शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
4
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
5
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
6
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
7
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
8
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
9
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
10
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
11
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
12
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
13
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
14
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
15
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
16
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
17
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
18
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
19
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
20
KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?

जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान, पेरणीची कामे पूर्ण, लागवडीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी दिल्यामुळे यंदाचा शेतीचा सामना शेतकरीच जिंकतील, असे चित्र सध्या दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६७६९.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १२३५.४८ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.

‘ताैक्ते’ वादळापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली होती. वादळानंतर पाऊस सलग सुरू होता. पावसाची उघडीप झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रातच पेरण्यांची कामे उरकली होती, त्यामुळे रोपे जोमदार वाढली आहेत. २० ते २१ दिवसानंतर रोपे काढून लागवड करण्यात येते. गेल्या दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भात खाचरातून पाणी बऱ्यापैकी साचले आहे. त्यामुळे पाणी असलेल्या क्षेत्रात प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पावसावर डोंगराळ व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावरील लागवड उरकण्यात आली. जिल्ह्यात शेतीची कामे सलग सुरू असून, पावसाने उसंत घेतली असली तरी शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त आहेत.

मान्सूनपूर्व पावसावरच पेरण्यांची कामे उरकण्यात आल्याने लागवडीची कामे सुरू झाली आहेत. पावसाचा अंदाज घेत पाणी असलेल्या क्षेत्रावर भात लागवड करत आहोत.

- महेश रेवाळे, शेतकरी

कृषी विभागाने यावर्षी बांधावर खते उपलब्ध करून दिली असल्याने लाॅकडाऊन काळात खतासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. पेरण्या वेळेवर झाल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू आहेत.

- अमोल कुळ्ये, शेतकरी

यावर्षी पाऊस सुरुवातीपासून चांगला असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खते, बियाणे बांधावरच उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही.

- मंदार गुरव, शेतकरी