शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विनाअनुदानित सर्व शाळांना १०० टक्के अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिदिनी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या जाचक अटी व मनमानी कारभार याचा जाहीर निषेध करीत १०० टक्के अनुदानाची आग्रही मागणी केली आहे.

विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या २० वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. सर्वच विनाअनुदानित शाळा आज प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदानास पात्र असताना काहींना २० टक्के, तर काहींना ४० टक्के अनुदान देऊन शासनाने बोळवण केली आहे. बऱ्याच शाळांना अजून एक रुपयाही अनुदान नाही. जवळपास वीस वर्षे विनाअनुदानित शाळेत सेवा करून काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झाले आहेत, तर काही येत्या एक-दोन वर्षात निवृत्त होतील.

भारतीय संविधानात सर्वांना समानतेची संधी असताना,‘समान काम - समान दाम’ या तत्त्वानुसार अनुदानित शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळणे हा आमचा केवळ हक्कच नसून तो आमचा अधिकार आहे. मात्र, शासन हेतुपुरस्सर आमच्या बाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच संघटनेचे राज्यभरात ढोलवादन व घंटानाद आंदोलन करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे निवेदन देऊन सर्व विनाअनुदानित शाळा यांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान मिळावे. त्रुटी पूर्तता शाळा यांना निधीसह घोषित करून त्वरित अनुदान सुरू करणे तसेच अघोषित शाळा १०० टक्के निधीसह घोषित करणे, विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी यांना सेवासंरक्षण मिळावे या आदी मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास येत्या १५ ऑगस्टनंतर राज्यभरातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे आंदोलन महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मोरेश्वर लिंगायत, सचिव प्रकाश हर्चेकर, जिल्हा सल्लागार संदेश कांबळे, इम्रान अलवारे, विठोबा भोसले, मारुती कुर्ले, विजय महाले, अमोल चव्हाण, अन्सारी तौशिफ, जितेंद्र गजभार, अविनाश शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.