शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दाैऱ्यांसाठी शासकीय यंत्रणा वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला ताैक्ते चक्रीवादळाने दणका दिला. यात रत्नागिरी आणि लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अताेनात नुकसान केले आहे. सध्या ...

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला ताैक्ते चक्रीवादळाने दणका दिला. यात रत्नागिरी आणि लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अताेनात नुकसान केले आहे. सध्या कोरोनाचे संकट गडद असतानाच या चक्रीवादळाचे संकट उभे ठाकल्याने यंत्रणा ते निवारणाचे, त्याचबरोबर पंचनामे, मदत पोहोचविण्यात दिवसरात्र मेहनत घेत असतानाच दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या राजकीय दाैऱ्यांमुळे जेरीस आल्या आहेत.

गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. त्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे गुरफटली आहे. असं असतानाच पुन्हा गेल्या रविवारी जिल्ह्यात आलेल्या ताैक्ते चक्रीवादळाने पूर्ण जिल्ह्याला तडाखा दिला. कोरोनात व्यग्र असलेल्या महसूल आणि अन्य शासकीय यंत्रणा पुन्हा हे संकट निवारणासाठी धावून गेल्या. स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी तसेच मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने पंचनामे तातडीने सुरू असतानाच दुसऱ्या दिवसांपासून जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींनी जिल्ह्याच्या दाैऱ्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ अधिकच वाढली आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने हाती असलेली कामे सोडून या मंडळींच्या दाैऱ्याच्या सर्वतोपरी व्यवस्था करताना शासकीय यंत्रणांना विशेषत: महसूल कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत.

आधीच उन्हातान्हातून चक्रीवादळाचे पंचनामे करताना या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे. त्यातच राजकीय मंडळींचे दाैरे वाढू लागल्याने हातातील कामे अर्धवट टाकून दाैऱ्याचे नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यभरात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू झाली आहे. मात्र, राजकीय दाैऱ्यांना यामधून वगळण्यात आल्याने दाैऱ्यावेळी राजकीय मंडळींसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. या व्यक्तींबरोबर वावरत असल्याने शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी बाधित होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. जिल्ह्यात सध्या वाढलेले दाैरे आणि सोशल डिस्टन्सिंगचा उडणारा बाेजवारा पाहता कोरोना प्रादुर्भाव अधिक वाढणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे राजकीय लोकांनी दाैरे आवरते घेऊन यंत्रणांना ऑनलाइन मार्गदर्शन करावे, अशा संतप्त प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहेत.