शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे

By admin | Updated: March 10, 2016 23:53 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा : सुधारित नळपाणी योजना ६७ कोटींची : मयेकर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ६६ कोटी ८७ लाख ९५ हजार ३७३ रुपयांचा प्रस्ताव ८ मार्चला शासनाला सादर करण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्पाचा १४ कोटी ७० लाख ३४ हजार ४७० रुपयांचा प्रस्तावही त्याचवेळी राज्य शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी गुरुवारी झालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या मासिक सभेच्या सुरुवातीला दिली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था नाजूक बनली आहे. अंतर्गत जलवाहिन्या जुनाट झाल्याने अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. या जलवितरण व्यवस्थेची उपग्रहीय पाहणी करून त्याचा अहवालही बनविण्यात आला आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या विविध भागांतील पाणी वितरणात असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळेच पाणी वितरण व्यवस्था सक्षम बनविण्यासाठी वाढीव पाणीपुरवठ्याच्या सुधारित योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादरपाणी वितरण व्यवस्था जुनाटरत्नागिरी शहराला पानवल धरण व शीळ धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. पानवल हे नगरपरिषदेच्या मालकीचे धरण आहे. शीळ धरणातील शंभर टक्के पाणी रत्नागिरी नगरपरिषद पाटबंधारेकडून विकत घेत आहे. दररोज शहराला १५ ते १६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यातील १२ दशलक्ष घनमीटर पाणी हे शीळ धरणातून दररोज जॅकवेलद्वारे घेतले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता पाणीसाठा पुरेसा असला, तरी जुनाट झालेल्या वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यासाठीच वाढीव पाणी योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात साडेनऊ हजार नळ जोडण्या असून, वार्षिक पाणी आकारणी अडीच कोटींच्या घरात आहे. वाढत्या बांधकामांमुळे नळ जोडण्यांची मागणी वाढत असून, वितरण व्यवस्था कोलमडल्याने पाणीपुरवठ्यात अनेकदा व्यत्यय निर्माण होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठीही साडेआठ कोटींची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून रेंगाळल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार १४ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)