शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान, पेरणीची कामे पूर्ण, लागवडीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी दिल्यामुळे यंदाचा शेतीचा सामना शेतकरीच जिंकतील, असे चित्र सध्या दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६७६९.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १२३५.४८ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.

‘ताैक्ते’ वादळापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली होती. वादळानंतर पाऊस सलग सुरू होता. पावसाची उघडीप झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रातच पेरण्यांची कामे उरकली होती, त्यामुळे रोपे जोमदार वाढली आहेत. २० ते २१ दिवसानंतर रोपे काढून लागवड करण्यात येते. गेल्या दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भात खाचरातून पाणी बऱ्यापैकी साचले आहे. त्यामुळे पाणी असलेल्या क्षेत्रात प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पावसावर डोंगराळ व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावरील लागवड उरकण्यात आली. जिल्ह्यात शेतीची कामे सलग सुरू असून, पावसाने उसंत घेतली असली तरी शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त आहेत.

मान्सूनपूर्व पावसावरच पेरण्यांची कामे उरकण्यात आल्याने लागवडीची कामे सुरू झाली आहेत. पावसाचा अंदाज घेत पाणी असलेल्या क्षेत्रावर भात लागवड करत आहोत.

- महेश रेवाळे, शेतकरी

कृषी विभागाने यावर्षी बांधावर खते उपलब्ध करून दिली असल्याने लाॅकडाऊन काळात खतासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. पेरण्या वेळेवर झाल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू आहेत.

- अमोल कुळ्ये, शेतकरी

यावर्षी पाऊस सुरुवातीपासून चांगला असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खते, बियाणे बांधावरच उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही.

- मंदार गुरव, शेतकरी