शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रेल्वे स्थानकावर ‘गढुळाचे पाणी’!

By admin | Updated: July 18, 2016 00:02 IST

रत्नागिरीतील प्रकार : प्रवाशांच्या आरोग्याला धोका

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील १५ ते २० पिण्याच्या पाणी कट्ट्यांवरील नळांना तसेच चार कुलरनाही गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व हे ‘गढुळाचे पाणी’ देण्याऐवजी प्रवाशांना चांगले स्वच्छ पाणी या नळाद्वारे पुरवावे, अशी मागणी होत आहे. सरकता जिना, ट्रॅव्हलेटरसारख्या चांगल्या सुविधा रत्नागिरी स्थानकात कोकण रेल्वेने दिल्या आहेत. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने अनेक स्थानकेही कोकण रेल्वे मार्गावर उभारली जात आहेत. प्रवाशांना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी ही चांगली सुविधा कोकण रेल्वेने निर्माण केली आहे. त्याचा लाभ स्थानिक तसेच गाड्यांमधून प्रवास करणारे असंख्य प्रवासी घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकातील पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या सर्वच नळांना येणारे पाणी हे गढूळ आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला हे पाणी अपायकारक ठरू शकते. असे असतानाही ही व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले पाणी देण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. गढूळ पाण्यामुळे प्रवाशांना मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी येणाऱ्या नळांमधून गढूळ पाणी नेमके कोणत्या कारणाने येत आहे, पाण्याचे शुध्दिकरण होत नाही का, याला कोेण जबाबदार आहे व जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई होणार? असे सवाल प्रवाशांमधून केले जात आहेत. अन्य रेल्वे स्थानकांवरही अशी स्थिती तर नाही, याचीही पाहणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)