शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

वायूच्या वासाने चौघे गुदमरले

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

रत्नागिरीतील घटना : महिलांच्या सतर्कतेने जीवित हानी टळली

रत्नागिरी : वायूच्या रिकाम्या टँकरची साफसफाई करत असताना वायूच्या वासाने चौघे गुदमरुन बेशुद्ध झाल्याची घटना शनिवारी सकाळी रत्नागिरीतील मिरकरवाडा परिसरातील एस. केअर मरीन कंपनीनजीक घडली. या चौघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत टँकरमध्ये कोणत्या प्रकारचा वायू होता हे समजू शकले नाही. शनिवारी सकाळी टँकर (एमएच ०९ बीसी ५०००) हा मिरकरवाडा परिसरातील एस. केअर या मरीन कंपनीनजीक उभा होता. टँकरची आतून सफाई करण्यासाठी प्रसाद उर्फ बबलू जगदीश बिर्जे (३२), अलिसाब मगदूम पटेल (३२, दोघेही रा. मुरुगवाडा), संतोष रमेश राठोड (३०, भगवती बंदर) व शरीफ चांदसाब पटेल (३२, मुरुगवाडा) हे उतरले होते. टँकरचे दोन कप्पे धुवून झाले असता जगदीश, अलिसाब व संतोष हे टँकरच्या तिसऱ्या कप्प्यामध्ये उतरले या कप्प्यामध्ये वायू शिल्लक असल्याने तिघेही तेथेच गुदमरुन बेशुद्ध पडले. बराच काळ हे तिघेही बाहेर न आल्याने शरीफ पटेल त्यांना पाहण्यासाठी या कप्प्यामध्ये उतरला असता तोही बेशुद्ध पडला. ही गोष्ट तेथीलच महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परिसरातील नागरिकांना याची कल्पना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चारही जणांना बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)