शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

वायूच्या वासाने चौघे गुदमरले

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

रत्नागिरीतील घटना : महिलांच्या सतर्कतेने जीवित हानी टळली

रत्नागिरी : वायूच्या रिकाम्या टँकरची साफसफाई करत असताना वायूच्या वासाने चौघे गुदमरुन बेशुद्ध झाल्याची घटना शनिवारी सकाळी रत्नागिरीतील मिरकरवाडा परिसरातील एस. केअर मरीन कंपनीनजीक घडली. या चौघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत टँकरमध्ये कोणत्या प्रकारचा वायू होता हे समजू शकले नाही. शनिवारी सकाळी टँकर (एमएच ०९ बीसी ५०००) हा मिरकरवाडा परिसरातील एस. केअर या मरीन कंपनीनजीक उभा होता. टँकरची आतून सफाई करण्यासाठी प्रसाद उर्फ बबलू जगदीश बिर्जे (३२), अलिसाब मगदूम पटेल (३२, दोघेही रा. मुरुगवाडा), संतोष रमेश राठोड (३०, भगवती बंदर) व शरीफ चांदसाब पटेल (३२, मुरुगवाडा) हे उतरले होते. टँकरचे दोन कप्पे धुवून झाले असता जगदीश, अलिसाब व संतोष हे टँकरच्या तिसऱ्या कप्प्यामध्ये उतरले या कप्प्यामध्ये वायू शिल्लक असल्याने तिघेही तेथेच गुदमरुन बेशुद्ध पडले. बराच काळ हे तिघेही बाहेर न आल्याने शरीफ पटेल त्यांना पाहण्यासाठी या कप्प्यामध्ये उतरला असता तोही बेशुद्ध पडला. ही गोष्ट तेथीलच महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परिसरातील नागरिकांना याची कल्पना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चारही जणांना बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)