांना प्रवृत्त करुन इमारतीवर पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब मुरविणे आवश्यक आहे़ असे झाल्यास पाण्याचा प्रत्येक थेंब हा वापरात येईल. मात्र त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.नादुरुस्त जुने पाझर तलाव, गावतळी, शेततळी, लघुसिंचन प्रकल्प यांची लोकसहभागातून दुरूस्ती करण्यात येणार आहे़ या तलावांमध्ये साठलेला गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यात येणार आहे़हे अभियान राबवण्यापूर्वी भूगर्भातील पाण्याची सर्वसाधारण पातळी निश्चित करुन अभियान पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात भूजल पातळीमध्ये वाढ किंवा घट तांत्रिक अधिकाऱ्यांकडून तपासून घेण्यात येणार आहे़