शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

सर्वसामान्य जनता मात्र वेठीस : रवींद्र नागरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

राजापूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसून, शासन, प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक ती कोविड ...

राजापूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसून, शासन, प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक ती कोविड सेंटर, लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ बैठकांचा फार्स करून कोरोना नियंत्रणात येणार नाही, असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी लगावला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या नावाखाली शासनाने कडक लॉकडाऊन करून जनतेची एकप्रकारे कोंडीच केली आहे. यात सामान्य जनता भरडली जात आहे. कामगारांचे रोजगार बुडत आहेत. त्यामुळे लोकांना उपाशीपोटी मरण्याची वेळ येईल. त्यामुळे जनतेचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी का प्रयत्न करीत नाहीत. केवळ प्रशासकीय अधिकारी सांगतील त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी वागत असतील, तर जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरेकर यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी शासनाने स्थानिक आमदारांना फंड वापरण्यास मुभा दिली आहे. तसेच गेल्या वर्षभरात कोरोनाच्या नावावर अन्य विकासकामांना निधी नाही. मग शासनाचा करोडो रुपयांचा निधी कुठे खर्च होत आहे. या निधीतून तालुक्यात ठिकठिकाणी कोविड सेंटरची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न नागरेकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात आमदार, खासदार, मंत्री असून नसल्यासारखेच आहेत. जनतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नसून, सामान्य जनतेचे येथील लोकप्रतिनिधींना काहीही देणेघेणे नाही, अशीच सध्याची परिस्थिती आहे, असे नागरेकर यांनी म्हटले आहे.