शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शासकीय, विनंती बदल्यांत जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: June 2, 2016 00:53 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या कुशल कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय स्तरावर झालेल्या शासकीय आणि विनंती बदल्यांबाबत कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महिला कर्मचारी वर्गाला यामुळे विशेष दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले. यामध्ये ३ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय बदल्या तसेच विनंती बदल्यांचा समावेश आहे. या बदल्यांचे वारे मंगळवारपासून वाहू लागताच प्रत्येकाला आपल्याला कुठे बदली मिळेल, याची धास्ती वाटत होती. विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्यांना आपल्याला अपेक्षित ठिकाणी बदली मिळेल ना, अशी शंका सतावत होती. विशेषत: महिलावर्गाला आपली बदली इतरत्र झाली तर काय करायचे, ही भीती वाटत होती. त्यातच काहींची मुले लहान असल्याने दूरच्या ठिकाणी जावे लागले तर काय करायचे, हा सवाल त्रस्त करत होता. रत्नागिरीबाहेर याआधी कार्यरत असलेल्या महिलांनी यावेळी विनंती बदली मागून घेतली होती. जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी या सर्व बदल्यांबाबत सकारात्मकता दाखवत बहुतांशी विनंती बदल्या मंजूर केल्याने महिला कर्मचारी वर्गाला विशेष दिलासा मिळाला आहे. तसेच अन्य बदल्यांनाही योग्य न्याय दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ५२ अव्वल कारकून, १८ मंडल अधिकारी, ३४ लिपीक आणि नाईक अशा एकूण १०५ कर्मचाऱ्यांच्या शासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. श्रेणी १ व २ अधिकाऱ्यांच्या बदल्याही आता लवकरच शासनस्तरावरून होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)