शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती भूमिहीनांना कसण्यासाठी शासन देणार जमीन

By admin | Updated: September 1, 2014 23:10 IST

नवीन योजना : शेतमजुरांना मिळणार उत्पन्नाचा स्रोत

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतमजूर कुटुंबाना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्याकरिता चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांचे सबलीकरण व स्वाभिमान वाढवण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज या स्वरुपात निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २००४ पासून ही योजना लागू झाली आहे. शासनाकडून उपलब्ध झाल्यास शासकीय जमीन अथवा शासनाकडून जमीन खरेदी करुन शासन निर्णयातील अटी शर्ती विचारात घेऊन ती भूमीहीन शेतमजूर विधवा, परित्यक्ता यांच्या नावे केली केली. जमीन अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या पती-पत्नीच्या नावे केली जाईल. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के रक्कम अनुदान असेल. कर्जाचा भाग वित्तीय संस्था अथवा राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली किंवा राष्ट्रीयीकृत आणि सहकार बँक यांना देय व्याज शासनाकडून देण्यात येईल. लाभार्थींचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ६० वर्षे असावे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर असावा. महसूल व वन विभागाने ज्यांना गावरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जमीन उपलब्ध करुन दिलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द, भूमीहीन शेतमजूर कुटुंबास कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तिला हस्तांतरीत करता येणार नाही. अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतमजूर कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी व दहा वर्षे मुदतीकरिता असेल. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षांनंतर सुरु होईल. लाभार्थीने मुदतीत कर्ज फेडणे आवश्यक आहे. अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थीने सहायक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)