शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला संस्कार करणारी पुस्तके मुलांना द्या

By admin | Updated: December 12, 2014 23:52 IST

गोविंद गोडबोले : मुलांच्या भेटीतून सातत्याने मिळत गेली लिखाणाची उर्मी

रत्नागिरी : नाट्यछटांच्या स्पर्धा आयोजित करुन मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वाढदिवसाला हजारो रुपयांची भेट देताना त्यात लहान मुलांवर संस्कार करणारी पुस्तकेही भेट द्यावीत. मुलांना विचार करायला लावणाऱ्या व प्रबोधन करणाऱ्या बोली भाषेतील नाट्यछटांतून लेखिका अश्विनी आनंद पटवर्धन यांनी मुलात मूल होऊन लेखन केले आहे. त्यांनी हे व्रत असेच कायम जपावे, असे आवाहन बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी व्यक्त केले.ल. वि. केळकर सभागृहात लेखिका पटवर्धन यांच्या ‘पटवर्धनांच्या नाट्यछटा’ या पुस्तकाचे प्रकाशन गोडबोले तथा गोगो काकांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजेशखर मलुष्टे, माजी मुख्याध्यापक एच. डी. तथा बापूसाहेब जोशी, ग्रंथस्नेह प्रकाशनचे श्रीकृष्ण साबणे आणि अश्विनी पटवर्धन उपस्थित होत्या. अनुराधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.गोगोकाकांनी रत्नागिरीविषयी विशेष ऋण व्यक्त केले. रत्नागिरी आकाशवाणीवर काम करताना ‘अंगतपंगत’च्या माध्यमातून केलेल्या लेखनाला राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. आज चांगले व सुसंस्कारित श्रोते आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये साबणे यांनी सांगितले, ‘दत्त जयंतीला दीड तपापूर्वी ग्रंथस्नेहची स्थापना केली. त्यानंतर पुस्तक विक्रीपासून लेखक, कलाकार संवाद कार्यक्रम आयोजित केले. मुलांसाठी कथा, कविता, भाषणे, भारतरत्नांची माहिती आदी साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन व्यवसाय सुरु केला आहे. रत्नागिरीतील अनेक लेखकांना लिहिते करुन पुस्तके प्रकाशित करणार आहे.’पटवर्धन यांनी सांगितले, ‘नाट्यछटांचे हे दुसरे पुस्तक आहे. माझ्या मुलींसाठी आणि मैत्रिणींच्या मुलांना स्पर्धा किंवा स्नेहसंमेलनासाठी नव्या नाट्यछटा लिहून दिल्या. मुलांकडून अनेक विषय मिळाले. त्यांच्या निर्व्याज, निरागस आणि निखळ वागण्यातून विषय सुचले आणि लेखन केले.’ अ‍ॅड. मलुष्टे म्हणाले, ‘मुलांवर संस्कार करणारे लेखन हवे आहे.’ आजकाल ‘माणसे ही पैसा निर्माण करणारी यंत्रे’ झाली आहेत. मुलांवर संस्कार करण्यासाठी महिला मंडळाने कार्यरत व्हावे, असे आवाहन बापू जोशी यांनी केले. यावेळी कवयित्री सुनेत्रा जोशी, प्रणव दामले, दिनकर गोडबोले, रोहिणी म्हसकर, दया भिडे, वसुधा भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)