शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

रेल्वे स्थानकावर ‘गढुळाचे पाणी’!

By admin | Updated: July 18, 2016 00:02 IST

रत्नागिरीतील प्रकार : प्रवाशांच्या आरोग्याला धोका

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील १५ ते २० पिण्याच्या पाणी कट्ट्यांवरील नळांना तसेच चार कुलरनाही गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व हे ‘गढुळाचे पाणी’ देण्याऐवजी प्रवाशांना चांगले स्वच्छ पाणी या नळाद्वारे पुरवावे, अशी मागणी होत आहे. सरकता जिना, ट्रॅव्हलेटरसारख्या चांगल्या सुविधा रत्नागिरी स्थानकात कोकण रेल्वेने दिल्या आहेत. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने अनेक स्थानकेही कोकण रेल्वे मार्गावर उभारली जात आहेत. प्रवाशांना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी ही चांगली सुविधा कोकण रेल्वेने निर्माण केली आहे. त्याचा लाभ स्थानिक तसेच गाड्यांमधून प्रवास करणारे असंख्य प्रवासी घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकातील पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या सर्वच नळांना येणारे पाणी हे गढूळ आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला हे पाणी अपायकारक ठरू शकते. असे असतानाही ही व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले पाणी देण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. गढूळ पाण्यामुळे प्रवाशांना मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी येणाऱ्या नळांमधून गढूळ पाणी नेमके कोणत्या कारणाने येत आहे, पाण्याचे शुध्दिकरण होत नाही का, याला कोेण जबाबदार आहे व जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई होणार? असे सवाल प्रवाशांमधून केले जात आहेत. अन्य रेल्वे स्थानकांवरही अशी स्थिती तर नाही, याचीही पाहणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)