शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांची झोळी दुबळी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

कोरोनाच्या महामारीत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय टीम महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा देत आहे. अशा परिस्थितीत रूग्णालयातील सोयी-सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी ...

कोरोनाच्या महामारीत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय टीम महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा देत आहे. अशा परिस्थितीत रूग्णालयातील सोयी-सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी त्या-त्या भागातील विविध सामाजिक संस्था व व्यक्ती सढळहस्ते मदत करत आहेत. चिपळुणातील कामथे रुग्णालयात याआधी एक्स-रे मशीन, ड्युरा सिलिंडर अशी यंत्रणा पुरविण्यात आली. त्यानंतर ७० ऑक्सिजन बेडसह सीसीटीव्ही, औषध साहित्य, रूग्णालय स्वच्छता, जेवणाचे डबेही पुरवले जात आहेत. एवढेच नव्हे तर काहींनी स्वच्छतागृहासाठी ब्रश, बादल्या दिल्या. बोअरवेल खोदाईतही योगदान दिले. लोकसहभागातून सारे काही दिले जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने वैद्यकीय यंत्रणा योगदान देत आहे, त्यापद्धतीने रुग्णालयाची प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे डॉक्टरांनाच उपचाराचे काम सोडून अन्य गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णालयातील व परिसरातील कचऱ्याच्या साफसफाईसाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते लक्ष घालत असतील आणि महिन्याला सुमारे ९० हजार रूपये इतके बिल घेणारा ठेकेदार जबाबदारी झटकत असेल, तर त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असायला हवे होते. त्याला साधे पत्र नाही, नोटीस बजावली नाही की कारवाई केली नाही. केवळ कागदोपत्री सोपस्कार सुरु आहेत. हाच गोंधळ रुग्णालयातील अन्य सुविधांच्या बाबतीत घडत आहे. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेसोबत प्रशासकीय यंत्रणा सक्षम होणे गरजेचे आहे. एकाच रथाची ही दोन चाकं असल्याने ते सोबत राहणे गरजेचे आहे. तरच शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार व सोयी उपलब्ध होतील. कोविड निधीच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. तरीही बदल घडत नसेल, तर दुर्दैव आहे. नेमका हा निधी मुरतो कुठे, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. यापुढे मदतीसाठी हजारो हात पुढे आले, तरी शासकीय रुग्णालयाची झोळी दुबळीच राहणार आहे का, असाही प्रश्न प्रत्येकाला पडू लागला आहे. शासकीय रुग्णालयातील वीज, पाणी यासारख्या त्रुटी दूर करण्यासाठीही सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींची मदत वेळोवेळी घ्यावी लागत आहे. परंतु, ही कामे त्या-त्या वेळी मार्गी लावण्यासाठी रुग्णालयातील प्रशासन अथवा व्यवस्थापनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. किमान तसा प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. परंतु, दुर्दैवाने याही गोष्टी होत नसल्याने आज शासकीय रुग्णालयांची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालये बदनाम होण्यामागे केवळ वैद्यकीय यंत्रणा नव्हे, तर प्रशासनही तितकेच जबाबदार आहे.

- संदीप बांद्रे