शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोकण कृषी विद्यापीठाचा सुवर्णकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत, शिरगाव - रत्नागिरी येथील संशाेधन केंद्रांनी शाेधून काढलेल्या नवनवीन जाती, संकरित जाती व निरनिराळ्या लागवडीसाठी ...

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत, शिरगाव - रत्नागिरी येथील संशाेधन केंद्रांनी शाेधून काढलेल्या नवनवीन जाती, संकरित जाती व निरनिराळ्या लागवडीसाठी विकसित केलेले तंत्रज्ञान यामुळे आता कोकणची उत्पादकता जवळपास ३५ क्विंटलच्या आसपास गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सन १९८८ - ८९मध्ये रोजगार हमी योजनेमध्ये फळपिकांचा समावेश करणाऱ्या क्रांतिकारक निर्णयामुळे कोकणच्या शेतीची दिशाच बदलून गेली. ३५ हजार हेक्टरवर असलेले काजू व आंबा क्षेत्र जवळपास आज ३.५ लाख हेक्टरवर गेले आहे. खरंतर हे क्षेत्र वाढविण्यामागे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आंब्याचे कोय कलम व काजूचे मृदकाष्ट कलम यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

कोकणामध्ये केली जाणारी शेती ही फावल्या वेळेची शेती या सदरातच मोडते. म्हणजे दुकान व नोकरी सांभाळून केलेली शेती. शेतीला दुय्यम दर्जा दिल्याने शेती फायद्यात कशी येईल? शेती म्हणजे फक्त भात लागवडच नव्हे तर त्याच्यामध्ये भाजीपाला लागवड, आंबा लागवड, काजू लागवड हे जसे महत्त्वाचे आहे तसे शेतीतील पूरक व्यवसाय जसे की, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मधुमक्षिका पालन असे इतर व्यवसायही आपण केले पाहिजेत. पूर्वीच्या काळी हे असेच व्यवसाय केले जात असत आणि त्यामुळे शेती टिकून होती. थोडक्यात काय या सगळ्याचा आपण जर योग्य पध्दतीने वापर केला तर खतांवरील खर्च आपोआप कमी होतो आणि उत्पादन जास्त मिळते. आपण गोंडस शब्दामध्ये याला ‘सेंद्रिय शेती’ म्हणू शकतो.

भारताला स्वातंत्र्य मिळताना भारत हा गरीब या सदरात मोडत होता. लोकांना दोनवेळचे अन्न मिळत नव्हते. स्वर्गीय पंतप्रधान शास्त्रींनी लोकांना एक दिवस उपवास करा, असे आवाहनही केले होते आणि या सगळ्याचा विचार करुन डॉ. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली १९६८ साली जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी भारतात हरितक्रांती आणण्यात आली. क्वचितच आज भारताची गोदामे धान्याने भरुन गेली आहेत. तथापि या हरितक्रांतीमुळे भारताची पारंपरिक शेती व्यवसाय पध्दती ही सेंद्रिय शेतीशी निगडीत होती, ती बदलून रासायनिक शेतीकडे वळली.

कालांतराने धवलक्रांती, इंद्रधनू क्रांती, पित क्रांती अशी विविध क्रांती भारतात झाली आणि भारताची परंपरागत शेती बदलत चालली. कोकणातील शेतीमध्ये निरनिराळे विचार येऊ लागले.

सध्याचा काळ हा कोकणासाठी क्रांतीकारक आहे, असे मी समजतो. समाजाचा शेतीबाबतचा दृष्टीकाेन कोरोनामुळे बदलून गेला. कोरोनामध्येही शेती व्यवसाय तग धरुन उभा आहे. मुंबई, पुणे येथे असलेला चाकरमानी आज परत गावाकडे वळू लागलेला आहे आणि शेती हा व्यवसाय म्हणून कसा करता येईल, हा दृष्टीकाेन घेऊन तो पुढे चालला आहे. या इंटरनेट युगातला तरुण यू टयूब, व्हॉट्सअ‍ॅप यावर माहिती समजून विद्यापीठाला भेट देऊन यामध्ये उतरु लागला आहे. रामदास स्वामी यांनी सांगितल्यानुसार, ‘अभ्यासोनी प्रकटावे’नुसार स्वत: आधी त्याचा अभ्यास करतो आणि नंतर त्या व्यवसायामध्ये उतरतो आणि मग त्या समाजाला काय हवे म्हणजे भात शेतीसाठी किंवा लाल किंवा काळ्या भाताची शेती करत असेल. कुक्कुटपालनामध्ये देशी कोंबड्यांचा उद्योग करत असेल. याशिवाय असे बरेच अपारंपरिक शेती व्यवसाय आहेत जसे की, लाव्ही पालन, अळंबी लागवड, बंदिस्त शेळीपालन, मस्त्यपालन इत्यादी शेतीपूरक व्यवसाय करायला जातो. शेती फायदेशीर ठरायची असेल तर उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यात थेट संपर्क झाला पाहिजे. तसेच उपभोक्त्याला जे पाहिजे ते त्या स्वरुपात दिले पाहिजे तर फायदा होतो. नवीन पिढी हे जाणते आणि म्हणूनच योग्य पध्दतीने तयार होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करुन तो माल योग्य पध्दतीने पणन करण्याची क्षमता आजच्या पिढीकडे आहे आणि म्हणूनच ज्या-ज्याठिकाणी ही तरुण मंडळी शेतीकडे वळली तिथे-तिथे त्यांनी शेतीपूरक व्यवसायाबरोबर सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटनाची संकल्पना मांडली आहे. निसर्गाने कोकणाला दिलेले मुक्तहस्ते निसर्गसौंदर्य आणि ७२० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनारा आणि सहा महानगरपालिका यांची बाजारपेठ या सगळ्यांचा विचार करुन आणि तरुण पिढीने एकत्र येऊन शेती व्यवसाय करावा आणि समृध्दी प्राप्त करावी.

————————————

शेती परंपरागत व्यवसाय

खरंतर शेती हा आपला परंपरागत व्यवसाय आहे. पराशर ऋषीने शेती कशी करावी आणि शेतीच्या संशाेधनाबद्दल सांगून ठेवलेले आहे. खरंतर पराशर ऋषी जगातील शेतीमध्ये काम करणारे पहिले शास्त्रज्ञ. सुदैवाने ते महाराष्ट्रातील पारनेर येथील होते. पण कालांतराने ज्या पध्दतीने इतर शास्त्रांच्या बाबतीत चुकीचा इतिहास मांडला जाऊ लागला. तसाच तो कृषी शास्त्राच्या बाबतीतही मांडला जाऊ लागला.

——————————-

शेतीकडे व्यावसायिकदृष्टया पहावे

पूर्वी आंबा लागवडीसाठी कलमे रत्नागिरीहून एस. टी.च्या टपावरुन नेली जात असत. साहजिकच त्याला मर्यादा येत असे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये छोट्या - छोट्या प्लास्टिक पिशवीमध्ये कलमे वाहून नेणे व तयार करणे हे सहज साध्य झाले आहे. सर्वसाधारणपणे लोकांच्या मनामध्ये शेती हा तोट्यातील किंवा आतभट्टीचा व्यवहार असा समज आहे. परंतु, वस्तूस्थिती तशी नाही. पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. आजही तशी परिस्थिती येऊ शकते जर आपण शेती व्यवसायिकदृष्टया केली तर.

- डॉ. संजय भावे, संचालक, विस्तार शिक्षण, काेकण कृषी विद्यापीठ, दापाेली.