शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित सर्व शाळांना १०० टक्के अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिदिनी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या जाचक अटी व मनमानी कारभार याचा जाहीर निषेध करीत १०० टक्के अनुदानाची आग्रही मागणी केली आहे.

विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या २० वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. सर्वच विनाअनुदानित शाळा आज प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदानास पात्र असताना काहींना २० टक्के, तर काहींना ४० टक्के अनुदान देऊन शासनाने बोळवण केली आहे. बऱ्याच शाळांना अजून एक रुपयाही अनुदान नाही. जवळपास वीस वर्षे विनाअनुदानित शाळेत सेवा करून काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झाले आहेत, तर काही येत्या एक-दोन वर्षात निवृत्त होतील.

भारतीय संविधानात सर्वांना समानतेची संधी असताना,‘समान काम - समान दाम’ या तत्त्वानुसार अनुदानित शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळणे हा आमचा केवळ हक्कच नसून तो आमचा अधिकार आहे. मात्र, शासन हेतुपुरस्सर आमच्या बाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच संघटनेचे राज्यभरात ढोलवादन व घंटानाद आंदोलन करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे निवेदन देऊन सर्व विनाअनुदानित शाळा यांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान मिळावे. त्रुटी पूर्तता शाळा यांना निधीसह घोषित करून त्वरित अनुदान सुरू करणे तसेच अघोषित शाळा १०० टक्के निधीसह घोषित करणे, विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी यांना सेवासंरक्षण मिळावे या आदी मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास येत्या १५ ऑगस्टनंतर राज्यभरातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे आंदोलन महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मोरेश्वर लिंगायत, सचिव प्रकाश हर्चेकर, जिल्हा सल्लागार संदेश कांबळे, इम्रान अलवारे, विठोबा भोसले, मारुती कुर्ले, विजय महाले, अमोल चव्हाण, अन्सारी तौशिफ, जितेंद्र गजभार, अविनाश शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.