शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधकाम, दुरूस्तीचे अधिकार द्या

By admin | Updated: February 8, 2016 23:51 IST

काडवली ग्रामसभेत ठराव : शासन निर्णयाविरोधात काडवलीवासीयांमध्ये नाराजीचा सूर

चिपळूण : महाराष्ट्र शासनाने घर बांधकाम व दुरुस्ती परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेतले आहेत. याबाबतची परवानगी आता तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडून घ्यावी लागणार आहे. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक फटका बसणार आहे. शिवाय एका फेरीत ही परवानगी मिळेल, याची शाश्वती नाही. ग्रामस्थांना परवानगीसाठी हेलपाटे मारावे लागतील, असे मत काडवलीतील ग्रामस्थांनी मांडले. शासनाच्या या निर्णयाविरोधात ठराव केला तर घर बांधकाम व दुरुस्ती परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीलाच द्यावेत, अशी मागणी केली आहे. काडवली ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थ संतोष सावर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सरपंच रमेश मांजरेकर, उपसरपंच राकेश महाडिक, माजी सरपंच जयदीप महाडिक, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुरेश महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कृष्णा लांबे, वसंत पड्याळ, संभाजी महाडिक, बाजीराव महाडिक, अबिद्दिन शेख, सदस्या नंदिनी मोहिते, रश्मी चव्हाण, नेहा खाडे, ग्रामसेवक नागेश बोंडले आदी उपस्थित होते. मागील जमा-खर्चाचे वाचन करून मंजुरी घेण्यात आली. चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचे वाचन करुन मंजुरी घेण्यात आली. या निधीतून सौर पथदीप, बौध्दवाडीतील विहिरींची दुरुस्ती व अन्य कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. विकासकामांबाबत चर्चा करताना प्रलंबित विकासकामांवर चर्चा करण्यात आली. विकासकामे मार्गी लागावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावातील बंद असलेल्या सौरपथदिव्यांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर शासकीय परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. यामध्ये वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ले, शेतीची नासधूस याप्रकरणी शासकीय आर्थिक मदतीबाबतची माहिती देण्यात आली. याबाबतचे परिपत्रक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामपंचायतीला पाठवले आहे. शासनाने ग्रामपंचायतीकडून घर बांधकाम व दुुरुस्तीचे परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. सर्वसामान्य ग्रामस्थांना घर बांधणी अथवा दुरुस्तीच्या परवानगीसाठी रत्नागिरी अथवा खेड येथे जावे लागणार आहे. मात्र, ग्रामस्थांना हे परवडणारे नाही. तसेच एका फेरीत ही परवानगी मिळेल, याची शाश्वती नाही. तहसील कार्यालयाकडे या परवानगीबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत, असे अधिकारी सांगत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. यानंतर शासनाच्या या निर्णयाला येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शवित ठराव केला, तर घर बांधकाम व दुरुस्तीचे अधिकार ग्रामपंचायतीला पुन्हा द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. विशेष घटक योजनेसाठी लाभार्थ्यांचे ठराव करण्यात आले. तसेच गावातील शाळांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वनिता महाडिक, शैला मोहिते, वाल्मिक देसाई, विश्राम पड्याळ, संगीता मोहिते, शांताराम मोहिते, ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम हिरवे, शिक्षक, अंगणवाडीसेविका आदी उपस्थित होते. सावर्डेकर यांनी मनोगत व्यक्त करुन ही सभा संपल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)शासनाने घर बांधकाम व दुरूस्ती परवागनी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींकडून काढून घेतले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. ग्रामपंचायत स्तरावर घर बांधकाम व दुरूस्तीची परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे ग्रामस्थांची कामे लवकर होण्यास मदत होत होती. त्यांच्यासाठी सोयीचे ठरत होते.ग्रामपंचायत स्तरावर मिळणारी परवानगी आता तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणार आहे. त्यासाठी आता हेलपाटे मारावे लागून आर्थिक भुर्दंड बसेल.