शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान, पेरणीची कामे पूर्ण, लागवडीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी दिल्यामुळे यंदाचा शेतीचा सामना शेतकरीच जिंकतील, असे चित्र सध्या दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६७६९.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १२३५.४८ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.

‘ताैक्ते’ वादळापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली होती. वादळानंतर पाऊस सलग सुरू होता. पावसाची उघडीप झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रातच पेरण्यांची कामे उरकली होती, त्यामुळे रोपे जोमदार वाढली आहेत. २० ते २१ दिवसानंतर रोपे काढून लागवड करण्यात येते. गेल्या दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भात खाचरातून पाणी बऱ्यापैकी साचले आहे. त्यामुळे पाणी असलेल्या क्षेत्रात प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पावसावर डोंगराळ व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावरील लागवड उरकण्यात आली. जिल्ह्यात शेतीची कामे सलग सुरू असून, पावसाने उसंत घेतली असली तरी शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त आहेत.

मान्सूनपूर्व पावसावरच पेरण्यांची कामे उरकण्यात आल्याने लागवडीची कामे सुरू झाली आहेत. पावसाचा अंदाज घेत पाणी असलेल्या क्षेत्रावर भात लागवड करत आहोत.

- महेश रेवाळे, शेतकरी

कृषी विभागाने यावर्षी बांधावर खते उपलब्ध करून दिली असल्याने लाॅकडाऊन काळात खतासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. पेरण्या वेळेवर झाल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू आहेत.

- अमोल कुळ्ये, शेतकरी

यावर्षी पाऊस सुरुवातीपासून चांगला असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खते, बियाणे बांधावरच उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही.

- मंदार गुरव, शेतकरी