शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

हापूसला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका

By admin | Updated: May 26, 2015 00:56 IST

उष्णतेच्या लाटेमुळे होरपळतोय : आंबा बागायतदार मेटाकुटीस

संदीप बोडवे -मालवण -देशासह जागतिक बाजारपेठेत अब्जावधीचा व्यापार करणारा फळांचा राजा हापूस आंबा ग्लोबल वॉर्मिंगमुळे अस्मानी संकटात सापडला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उरला सुरला हापूस तग धरेनासा झाला आहे. प्रखर सूर्यकिरणांमुळे परिपक्व आंबा फळे झाडावरच होरपळून निघत आहेत. सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि आता तापमान वाढ यामुळे येथील आंबा बागायतदार पुरता मेटाकुटीस आला आहे.गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात आलेली उष्णतेची लाट आंबा पिकासाठी धोक्याची घंटा देणारी ठरली आहे. संपूर्ण राज्य होरपळून निघत असताना कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्यालाही तापमानवाढीचा चटका सहन करावा लागला आहे. येथील हापूस आंबा अतिशय संवेदनशील असल्याने तापमानातील बदल आंबा पिकावर परिणामकारक ठरत आहेत. अति थंडीबरोबरच अति उष्णताही आंबा पिकाला मानवेनासी झाली आहे.कोकणातील तापमानात मागील पाच-सहा वर्षांपासून सातत्याने वाढ नोंदली गेली आहे. यावर्षी याची तीव्रता अधिकच आहे. आठवडाभरापासून अचानक वाढलेली असह्य उष्णता आंबा पिकालाही सहन होईनाशी झाली आहे. डोंगराळ भागात व कातळावर असलेल्या आंबा बागांना याचा फटका अधिक प्रमाणात बसू लागला आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या बागांमधील आंबा फळे प्रखर सूर्यकिरणांमुळे झाडावरच भाजून निघत आहेत. यामुळे बागायतदारांचे नुकसान होऊ लागले आहे.प्रखर सुर्यकिरणांचा फटकामागील चार पाच वर्षांपासून कोकणात सामान्य तापमानामध्ये तीन ते चार डिग्रीने वाढ झाली आहे. यावर्षी येथील तापमान ३७ अंशांच्याही पुढे गेले आहे. हापूस आंब्याची साल पातळ असल्याने प्रखर सूर्यकिरणांमुळे आंब्याच्या ‘पिगमेंटेशन’मध्ये बदल होऊन ‘अ‍ॅन्थोसायनिन’ प्रोसेसमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. यामुळे आंबा फळ खराब व्हायला सुरुवात होते.- डॉ. भरत साळवी,सहयोगी संशोधन संचालक,प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला