शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गणपत कदम समर्थकही शिवसेनेच्या वाटेवर...

By admin | Updated: August 27, 2014 23:19 IST

राजकारण तापले : काँग्रेसमध्ये राजकीय वादळाचे संकेत

राजापूर : नारायण राणेसमर्थक माजी आमदार गणपत कदम यांच्यापाठोपाठ त्यांचे असंख्य समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने तालुका काँग्रेसमध्ये राजकीय वादळ घोगाऊ लागले आहे. कदम राजापुरात दाखल झाले असून, लवकरच ते आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर सर्वांचा शिवसेना प्रवेश होईल.नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून मधली नऊ वर्षे कदम हे ओळखले जात होते. राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर कदम यांनी आपल्या आमदारकीचा त्याग करुन पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर खचून न जाता त्यांनी तालुका काँग्रेसचा डोलारा यशस्वीपणे सांभाळला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करता आली होती. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसहीत ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला माफक यश मिळवता आले होते. तथापि त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल काँग्रेसकडून कधीच घेण्यात आली नाही. कदम यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राज्य मंत्रिमंडळात किंवा एखाद्या महामंडळावर त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगली जात होती. पण, काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून गणपत कदमांची उपेक्षा केली गेली. आपले कुठेतरी दखल घेतली जाईल, यासाठी नऊ वर्षे वाट पाहिली. पण, काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा व माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेना प्रवेश पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभय माजी आमदारांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला.काँग्रेसला दणका देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गणपत कदम राजापुरात दाखल झाले आहेत. लवकरच ते आपल्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतील. यानंतर या सर्वांचा शिवसेना प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने लवकरच काँग्रेसला दणका बसणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने हे प्रवेशसोहळे पार पाडून काँग्रेसला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राजापूर तालुक्यातील राजकीय वातावरणाचे रंग अधिकच गहिरे बनणार आहेत. (प्रतिनिधी)