शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

बुध्दपौर्णिमेची ‘माध्यमिक’ला शासकीय सुट्टी

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा.

टेंभ्ये : सोमवार ४ मे रोजी येणाऱ्या बौध्द पौर्णिमेची माध्यमिक शाळांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीच्या मोबदल्यात दिवस भरुन काढण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत. शाळांना देण्यात आलेल्या वार्षिक नियोजनांना देण्यात आलेल्या वार्षिक नियोजनामध्ये या सुट्टीचा समावेश नसल्यामुळे शाळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी वर्षातील सुट्ट्यांचे पूर्ण नियोजन केले जाते. शाळा संहितेमधील तरतुदीनुसार रविवार वगळता ७६ दिवसांपेक्षा अधिक दिवस सुट्टी देता येत नाही. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुट्ट्या निश्चित करताना नजरचुकीने बौध्द पौर्णिमेची सुट्टी मध्ये आली होती. चालू शैक्षणिक वर्ष शुक्रवार ८ मे पर्यंत चालणार आहे. यामुळे बौध्द पौर्णिमेची सुट्टी शाळांना देणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाधिकारी स्तरावरुन बौध्द पौर्णिमेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही सुट्टी घेत असताना शाळांचे सुट्ट्यांचे दिवस ७६ पेक्षा अधिक होणार याची काळजी घेणे अवश्यक आहे.बौध्द पौर्णिमेची सुट्टी घेतल्यानंतर हा दिवस भरुन काढण्यासाठी शिक्षणाधिकारी अहिरे यांनी शाळांसमोर काही पर्याय ठेवले आहेत. यामध्ये जर शाळांकडे मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील स्थानिक सुट्टी शिल्लक असेल तर बौध्द पौर्णिमेची दिवशी ती सुट्टी घेण्यात यावी. जर स्थानिक सुट्टीचा पर्याय उपलब्ध नसेल तर अन्य सुट्टीच्या दिवशी शाळा भरवून बौध्द पौर्णिमेच्या सुुट्टीचा दिवस भरुन काढण्यात यावा. या दोन पैकी उपलब्ध पर्यायाचा वापर शाळांना करावा लागणार आहे. ज्या शाळांकडे स्थानिक सुट्टी शिल्लक नसेल अशा शाळांना रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. या शैक्षणिक वर्षात प्रथमच जिल्ह्यात रविवारी शाळा घ्याव्या लागल्या आहेत. यापूर्वी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची सुट्टी भरुन काढण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये रविवारी शाळा भरविण्यात आली. तसेच काही शाळांनी महावीर जयंतीच्या सुट्टीचा दिवस भरुन काढण्यासाठी रविवारी शाळा भरविली. आता ज्या शाळांकडे स्थानिक सुट्टी शिल्लक नसेल अशा बौध्द पौर्णिमेची सुट्टी भरुन काढण्यासाठी पुन्हा रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. सोमवार दि.४ मे रोजी येणाऱ्या पौर्णिमेची सुट्टी माध्यमिक शाळांना दिल्याने आता रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून त्याकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी बौध्द पौर्णिमेची शासकीय सुट्टी घ्यावी. या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. - राजेंद्र अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी बौध्द पौर्णिमेची शासकीय सुट्टी घ्यावी. या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. - राजेंद्र अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी