शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय, विनंती बदल्यांत जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: June 2, 2016 00:53 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या कुशल कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय स्तरावर झालेल्या शासकीय आणि विनंती बदल्यांबाबत कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महिला कर्मचारी वर्गाला यामुळे विशेष दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले. यामध्ये ३ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय बदल्या तसेच विनंती बदल्यांचा समावेश आहे. या बदल्यांचे वारे मंगळवारपासून वाहू लागताच प्रत्येकाला आपल्याला कुठे बदली मिळेल, याची धास्ती वाटत होती. विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्यांना आपल्याला अपेक्षित ठिकाणी बदली मिळेल ना, अशी शंका सतावत होती. विशेषत: महिलावर्गाला आपली बदली इतरत्र झाली तर काय करायचे, ही भीती वाटत होती. त्यातच काहींची मुले लहान असल्याने दूरच्या ठिकाणी जावे लागले तर काय करायचे, हा सवाल त्रस्त करत होता. रत्नागिरीबाहेर याआधी कार्यरत असलेल्या महिलांनी यावेळी विनंती बदली मागून घेतली होती. जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी या सर्व बदल्यांबाबत सकारात्मकता दाखवत बहुतांशी विनंती बदल्या मंजूर केल्याने महिला कर्मचारी वर्गाला विशेष दिलासा मिळाला आहे. तसेच अन्य बदल्यांनाही योग्य न्याय दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ५२ अव्वल कारकून, १८ मंडल अधिकारी, ३४ लिपीक आणि नाईक अशा एकूण १०५ कर्मचाऱ्यांच्या शासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. श्रेणी १ व २ अधिकाऱ्यांच्या बदल्याही आता लवकरच शासनस्तरावरून होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)