शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

गावाकडचे इरले, घोंगडी झाले दुर्मीळपरंपरेला छेद ; अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST

नीलेश जाधव : मार्लेश्वर, भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे.

नीलेश जाधव : मार्लेश्वर, भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे. आधुनिक युगात प्लास्टिकच्या रेडीमेड वस्तू बाजारात आल्याने या वस्तू वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इरले व घोंगडीचा वापर आपोआप कमी झाला आहे. परिणामी इरले, घोंगडी दुर्मीळ झाली आहे.पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी भातलावणीची कामे करताना शेतकरी इरले व घोंगडीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असत. शेतकरी स्वत: इरले तयार करीत असत, तर घोंगडी विकत घेतली जात असे. एकदा तयार केलेले इरले किमान दहा वर्षे सहज होते. घोंगडीसुद्धा अनेक वर्षे टिकत असे. वारा आणि पावसाचा इरले व घोंगडीवर कोणताही परिणाम होत नाही. मुसळधार पावसात घोंगडीमुळे उबदारपणा येत असे. त्यामुळे इरले व घोंगडीलाच शेतकऱ्यांची जास्त पसंती असायची. इरले व घोंगडी वापरल्याने पावसापासून शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होत होता. घोंगडीमुळे तर थंडीपासून शरीराला उबही मिळत होती. सगळ्याच शेतकऱ्यांकडे इरले व घोंगडी असल्याचे पाहावयास मिळत होते. आता जमाना बदलल्याने इरले व घोंगडी दिसणेही दुरापास्त झाले आहे. सध्याच्या युगात प्लास्टिकच्या विविध रेडीमेडी वस्तू बाजारात उपलब्ध होत जुन्या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत.आता शेतीची कामे करताना रेनकोट, प्लास्टिक कागद, प्लास्टिक टोप्या, गमबूट आदी रेडीमेड वस्तूंचा वापर करण्यावर आताच शेतकरी अधिक भर देत आहे.