शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

शासकीय, विनंती बदल्यांत जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: June 2, 2016 00:53 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या कुशल कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय स्तरावर झालेल्या शासकीय आणि विनंती बदल्यांबाबत कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महिला कर्मचारी वर्गाला यामुळे विशेष दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनातील १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले. यामध्ये ३ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय बदल्या तसेच विनंती बदल्यांचा समावेश आहे. या बदल्यांचे वारे मंगळवारपासून वाहू लागताच प्रत्येकाला आपल्याला कुठे बदली मिळेल, याची धास्ती वाटत होती. विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्यांना आपल्याला अपेक्षित ठिकाणी बदली मिळेल ना, अशी शंका सतावत होती. विशेषत: महिलावर्गाला आपली बदली इतरत्र झाली तर काय करायचे, ही भीती वाटत होती. त्यातच काहींची मुले लहान असल्याने दूरच्या ठिकाणी जावे लागले तर काय करायचे, हा सवाल त्रस्त करत होता. रत्नागिरीबाहेर याआधी कार्यरत असलेल्या महिलांनी यावेळी विनंती बदली मागून घेतली होती. जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी या सर्व बदल्यांबाबत सकारात्मकता दाखवत बहुतांशी विनंती बदल्या मंजूर केल्याने महिला कर्मचारी वर्गाला विशेष दिलासा मिळाला आहे. तसेच अन्य बदल्यांनाही योग्य न्याय दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ५२ अव्वल कारकून, १८ मंडल अधिकारी, ३४ लिपीक आणि नाईक अशा एकूण १०५ कर्मचाऱ्यांच्या शासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. श्रेणी १ व २ अधिकाऱ्यांच्या बदल्याही आता लवकरच शासनस्तरावरून होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)