शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

अनुसूचित जाती भूमिहीनांना कसण्यासाठी शासन देणार जमीन

By admin | Updated: September 1, 2014 23:10 IST

नवीन योजना : शेतमजुरांना मिळणार उत्पन्नाचा स्रोत

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतमजूर कुटुंबाना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्याकरिता चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांचे सबलीकरण व स्वाभिमान वाढवण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज या स्वरुपात निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २००४ पासून ही योजना लागू झाली आहे. शासनाकडून उपलब्ध झाल्यास शासकीय जमीन अथवा शासनाकडून जमीन खरेदी करुन शासन निर्णयातील अटी शर्ती विचारात घेऊन ती भूमीहीन शेतमजूर विधवा, परित्यक्ता यांच्या नावे केली केली. जमीन अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या पती-पत्नीच्या नावे केली जाईल. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के रक्कम अनुदान असेल. कर्जाचा भाग वित्तीय संस्था अथवा राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली किंवा राष्ट्रीयीकृत आणि सहकार बँक यांना देय व्याज शासनाकडून देण्यात येईल. लाभार्थींचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ६० वर्षे असावे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर असावा. महसूल व वन विभागाने ज्यांना गावरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जमीन उपलब्ध करुन दिलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द, भूमीहीन शेतमजूर कुटुंबास कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तिला हस्तांतरीत करता येणार नाही. अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतमजूर कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी व दहा वर्षे मुदतीकरिता असेल. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षांनंतर सुरु होईल. लाभार्थीने मुदतीत कर्ज फेडणे आवश्यक आहे. अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थीने सहायक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)