शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने निम्मीच रक्कम भरल्याने २४ हजार शेतकऱ्यांचा परतावा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप हिश्शाची निम्मीच रक्कम भरण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप हिश्शाची निम्मीच रक्कम भरण्यात आली आहे. उर्वरित रक्कम प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील २४ हजार ६५९ शेतकऱ्यांचा विमा परतावा रखडला आहे. शासनाने पूर्ण रक्कम भरल्याशिवाय शेतकऱ्यांना परतावा मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परताव्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

उच्चत्तम तापमान, अवेळीचा पाऊस आणि नीच्चांकी तापमान याचा परिणाम आंबा, काजू उत्पादनावर झाला आहे. त्यातच तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा जमिनीवर आला. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यामध्ये अवेळी पावसासाठी दि. १ डिसेंबर ते १५ मे, कमी तापमानासाठी दि.१ जानेवारी दि. १५ मार्च, जास्त तापमानासाठी दि. १ मार्च ते दि. १५ मे आणि गारपीटसाठी दि. १ फेब्रुवारी ते दि. ३१ मे हा कालावधी जाहीर करण्यात आला. आंबा पिकासाठी विमा कालावधी डिसेंबर ते दि. १५ मेपर्यंत होता.

विमा निकषांमध्ये काजूसाठी अवेळी पावसाचा कालावधी दि. १ डिसेंबर ते दि. ३१ मार्च ग्राह्य धरला होता. या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ३,२९३ बागायतदारांनी काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. विमा कालावधी संपून तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही विमा परताव्याची रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

जिल्ह्यातील २१,३६६ आंबा, तर ३,२९३ काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. १४,९३७ हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियमसाठी ९ कोटी ९४ लाख ६९ हजार ९६३ रूपयांची रक्कम भरली आहे. मात्र, राज्य शासनाकडून ४५ कोटी ९ लाख २७ हजार ३८१ तर केंद्र शासनाकडून २४ कोटी ३४ लाख २९ हजार २३९ रूपयांचा हप्ता असताना, हप्त्याची निम्मीच रक्कम प्राप्त झाली असली तरी निम्मी रक्कम प्राप्त होणे गरजेचे असल्याने परतावा प्राप्त होण्यास विलंब होत आहे.

---------------------------

२०१९पर्यंत फळपीक विमा योजनेसाठी हेक्टरची मर्यादा नव्हती. मात्र, २०२०पासून चार हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा योजनेसाठी निकष जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४६ असल्याने विमा कंपनीने संबंधित शेतकऱ्यांकडून ‘ना हरकत दाखला’ मागवला होता. मात्र, ४४ शेतकऱ्यांनी दाखला दिला असला तरी दोन शेतकऱ्यांनी मात्र तो देण्यास नकार दर्शविला आहे.

-----------------------------

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसांत शेतकऱ्यांना विमा परताव्याची रक्कम प्राप्त होणे गरजेचे होते. मात्र, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही परतावा जाहीर केलेला नाही. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असताना तसेच नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून संपूर्ण रक्कम भरली गेली असताना शासनाकडून मात्र हप्त्याची रक्कम भरण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकरी परताव्यापासून वंचित राहिले आहेत.

- राजन कदम, आंबा बागायतदार

---------------------------

शेतकरी २४,६५९

विमा संरक्षित क्षेत्र १४,९३७ हेक्टर

विमा संरक्षित रक्कम १९८ कोटी ९३ लाख ९९ हजार २७३ रुपये

एकूण प्रीमियम ७९ कोटी ३८ लाख २६ हजार ५८४ रुपये

शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम ९ कोटी ९४ लाख ९९ हजार ६३ रुपये

राज्य शासनाचा हप्ता ४५ कोटी ९ लाख २७ हजार ३८१ रुपये

केंद्र शासनाचा हप्ता २४ कोटी ३४ लाख २९ हजार २३९ रुपये