शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

सर्वसामान्य जनता मात्र वेठीस : रवींद्र नागरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

राजापूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसून, शासन, प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक ती कोविड ...

राजापूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसून, शासन, प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक ती कोविड सेंटर, लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ बैठकांचा फार्स करून कोरोना नियंत्रणात येणार नाही, असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी लगावला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या नावाखाली शासनाने कडक लॉकडाऊन करून जनतेची एकप्रकारे कोंडीच केली आहे. यात सामान्य जनता भरडली जात आहे. कामगारांचे रोजगार बुडत आहेत. त्यामुळे लोकांना उपाशीपोटी मरण्याची वेळ येईल. त्यामुळे जनतेचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी का प्रयत्न करीत नाहीत. केवळ प्रशासकीय अधिकारी सांगतील त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी वागत असतील, तर जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरेकर यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी शासनाने स्थानिक आमदारांना फंड वापरण्यास मुभा दिली आहे. तसेच गेल्या वर्षभरात कोरोनाच्या नावावर अन्य विकासकामांना निधी नाही. मग शासनाचा करोडो रुपयांचा निधी कुठे खर्च होत आहे. या निधीतून तालुक्यात ठिकठिकाणी कोविड सेंटरची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न नागरेकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात आमदार, खासदार, मंत्री असून नसल्यासारखेच आहेत. जनतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नसून, सामान्य जनतेचे येथील लोकप्रतिनिधींना काहीही देणेघेणे नाही, अशीच सध्याची परिस्थिती आहे, असे नागरेकर यांनी म्हटले आहे.