शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

प्रकल्पग्रस्तांचा गणेशोत्सव यंदाही अंधारातच!

By admin | Updated: September 2, 2014 23:25 IST

शासनाकडून चेष्टा : गोठणेवासियांच्या नशिबी प्रकाशाचा ‘दिवा’च नाही

नीलेश जाधव, मार्लेश्वर : गणेशोत्सव म्हटला की, सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहावयास मिळतात. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असतो. याला संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुनर्वसित ग्रामस्थांचाही अपवाद नाही. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली हातीव गावठाण या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनस्थळी वीज नसल्यामुळे सुमारे ८२ कुटुंबियांवर यावर्षीही गणेशोत्सव अंधारातच साजरा करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षीपासून अंधार दूर होऊन विद्युत रोषणाईच्या साथीने आणखी जल्लोषी वातावरणात गणेशोत्सव साजरा करायला मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.तालुक्यातील सह्याद्रीच्या टोकावर अतिशय दुर्गम भागात गोठणे गाव वसले होते. या गावात सुमारे २०७ कुटुंब पिढ्यान्पिढ्या राहात होती. मात्र, १९८४ साली केंद्र सरकारने गावात व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली. व्याघ्र प्रकल्प जाहीर होताच गावाच्या पुनर्वसनाची हालचालही सुरु झाली होती. पुनर्वसन केव्हा होणार? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर पुनर्वसनासाठी २०१२ साल उजाडले आहे.मे महिन्यामध्ये गावातील काही कुटुंबांचे कोल्हापूर जिल्ह्यातील जैनापूर येथे, तर सुमारे ८२ कुटुंबाचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावठाण येथे प्रशस्त जागेत पुनर्वसन झाले. मात्र, अद्याप या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांना गोठणे गावात असल्यासारखे जीवन जगावे लागत आहे. अशा अवस्थेतसुद्धा हे ग्रामस्थ आपले आयुष्य जगत आहेत.सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने गोठणे पुनर्वसित ग्रामस्थांनीसुद्धा आपापल्या घरी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. या ग्रामस्थांची गणपती बाप्पावर अपार श्रद्धा आहे. पुनर्वसनस्थळी वीज नसल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही ग्रामस्थांना गणरायासाठी विद्युत रोषणाई करता आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. परंतु त्यांची लाडक्या गणरायाप्रती असणारी भक्ती जराही कमी झालेली नाही. उलट ग्रामस्थ गणरायाच्या पूजेत दंग झाले आहेत.प्रत्येकजण बाप्पाची पूजा- अर्चा करण्यात मग्न झाला आहे. त्यामुळे हातीव गावठाणमधील वातावरण सध्या भक्तीमय होऊन गेले आहे. येथील ग्रामस्थ बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत. पुढच्या वर्षी येथील अंधाराचे चित्र बाप्पाच बदलेल व पुढच्या वर्षीपासून गणेशोत्सव विद्युत रोषणाईच्या झगमगाटात साजरा करण्याची संधी मिळेल, असे ग्रामस्थांना मनोमन वाटत आहे. (गुरुवारी) लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार असून, पुढच्या वर्षीपासून तरी हा अंधार दूर व्हावा, असे गाऱ्हाणे ग्रामस्थ घालणार आहेत.