शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे

By admin | Updated: March 10, 2016 23:53 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा : सुधारित नळपाणी योजना ६७ कोटींची : मयेकर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ६६ कोटी ८७ लाख ९५ हजार ३७३ रुपयांचा प्रस्ताव ८ मार्चला शासनाला सादर करण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्पाचा १४ कोटी ७० लाख ३४ हजार ४७० रुपयांचा प्रस्तावही त्याचवेळी राज्य शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी गुरुवारी झालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या मासिक सभेच्या सुरुवातीला दिली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था नाजूक बनली आहे. अंतर्गत जलवाहिन्या जुनाट झाल्याने अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. या जलवितरण व्यवस्थेची उपग्रहीय पाहणी करून त्याचा अहवालही बनविण्यात आला आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या विविध भागांतील पाणी वितरणात असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळेच पाणी वितरण व्यवस्था सक्षम बनविण्यासाठी वाढीव पाणीपुरवठ्याच्या सुधारित योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादरपाणी वितरण व्यवस्था जुनाटरत्नागिरी शहराला पानवल धरण व शीळ धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. पानवल हे नगरपरिषदेच्या मालकीचे धरण आहे. शीळ धरणातील शंभर टक्के पाणी रत्नागिरी नगरपरिषद पाटबंधारेकडून विकत घेत आहे. दररोज शहराला १५ ते १६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यातील १२ दशलक्ष घनमीटर पाणी हे शीळ धरणातून दररोज जॅकवेलद्वारे घेतले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता पाणीसाठा पुरेसा असला, तरी जुनाट झालेल्या वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यासाठीच वाढीव पाणी योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात साडेनऊ हजार नळ जोडण्या असून, वार्षिक पाणी आकारणी अडीच कोटींच्या घरात आहे. वाढत्या बांधकामांमुळे नळ जोडण्यांची मागणी वाढत असून, वितरण व्यवस्था कोलमडल्याने पाणीपुरवठ्यात अनेकदा व्यत्यय निर्माण होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठीही साडेआठ कोटींची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून रेंगाळल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार १४ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)