शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान, पेरणीची कामे पूर्ण, लागवडीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी दिल्यामुळे यंदाचा शेतीचा सामना शेतकरीच जिंकतील, असे चित्र सध्या दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६७६९.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १२३५.४८ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.

‘ताैक्ते’ वादळापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली होती. वादळानंतर पाऊस सलग सुरू होता. पावसाची उघडीप झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रातच पेरण्यांची कामे उरकली होती, त्यामुळे रोपे जोमदार वाढली आहेत. २० ते २१ दिवसानंतर रोपे काढून लागवड करण्यात येते. गेल्या दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भात खाचरातून पाणी बऱ्यापैकी साचले आहे. त्यामुळे पाणी असलेल्या क्षेत्रात प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पावसावर डोंगराळ व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावरील लागवड उरकण्यात आली. जिल्ह्यात शेतीची कामे सलग सुरू असून, पावसाने उसंत घेतली असली तरी शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त आहेत.

मान्सूनपूर्व पावसावरच पेरण्यांची कामे उरकण्यात आल्याने लागवडीची कामे सुरू झाली आहेत. पावसाचा अंदाज घेत पाणी असलेल्या क्षेत्रावर भात लागवड करत आहोत.

- महेश रेवाळे, शेतकरी

कृषी विभागाने यावर्षी बांधावर खते उपलब्ध करून दिली असल्याने लाॅकडाऊन काळात खतासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. पेरण्या वेळेवर झाल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू आहेत.

- अमोल कुळ्ये, शेतकरी

यावर्षी पाऊस सुरुवातीपासून चांगला असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खते, बियाणे बांधावरच उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही.

- मंदार गुरव, शेतकरी