शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोकण कृषी विद्यापीठाचा सुवर्णकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत, शिरगाव - रत्नागिरी येथील संशाेधन केंद्रांनी शाेधून काढलेल्या नवनवीन जाती, संकरित जाती व निरनिराळ्या लागवडीसाठी ...

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत, शिरगाव - रत्नागिरी येथील संशाेधन केंद्रांनी शाेधून काढलेल्या नवनवीन जाती, संकरित जाती व निरनिराळ्या लागवडीसाठी विकसित केलेले तंत्रज्ञान यामुळे आता कोकणची उत्पादकता जवळपास ३५ क्विंटलच्या आसपास गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सन १९८८ - ८९मध्ये रोजगार हमी योजनेमध्ये फळपिकांचा समावेश करणाऱ्या क्रांतिकारक निर्णयामुळे कोकणच्या शेतीची दिशाच बदलून गेली. ३५ हजार हेक्टरवर असलेले काजू व आंबा क्षेत्र जवळपास आज ३.५ लाख हेक्टरवर गेले आहे. खरंतर हे क्षेत्र वाढविण्यामागे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आंब्याचे कोय कलम व काजूचे मृदकाष्ट कलम यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

कोकणामध्ये केली जाणारी शेती ही फावल्या वेळेची शेती या सदरातच मोडते. म्हणजे दुकान व नोकरी सांभाळून केलेली शेती. शेतीला दुय्यम दर्जा दिल्याने शेती फायद्यात कशी येईल? शेती म्हणजे फक्त भात लागवडच नव्हे तर त्याच्यामध्ये भाजीपाला लागवड, आंबा लागवड, काजू लागवड हे जसे महत्त्वाचे आहे तसे शेतीतील पूरक व्यवसाय जसे की, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मधुमक्षिका पालन असे इतर व्यवसायही आपण केले पाहिजेत. पूर्वीच्या काळी हे असेच व्यवसाय केले जात असत आणि त्यामुळे शेती टिकून होती. थोडक्यात काय या सगळ्याचा आपण जर योग्य पध्दतीने वापर केला तर खतांवरील खर्च आपोआप कमी होतो आणि उत्पादन जास्त मिळते. आपण गोंडस शब्दामध्ये याला ‘सेंद्रिय शेती’ म्हणू शकतो.

भारताला स्वातंत्र्य मिळताना भारत हा गरीब या सदरात मोडत होता. लोकांना दोनवेळचे अन्न मिळत नव्हते. स्वर्गीय पंतप्रधान शास्त्रींनी लोकांना एक दिवस उपवास करा, असे आवाहनही केले होते आणि या सगळ्याचा विचार करुन डॉ. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली १९६८ साली जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी भारतात हरितक्रांती आणण्यात आली. क्वचितच आज भारताची गोदामे धान्याने भरुन गेली आहेत. तथापि या हरितक्रांतीमुळे भारताची पारंपरिक शेती व्यवसाय पध्दती ही सेंद्रिय शेतीशी निगडीत होती, ती बदलून रासायनिक शेतीकडे वळली.

कालांतराने धवलक्रांती, इंद्रधनू क्रांती, पित क्रांती अशी विविध क्रांती भारतात झाली आणि भारताची परंपरागत शेती बदलत चालली. कोकणातील शेतीमध्ये निरनिराळे विचार येऊ लागले.

सध्याचा काळ हा कोकणासाठी क्रांतीकारक आहे, असे मी समजतो. समाजाचा शेतीबाबतचा दृष्टीकाेन कोरोनामुळे बदलून गेला. कोरोनामध्येही शेती व्यवसाय तग धरुन उभा आहे. मुंबई, पुणे येथे असलेला चाकरमानी आज परत गावाकडे वळू लागलेला आहे आणि शेती हा व्यवसाय म्हणून कसा करता येईल, हा दृष्टीकाेन घेऊन तो पुढे चालला आहे. या इंटरनेट युगातला तरुण यू टयूब, व्हॉट्सअ‍ॅप यावर माहिती समजून विद्यापीठाला भेट देऊन यामध्ये उतरु लागला आहे. रामदास स्वामी यांनी सांगितल्यानुसार, ‘अभ्यासोनी प्रकटावे’नुसार स्वत: आधी त्याचा अभ्यास करतो आणि नंतर त्या व्यवसायामध्ये उतरतो आणि मग त्या समाजाला काय हवे म्हणजे भात शेतीसाठी किंवा लाल किंवा काळ्या भाताची शेती करत असेल. कुक्कुटपालनामध्ये देशी कोंबड्यांचा उद्योग करत असेल. याशिवाय असे बरेच अपारंपरिक शेती व्यवसाय आहेत जसे की, लाव्ही पालन, अळंबी लागवड, बंदिस्त शेळीपालन, मस्त्यपालन इत्यादी शेतीपूरक व्यवसाय करायला जातो. शेती फायदेशीर ठरायची असेल तर उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यात थेट संपर्क झाला पाहिजे. तसेच उपभोक्त्याला जे पाहिजे ते त्या स्वरुपात दिले पाहिजे तर फायदा होतो. नवीन पिढी हे जाणते आणि म्हणूनच योग्य पध्दतीने तयार होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करुन तो माल योग्य पध्दतीने पणन करण्याची क्षमता आजच्या पिढीकडे आहे आणि म्हणूनच ज्या-ज्याठिकाणी ही तरुण मंडळी शेतीकडे वळली तिथे-तिथे त्यांनी शेतीपूरक व्यवसायाबरोबर सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटनाची संकल्पना मांडली आहे. निसर्गाने कोकणाला दिलेले मुक्तहस्ते निसर्गसौंदर्य आणि ७२० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनारा आणि सहा महानगरपालिका यांची बाजारपेठ या सगळ्यांचा विचार करुन आणि तरुण पिढीने एकत्र येऊन शेती व्यवसाय करावा आणि समृध्दी प्राप्त करावी.

————————————

शेती परंपरागत व्यवसाय

खरंतर शेती हा आपला परंपरागत व्यवसाय आहे. पराशर ऋषीने शेती कशी करावी आणि शेतीच्या संशाेधनाबद्दल सांगून ठेवलेले आहे. खरंतर पराशर ऋषी जगातील शेतीमध्ये काम करणारे पहिले शास्त्रज्ञ. सुदैवाने ते महाराष्ट्रातील पारनेर येथील होते. पण कालांतराने ज्या पध्दतीने इतर शास्त्रांच्या बाबतीत चुकीचा इतिहास मांडला जाऊ लागला. तसाच तो कृषी शास्त्राच्या बाबतीतही मांडला जाऊ लागला.

——————————-

शेतीकडे व्यावसायिकदृष्टया पहावे

पूर्वी आंबा लागवडीसाठी कलमे रत्नागिरीहून एस. टी.च्या टपावरुन नेली जात असत. साहजिकच त्याला मर्यादा येत असे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये छोट्या - छोट्या प्लास्टिक पिशवीमध्ये कलमे वाहून नेणे व तयार करणे हे सहज साध्य झाले आहे. सर्वसाधारणपणे लोकांच्या मनामध्ये शेती हा तोट्यातील किंवा आतभट्टीचा व्यवहार असा समज आहे. परंतु, वस्तूस्थिती तशी नाही. पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. आजही तशी परिस्थिती येऊ शकते जर आपण शेती व्यवसायिकदृष्टया केली तर.

- डॉ. संजय भावे, संचालक, विस्तार शिक्षण, काेकण कृषी विद्यापीठ, दापाेली.