शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

रेल्वे स्थानकावर ‘गढुळाचे पाणी’!

By admin | Updated: July 18, 2016 00:02 IST

रत्नागिरीतील प्रकार : प्रवाशांच्या आरोग्याला धोका

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील १५ ते २० पिण्याच्या पाणी कट्ट्यांवरील नळांना तसेच चार कुलरनाही गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व हे ‘गढुळाचे पाणी’ देण्याऐवजी प्रवाशांना चांगले स्वच्छ पाणी या नळाद्वारे पुरवावे, अशी मागणी होत आहे. सरकता जिना, ट्रॅव्हलेटरसारख्या चांगल्या सुविधा रत्नागिरी स्थानकात कोकण रेल्वेने दिल्या आहेत. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने अनेक स्थानकेही कोकण रेल्वे मार्गावर उभारली जात आहेत. प्रवाशांना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी ही चांगली सुविधा कोकण रेल्वेने निर्माण केली आहे. त्याचा लाभ स्थानिक तसेच गाड्यांमधून प्रवास करणारे असंख्य प्रवासी घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकातील पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या सर्वच नळांना येणारे पाणी हे गढूळ आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला हे पाणी अपायकारक ठरू शकते. असे असतानाही ही व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले पाणी देण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. गढूळ पाण्यामुळे प्रवाशांना मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी येणाऱ्या नळांमधून गढूळ पाणी नेमके कोणत्या कारणाने येत आहे, पाण्याचे शुध्दिकरण होत नाही का, याला कोेण जबाबदार आहे व जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई होणार? असे सवाल प्रवाशांमधून केले जात आहेत. अन्य रेल्वे स्थानकांवरही अशी स्थिती तर नाही, याचीही पाहणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)