शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बुध्दपौर्णिमेची ‘माध्यमिक’ला शासकीय सुट्टी

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा.

टेंभ्ये : सोमवार ४ मे रोजी येणाऱ्या बौध्द पौर्णिमेची माध्यमिक शाळांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीच्या मोबदल्यात दिवस भरुन काढण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत. शाळांना देण्यात आलेल्या वार्षिक नियोजनांना देण्यात आलेल्या वार्षिक नियोजनामध्ये या सुट्टीचा समावेश नसल्यामुळे शाळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी वर्षातील सुट्ट्यांचे पूर्ण नियोजन केले जाते. शाळा संहितेमधील तरतुदीनुसार रविवार वगळता ७६ दिवसांपेक्षा अधिक दिवस सुट्टी देता येत नाही. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुट्ट्या निश्चित करताना नजरचुकीने बौध्द पौर्णिमेची सुट्टी मध्ये आली होती. चालू शैक्षणिक वर्ष शुक्रवार ८ मे पर्यंत चालणार आहे. यामुळे बौध्द पौर्णिमेची सुट्टी शाळांना देणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाधिकारी स्तरावरुन बौध्द पौर्णिमेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही सुट्टी घेत असताना शाळांचे सुट्ट्यांचे दिवस ७६ पेक्षा अधिक होणार याची काळजी घेणे अवश्यक आहे.बौध्द पौर्णिमेची सुट्टी घेतल्यानंतर हा दिवस भरुन काढण्यासाठी शिक्षणाधिकारी अहिरे यांनी शाळांसमोर काही पर्याय ठेवले आहेत. यामध्ये जर शाळांकडे मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील स्थानिक सुट्टी शिल्लक असेल तर बौध्द पौर्णिमेची दिवशी ती सुट्टी घेण्यात यावी. जर स्थानिक सुट्टीचा पर्याय उपलब्ध नसेल तर अन्य सुट्टीच्या दिवशी शाळा भरवून बौध्द पौर्णिमेच्या सुुट्टीचा दिवस भरुन काढण्यात यावा. या दोन पैकी उपलब्ध पर्यायाचा वापर शाळांना करावा लागणार आहे. ज्या शाळांकडे स्थानिक सुट्टी शिल्लक नसेल अशा शाळांना रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. या शैक्षणिक वर्षात प्रथमच जिल्ह्यात रविवारी शाळा घ्याव्या लागल्या आहेत. यापूर्वी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची सुट्टी भरुन काढण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये रविवारी शाळा भरविण्यात आली. तसेच काही शाळांनी महावीर जयंतीच्या सुट्टीचा दिवस भरुन काढण्यासाठी रविवारी शाळा भरविली. आता ज्या शाळांकडे स्थानिक सुट्टी शिल्लक नसेल अशा बौध्द पौर्णिमेची सुट्टी भरुन काढण्यासाठी पुन्हा रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. सोमवार दि.४ मे रोजी येणाऱ्या पौर्णिमेची सुट्टी माध्यमिक शाळांना दिल्याने आता रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून त्याकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी बौध्द पौर्णिमेची शासकीय सुट्टी घ्यावी. या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. - राजेंद्र अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी बौध्द पौर्णिमेची शासकीय सुट्टी घ्यावी. या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. - राजेंद्र अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी